शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

Women's Day Special: मेहनतीने तिने फुलवला भाजीपाल्याचा मळा; महिलांचाही शेतीकडे ओढा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2020 00:29 IST

दोन एकरांत घेतले विविध उत्पादन, जांभा नदीच्या पाण्याचा केला वापर

जनार्दन भेरे भातसानगर : शहापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात भाजीपाला उत्पादित केला जात असला, तरी या शेतीच्या उत्पादनात महिलांचाही तितकाच वाटा आहे हेही तितकेच सत्य आहे. दिवसरात्र एक करून आपले भविष्य बदलून टाकण्याची किमया एका महिलेने केली आहे. नडगाव येथील सुरेखा सुरेश फर्डे यांच्या घरची परिस्थिती बेताची; पण त्यावर मात करण्यासाठी मेहनत करण्याची तिची तयारी होती.

शेतीजवळून जांभा नदी वाहत असल्याने त्याचा फायदा घेत आपल्या या जागेत भाजीपाला उत्पादन घेण्याचे ठरविले. पतीच्या बरोबरीने शेतीच्या कामाला सुरु वात केली. शेतात पाणी आणले आणि ठिबक सिंचन पद्धतीचा उपयोग करून आपल्या शेतात काकडी, भोपळा, शिरोळे, कारली, दुधी आणि डांगर यांची लागवड केली. मागील तीन वर्षांपासून त्या मेहनत घेऊन त्यांनी आपल्या घराला स्थैर्य प्राप्त करून दिले. पती सुरेश यांनीही, आपल्या यशात पत्नीचाच अधिक वाटा असून तिच्या दिवसरात्र मेहनतीमुळे मलाही अधिक काम करण्याची ऊर्जा मिळते, असे सांगितले.

दोन एकरमध्ये ४०० किलो काकडी, ५०० किलो कारली, २०० किलो भोपळा, २०० किलो शिरोळे, १५० किलो दुधी आणि महत्त्वपूर्ण अशी डांगराची लागवड केली असल्याने अधिक फायदा होतो. दरवर्षी अशा प्रकारच्या भाजीपाल्याची शेती केल्याने होणाऱ्या फायद्यामुळे घराची घडी बदलण्यास मदत झाली आहे.यामुळे आम्ही समाधानी आहोत असे त्या म्हणाल्या.ठिबक सिंचनाने केली लागवडशेतात ठिबक सिंचनाच्या मदतीने लागवड केली असून, त्याला सेंद्रिय खतांची जोड दिल्याने आज भाजीपाला जोराने बहरला आहे. त्यामुळे येत्या तीन महिन्यांत अधिक फायदा होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. आज शेती करण्याच्या प्रमाणात घट होत असल्याचे दिसत आहे. शेती करणे परवडत नाही, अशीच ओरड होते. मात्र, शेतीत अनेक प्रकारचे उत्पादन घेतल्यास नक्कीच फायदा होतो, हे सुरेखा यांनी दाखवून दिले आहे.

टॅग्स :Women's Day Specialजागतिक महिला दिन