शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

Women's Day Special: मेहनतीने तिने फुलवला भाजीपाल्याचा मळा; महिलांचाही शेतीकडे ओढा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2020 00:29 IST

दोन एकरांत घेतले विविध उत्पादन, जांभा नदीच्या पाण्याचा केला वापर

जनार्दन भेरे भातसानगर : शहापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात भाजीपाला उत्पादित केला जात असला, तरी या शेतीच्या उत्पादनात महिलांचाही तितकाच वाटा आहे हेही तितकेच सत्य आहे. दिवसरात्र एक करून आपले भविष्य बदलून टाकण्याची किमया एका महिलेने केली आहे. नडगाव येथील सुरेखा सुरेश फर्डे यांच्या घरची परिस्थिती बेताची; पण त्यावर मात करण्यासाठी मेहनत करण्याची तिची तयारी होती.

शेतीजवळून जांभा नदी वाहत असल्याने त्याचा फायदा घेत आपल्या या जागेत भाजीपाला उत्पादन घेण्याचे ठरविले. पतीच्या बरोबरीने शेतीच्या कामाला सुरु वात केली. शेतात पाणी आणले आणि ठिबक सिंचन पद्धतीचा उपयोग करून आपल्या शेतात काकडी, भोपळा, शिरोळे, कारली, दुधी आणि डांगर यांची लागवड केली. मागील तीन वर्षांपासून त्या मेहनत घेऊन त्यांनी आपल्या घराला स्थैर्य प्राप्त करून दिले. पती सुरेश यांनीही, आपल्या यशात पत्नीचाच अधिक वाटा असून तिच्या दिवसरात्र मेहनतीमुळे मलाही अधिक काम करण्याची ऊर्जा मिळते, असे सांगितले.

दोन एकरमध्ये ४०० किलो काकडी, ५०० किलो कारली, २०० किलो भोपळा, २०० किलो शिरोळे, १५० किलो दुधी आणि महत्त्वपूर्ण अशी डांगराची लागवड केली असल्याने अधिक फायदा होतो. दरवर्षी अशा प्रकारच्या भाजीपाल्याची शेती केल्याने होणाऱ्या फायद्यामुळे घराची घडी बदलण्यास मदत झाली आहे.यामुळे आम्ही समाधानी आहोत असे त्या म्हणाल्या.ठिबक सिंचनाने केली लागवडशेतात ठिबक सिंचनाच्या मदतीने लागवड केली असून, त्याला सेंद्रिय खतांची जोड दिल्याने आज भाजीपाला जोराने बहरला आहे. त्यामुळे येत्या तीन महिन्यांत अधिक फायदा होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. आज शेती करण्याच्या प्रमाणात घट होत असल्याचे दिसत आहे. शेती करणे परवडत नाही, अशीच ओरड होते. मात्र, शेतीत अनेक प्रकारचे उत्पादन घेतल्यास नक्कीच फायदा होतो, हे सुरेखा यांनी दाखवून दिले आहे.

टॅग्स :Women's Day Specialजागतिक महिला दिन