शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

पाणी समस्येवरुन महिलांनी व्यक्त केला आव्हाडांच्या विरोधात संताप

By अजित मांडके | Updated: September 25, 2023 15:42 IST

कळवा पूर्व येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तत्काळ मार्गी लावण्याचे आश्वासन परांजपे व  मुल्ला यांनी येथील जनतेला दिले.

ठाणे : राष्ट्रवादीचे दोन गट झाल्यानंतर आता अजित पवार गटाने आमदार जितेंद्र आव्हाड यांचा मतदार संघ असलेल्या कळवा, मुंब्य्राकडे लक्ष केंद्रीत केले आहे. त्यानुसार गणेशोत्सवाच्या माध्यमातून येथील गणेशोत्सव मंडळांना घरगुती गणपतींना भेटीगाटी सुरु केल्या आहेत. अशातच कळवा पूर्व येथील, आतकोनेश्वर नगर, घोलाई नगर, पोंडपाडा, भास्कर नगर झोपडपट्टीतील महिलांनी पिण्याचे पाणी मिळत नसल्याबद्दल स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध अजित पवार गटाचे जिल्हाअध्यक्ष आनंद परांजपे आणि नजीब मुल्ला यांच्यापुढे संताप व्यक्त केला आहे. यावेळी कळवा पूर्व येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तत्काळ मार्गी लावण्याचे आश्वासन परांजपे व  मुल्ला यांनी येथील जनतेला दिले.

कळवा पूर्व येथील आतकोनेश्वर नगर, घोलाई नगर, पोंडपाडा, भास्कर नगर परिसरातील सार्वजनिक गणेशोत्सवांच्या गाठीभेटी घेत असताना पिण्याचे पाणी मिळत नसल्याची तक्रार, कळवे पूर्व येथील महिलांनी व नागरिकांनी केली. याबाबत संतप्त रहिवाशांशी बोलताना आनंद परांजपे म्हणाले की, संध्याकाळपासून मी स्वत: व प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला व सर्वच राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते कळवा पूर्व वस्तीतील या डोंगर परिसरात गणरायाचे आशिर्वाद घेण्थासाठी घरोघरी जात आहोत. यावेळी आम्हाला लोकांनी दिलेला उत्फुर्त प्रतिसाद आम्ही अनुभवत आहोत. लोकांना बदल हवा आहे. लोकांनी खासकरुन कळवा पूर्व येथील आतकोनेश्वर नगर, घोलाई नगर, पौडपाडा, भास्कर नगर मधील अनेक गल्ल्यांमध्ये फिरताना, येथील महिलांनी मुलभूत सुविधा असलेल्या पिण्याच्या पाण्याविषयी तक्रार केली की, आठवड्यातून फक्त एकदा, ते ही अवघे दोन तास पिण्याचे पाणी मिळते. १५ वर्षे येथुन प्रतिनिधित्व करत असलेले लोकप्रतिनिधी, येथील जनतेच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवू शकलेले नाहीत. यामुळे येथील महिलांनी स्थानिक आमदारांच्या विरोधात आमच्याकडे रोष व्यक्त केल्याचे ते म्हणाले.

मोठमोठ्या गप्पा मारणाऱ्या स्थानिक लोकप्रतिनिधींची पोलखोल येथील महिलांनी केली असल्याचे नजीब मुल्ला म्हणाले. मुलभुत सुविधा, रस्ते, गटार, लाईट, पिण्याचे पाणी यांची येथे वाणवा आहे. बोरिंगच्या पाण्यासाठी नागरिकांकडून ५०० रुपये वसूल केले जातात. गोरगरिबांकडून हे पैसे कोण वसूल करतो ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. लोकप्रतिनिधींनी लोकाचे हित पहायचे असते, लोकांच्या पैशातून घरदार चालवायचे नसते. श्री गणेश दर्शन करताना लोकांची होणारी लुट समोर आली आहे. ही लूट आम्ही बंद करुन लोकांना तत्काळ पिण्याचे पाणी पुरविणार आहोत, असे जाहीर आश्वासन त्यांनी दिले.

टॅग्स :thaneठाणेWaterपाणीAjit Pawarअजित पवारJitendra Awhadजितेंद्र आव्हाड