शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

पाणी समस्येवरुन महिलांनी व्यक्त केला आव्हाडांच्या विरोधात संताप

By अजित मांडके | Updated: September 25, 2023 15:42 IST

कळवा पूर्व येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तत्काळ मार्गी लावण्याचे आश्वासन परांजपे व  मुल्ला यांनी येथील जनतेला दिले.

ठाणे : राष्ट्रवादीचे दोन गट झाल्यानंतर आता अजित पवार गटाने आमदार जितेंद्र आव्हाड यांचा मतदार संघ असलेल्या कळवा, मुंब्य्राकडे लक्ष केंद्रीत केले आहे. त्यानुसार गणेशोत्सवाच्या माध्यमातून येथील गणेशोत्सव मंडळांना घरगुती गणपतींना भेटीगाटी सुरु केल्या आहेत. अशातच कळवा पूर्व येथील, आतकोनेश्वर नगर, घोलाई नगर, पोंडपाडा, भास्कर नगर झोपडपट्टीतील महिलांनी पिण्याचे पाणी मिळत नसल्याबद्दल स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध अजित पवार गटाचे जिल्हाअध्यक्ष आनंद परांजपे आणि नजीब मुल्ला यांच्यापुढे संताप व्यक्त केला आहे. यावेळी कळवा पूर्व येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तत्काळ मार्गी लावण्याचे आश्वासन परांजपे व  मुल्ला यांनी येथील जनतेला दिले.

कळवा पूर्व येथील आतकोनेश्वर नगर, घोलाई नगर, पोंडपाडा, भास्कर नगर परिसरातील सार्वजनिक गणेशोत्सवांच्या गाठीभेटी घेत असताना पिण्याचे पाणी मिळत नसल्याची तक्रार, कळवे पूर्व येथील महिलांनी व नागरिकांनी केली. याबाबत संतप्त रहिवाशांशी बोलताना आनंद परांजपे म्हणाले की, संध्याकाळपासून मी स्वत: व प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला व सर्वच राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते कळवा पूर्व वस्तीतील या डोंगर परिसरात गणरायाचे आशिर्वाद घेण्थासाठी घरोघरी जात आहोत. यावेळी आम्हाला लोकांनी दिलेला उत्फुर्त प्रतिसाद आम्ही अनुभवत आहोत. लोकांना बदल हवा आहे. लोकांनी खासकरुन कळवा पूर्व येथील आतकोनेश्वर नगर, घोलाई नगर, पौडपाडा, भास्कर नगर मधील अनेक गल्ल्यांमध्ये फिरताना, येथील महिलांनी मुलभूत सुविधा असलेल्या पिण्याच्या पाण्याविषयी तक्रार केली की, आठवड्यातून फक्त एकदा, ते ही अवघे दोन तास पिण्याचे पाणी मिळते. १५ वर्षे येथुन प्रतिनिधित्व करत असलेले लोकप्रतिनिधी, येथील जनतेच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवू शकलेले नाहीत. यामुळे येथील महिलांनी स्थानिक आमदारांच्या विरोधात आमच्याकडे रोष व्यक्त केल्याचे ते म्हणाले.

मोठमोठ्या गप्पा मारणाऱ्या स्थानिक लोकप्रतिनिधींची पोलखोल येथील महिलांनी केली असल्याचे नजीब मुल्ला म्हणाले. मुलभुत सुविधा, रस्ते, गटार, लाईट, पिण्याचे पाणी यांची येथे वाणवा आहे. बोरिंगच्या पाण्यासाठी नागरिकांकडून ५०० रुपये वसूल केले जातात. गोरगरिबांकडून हे पैसे कोण वसूल करतो ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. लोकप्रतिनिधींनी लोकाचे हित पहायचे असते, लोकांच्या पैशातून घरदार चालवायचे नसते. श्री गणेश दर्शन करताना लोकांची होणारी लुट समोर आली आहे. ही लूट आम्ही बंद करुन लोकांना तत्काळ पिण्याचे पाणी पुरविणार आहोत, असे जाहीर आश्वासन त्यांनी दिले.

टॅग्स :thaneठाणेWaterपाणीAjit Pawarअजित पवारJitendra Awhadजितेंद्र आव्हाड