शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पाणी समस्येवरुन महिलांनी व्यक्त केला आव्हाडांच्या विरोधात संताप

By अजित मांडके | Updated: September 25, 2023 15:42 IST

कळवा पूर्व येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तत्काळ मार्गी लावण्याचे आश्वासन परांजपे व  मुल्ला यांनी येथील जनतेला दिले.

ठाणे : राष्ट्रवादीचे दोन गट झाल्यानंतर आता अजित पवार गटाने आमदार जितेंद्र आव्हाड यांचा मतदार संघ असलेल्या कळवा, मुंब्य्राकडे लक्ष केंद्रीत केले आहे. त्यानुसार गणेशोत्सवाच्या माध्यमातून येथील गणेशोत्सव मंडळांना घरगुती गणपतींना भेटीगाटी सुरु केल्या आहेत. अशातच कळवा पूर्व येथील, आतकोनेश्वर नगर, घोलाई नगर, पोंडपाडा, भास्कर नगर झोपडपट्टीतील महिलांनी पिण्याचे पाणी मिळत नसल्याबद्दल स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध अजित पवार गटाचे जिल्हाअध्यक्ष आनंद परांजपे आणि नजीब मुल्ला यांच्यापुढे संताप व्यक्त केला आहे. यावेळी कळवा पूर्व येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तत्काळ मार्गी लावण्याचे आश्वासन परांजपे व  मुल्ला यांनी येथील जनतेला दिले.

कळवा पूर्व येथील आतकोनेश्वर नगर, घोलाई नगर, पोंडपाडा, भास्कर नगर परिसरातील सार्वजनिक गणेशोत्सवांच्या गाठीभेटी घेत असताना पिण्याचे पाणी मिळत नसल्याची तक्रार, कळवे पूर्व येथील महिलांनी व नागरिकांनी केली. याबाबत संतप्त रहिवाशांशी बोलताना आनंद परांजपे म्हणाले की, संध्याकाळपासून मी स्वत: व प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला व सर्वच राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते कळवा पूर्व वस्तीतील या डोंगर परिसरात गणरायाचे आशिर्वाद घेण्थासाठी घरोघरी जात आहोत. यावेळी आम्हाला लोकांनी दिलेला उत्फुर्त प्रतिसाद आम्ही अनुभवत आहोत. लोकांना बदल हवा आहे. लोकांनी खासकरुन कळवा पूर्व येथील आतकोनेश्वर नगर, घोलाई नगर, पौडपाडा, भास्कर नगर मधील अनेक गल्ल्यांमध्ये फिरताना, येथील महिलांनी मुलभूत सुविधा असलेल्या पिण्याच्या पाण्याविषयी तक्रार केली की, आठवड्यातून फक्त एकदा, ते ही अवघे दोन तास पिण्याचे पाणी मिळते. १५ वर्षे येथुन प्रतिनिधित्व करत असलेले लोकप्रतिनिधी, येथील जनतेच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवू शकलेले नाहीत. यामुळे येथील महिलांनी स्थानिक आमदारांच्या विरोधात आमच्याकडे रोष व्यक्त केल्याचे ते म्हणाले.

मोठमोठ्या गप्पा मारणाऱ्या स्थानिक लोकप्रतिनिधींची पोलखोल येथील महिलांनी केली असल्याचे नजीब मुल्ला म्हणाले. मुलभुत सुविधा, रस्ते, गटार, लाईट, पिण्याचे पाणी यांची येथे वाणवा आहे. बोरिंगच्या पाण्यासाठी नागरिकांकडून ५०० रुपये वसूल केले जातात. गोरगरिबांकडून हे पैसे कोण वसूल करतो ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. लोकप्रतिनिधींनी लोकाचे हित पहायचे असते, लोकांच्या पैशातून घरदार चालवायचे नसते. श्री गणेश दर्शन करताना लोकांची होणारी लुट समोर आली आहे. ही लूट आम्ही बंद करुन लोकांना तत्काळ पिण्याचे पाणी पुरविणार आहोत, असे जाहीर आश्वासन त्यांनी दिले.

टॅग्स :thaneठाणेWaterपाणीAjit Pawarअजित पवारJitendra Awhadजितेंद्र आव्हाड