शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

भिवंडीत ट्रकच्या धडकेत दुचाकी वरील महिला ठार

By नितीन पंडित | Updated: July 10, 2024 17:46 IST

शहरातील अवजड वाहनांचा प्रश्न ऐरणीवर

भिवंडी: पतीसह दुचाकीवरून जात असलेल्या जोडप्याच्या दुचाकीला अवजड ट्रकने धडक दिल्याने झालेल्या अपघातात पाठीमागे बसलेली महिला जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना भिवंडीतील डॉ. एपीजे अब्दुल कलाम उड्डाणपुलावर बुधवारी दुपारी घडली आहे.या घटनेने शहरात हळहळ पसरली असून शहरात अवजड वाहनांना बंदी असतानाही अवजड ट्रक रस्त्यावर कसे धावतात असा प्रश्न नागरिक विचारत असून अवजड वाहनांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

तेहसीन शहाबाज अंसारी वय अंदाजे २५ वर्ष असे महिलेचे नाव असून सदर महिला आपल्या पतीसह महापोली गावातील एका शाळेत शिक्षिकेचे काम करत होती. मागील वर्षभरापूर्वीच तिचा विवाह झाला होता.बुधवारी हि महिला पती शहाबाज अंसारी यांच्या सह दुचाकीवरून वंजारपट्टी नाका येथील डॉ.एपीजे अब्दुल कलाम उड्डाणपुलावर आली असता अवजड ट्रक ने त्यांच्या दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे.सुदैवाने या अपघातात पती शहाबाज हा वाचला असून त्यास जखमी अवस्थेत खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

शहरात होत असलेल्या प्रचंड वाहतूक कोंडीच्या समस्येतून सुटका मिळण्यासाठी शहरात अवजड वाहनांना बंदी असतानाच भर दुपारी अवजड वाहने उड्डाणपूलांवरून सोडली जात असल्यानेच महिलेचा मृत्यू झाला आहे त्यामुळे या महिलेच्या मृत्यूस अवजड वाहने व वाहतूक पोलिसांचा दुर्लक्षित कारभार जबाबदार असल्यास ची प्रतिक्रिया शहरातील दक्ष नागरिकांकडून येत आहे.

टॅग्स :AccidentअपघातCrime Newsगुन्हेगारीbhiwandiभिवंडी