शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

अजित पवारांसोबत; ठाण्यात आनंद परांजपेनींही सोडली जितेंद्र आव्हाडांची साथ

By जितेंद्र कालेकर | Updated: July 2, 2023 22:29 IST

अजित पवार यांनी शिंदे फडणवीस युती सरकारला पाठिंबा दिल्यानंतर आता ठाणे शहरातही त्यांच्या निकटचे समजले जाणारे काही माजी नगरसेवकही नॉट रीचेबल झाले आहेत.

ठाणे : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी राज्यात भूकंप केला असतांनाच त्याचे पडसाद आता ठाण्यातही उमटले आहेत. राष्ट्रवादीचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष माजी खासदार आनंद परांजपे यांनी अजित पवार यांच्या मुंबईतील देवगिरी निवासस्थानी हजेरी लावली आहे. तसेच अजित पवार यांच्या निकटचे समजले जाणारे ठाण्यातील माजी नगरसेवक देखील आता नॉट रीचेबल झाल्यामुळे राष्ट्रवादीला हा मोठा धक्का समजला जात आहे.

अजित पवार यांनी शिंदे फडणवीस युती सरकारला पाठिंबा दिल्यानंतर आता ठाणे शहरातही त्यांच्या निकटचे समजले जाणारे काही माजी नगरसेवकही नॉट रिचेबल झाले आहेत. यात नजीब मुल्ला यांचे नाव आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे. त्यात मागील काही वर्षे शिवसेना सोडून राष्ट्रवादीमध्ये आलेले आनंद परांजपे यांनीही रविवारी दुपारनंतर अजित पवार यांना समर्थन देत देवगिरी वर हजेरी लावली. परांजपे यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मागील काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीच्या ५ नगरसेवकानी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर राष्ट्रवादी फुटीच्या उंबरठ्यावर असल्याची चर्चा सुरू होती. त्यात रविवारी राज्यात झालेल्या या राजकीय भूकंपानंतर ठाण्यातही राष्ट्रवादीच्या काही पदाधिकारी तसेच माजी नगरसेवकांनी आव्हाड यांची साथ सोडत अजित पवारांना टाळी दिली. त्यामुळे राष्ट्रवादीचा देखील ठाण्यात आता सुपडा साफ होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.आव्हाडांना विरोधी पक्षनेते पद म्हणजे उतावळा नवरा गुढघ्याला बाशिंग असल्याची शिवसेनेची टीका... जितेंद्र आव्हाडांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्याबद्दल शिवसेना शिंदे गटाने खिल्ली उडवली आहे. जितेंद्र आव्हाडांना बहुतेक खूप घाई झाली आहे. ते वाटच बघत होते अजितदादा कधी जातात याची. म्हणूनच स्वतःच सांगत सुटले आहेत विरोधी पक्षनेतेपदाबाबत..मात्र विरोधी पक्षनेते पदाची निवड ही विधानसभा अध्यक्ष यांचा अधिकार आहे. पत्रकार परिषदेत खुद्द शरद पवार यांनीही हेच वक्तव्य केले. त्यामुळे आव्हाड म्हणजे उतावळा नवरा गुढघ्याला बाशिंग, अशी स्थिती झाल्याचा टोला शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी लागवला आहे.

संजय राऊत यांनी शरद पवारांचा क्लिनबोल्ड केल्याची शिंदे गटाची टीका

संजय राऊत यांच्यामुळे शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचा क्लीन बोल्ड झाला आहे. मात्र, त्यांनी शरद पावरांचाही क्लीन बोल्ड केला असून करावे तसे भरावे, ही म्हण पवारांना तंतोतंत लागू राहण्याचा टोला शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी लागवला आहे. संजय राऊत यांच्या मदतीने शिवसेना उद्धव ठाकरे गटाची जी दशा केली त्याच फळ पवारांना मिळालं नियतीने दिलेलं हे बक्षीस असून तुमचा पक्ष संपला आहे आणि याला कारणीभूत संजय राऊत ठरल्याची घणाघाती टीका म्हस्के यांनी केली.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडthaneठाणेNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवार