शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
2
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
3
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
4
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
5
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण
6
ग्रुप बुकिंग केल्यास एसटीने थेट पंढरपूरला जाता येणार, ‘आषाढी’साठी ५ हजार विशेष बसेस : सरनाईक
7
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
8
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
9
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
10
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
11
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
12
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
13
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
14
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
15
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
16
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
17
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
18
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
19
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
20
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य

१५०० रुपयांची लाच घेऊन महाराष्ट्र विकायला देणार का? उद्धव ठाकरे यांचा जनतेला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2024 06:17 IST

एकनाथ शिंदे मोदींसमोर सरपटणारे मांडूळ, अशीही केली टीका

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून १५०० रुपयांची लाच देऊन तुम्हाला विकत घेण्याचा प्रयत्न मिंधे सरकारकडून केला जात आहे. केवळ १५०० रुपयांसाठी तुम्ही महाराष्ट्र विकायला देणार आहात का, असा सवाल उद्धवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी केला. महिलांनी आता ‘आम्हाला लाच नको तर रोजगार द्या’, अशी मागणी केली पाहिजे, असेही ठाकरे म्हणाले.

ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे उद्धवसेनेच्या वतीने ‘भगवा सप्ताहा’च्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ठाकरे बोलत होते. ठाकरे म्हणाले की, आता शिक्षण, पुस्तके यांच्यासह आरोग्य विम्यावर जीएसटी लावला आहे. म्हणजेच ‘जिंदगी के साथ भी आणि जिंदगी के बाद भी जीएसटी भरा’. राज्य सरकारकडून केवळ घोषणांचा पाऊस पाडला जात आहे. तीन महिने थांबा मग तुमचे सरकारी मिंधे यांच्या कलेक्टरांना कुठे पाठवतो ते बघाच, असा इशाराही त्यांनी दिला.

ठाण्याने आजवर शिवसेनेवर प्रेम केले, याच प्रेमापोटी शिवसेना ठाण्यात टिकून आहे. ठाणेकरांनी मेहनत घेतली नसती तर मिंधेची दाढी सुद्धा उगवली नसती, असा टोलाही त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला. आधी १५ लाख देणार होते, आता मात्र १५०० वर बोळवण करण्याचे काम झाले असून वरचे शून्य कोणाच्या खिशात गेले, असा सवाल ठाकरे यांनी केला. ठाण्यात क्लस्टर योजनेची कामे आपल्या मर्जीतील ठेकेदारांनाच दिली जात असल्याचा आरोपही त्यांनी शिंदे सरकारवर केला. त्यांच्या या कृत्यामुळेच ठाणे महापालिकेला कर्जाचे डोहाळे लागले, अशी टीकाही त्यांनी केली.

महाराष्ट्राचे मंत्रालय मुंबई की अहमदाबादला हवे, असा सवाल उपस्थित करीत आताची लढाई ही शिवसेना विरुद्ध मिंधे नसून महाराष्ट्र द्वेष्ट्यांविरुद्ध असल्याचेही ते म्हणाले. विधानसभा निवडणुकीत मशाल पेटवायची आहे, लोकशाहीची हत्या करणाऱ्यांचे बूड जाळायचे आहे, असे ठाकरे म्हणाले. काल नागपंचमी झाली, यादिवशी नागाला दूध पाजतात. उद्धव ठाकरे यांनी ठाण्यातील सापाला दूध पाजले. लोकसभेत शेपट्या वळवळल्या. पण, विधानसभेत आम्ही त्यांचे फणे ठेचून काढल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली.

‘आणि म्हणून...’ची उडवली खिल्ली

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भाषण करताना ‘...आणि म्हणून’ या शब्दांचा वारंवार उल्लेख करतात असा उल्लेख करून उद्धव ठाकरे यांनी बोलायचे तर सरळ बोला, बोलताना यांना पोट साफ करायचे औषध देण्याची वेळ आल्याची टीका केली.

 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेSanjay Rautसंजय राऊत