शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

मीरा-भार्इंदरमध्ये हम करे सो कायदा, यंत्रणा सकारात्मक पावले उचलणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 05:20 IST

वाढते ध्वनी व वायुप्रदूषण रोखणे, ही काळाची गरज आहे. मानवी आरोग्याच्या हिताबरोबरच पर्यावरण व पक्षीप्राण्यांच्या संरक्षणासाठी कायदे बनवले गेले आहेत.

वाढते ध्वनी व वायुप्रदूषण रोखणे, ही काळाची गरज आहे. मानवी आरोग्याच्या हिताबरोबरच पर्यावरण व पक्षीप्राण्यांच्या संरक्षणासाठी कायदे बनवले गेले आहेत. सर्वोच्च व उच्च न्यायालयाचे आदेश व सरकारची भूमिकाही स्पष्ट आहे. परंतु, स्थानिक पातळीवर मात्र प्रशासकीय व राजकीय यंत्रणाच याचे पालन करण्यास गंभीर नाहीत. व्यापक जनजागृती करण्याऐवजी उलट त्याचे उल्लंघन कसे होईल, अशी या दोन्ही यंत्रणांची भूमिका राहिली आहे. पोलीस, पालिकासारख्या यंत्रणाही राजकीय दबाव व धार्मिकतेचा मुद्दा पुढे करून आपली जबाबदारी झटकत असल्याचे यानिमित्ताने मीरा-भार्इंदरमध्ये दिसून आले. दिवाळीत तर मध्यरात्रीनंतरही फटाके फुटत होते. पालिकेनेच उद्याने, मैदाने, रस्ते फटाकेविक्रेत्यांना आंदण दिले. फटाक्यांमुळे ध्वनी व वायुप्रदूषणाने मर्यादा ओलांडलीच, पण दोन दिवसांत ३२ ठिकाणी आगी लागल्या. याला जबाबदार कोण? याचे उत्तर पालिका, पोलिसांसह लोकप्रतिनिधींकडे नाही. मुळात फटाके फोडू नका, असे सरकारचे आवाहन व सर्वोच्च न्यायालयाचे वेळेचे आदेश पाळण्यासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधीच गंभीर नव्हते. त्यांची मानसिकताच दिसली नाही. निदान, यापुढे तरी या यंत्रणा सजग राहतील व नागरिकही आपली जबाबदारी ओळखतील, अशी अपेक्षा आहे. फटाक्यांमुळे होणारा आवाज व धुराच्या त्रासाबद्दल नागरिकांमध्येच असलेली नाराजी काही नवीन नाही. ध्वनिप्रदूषणासारखा कायदा केंद्र सरकारने अमलात आणलेला आहे. यंदा सर्वोच्च न्यायालयानेही व्यापक जनहित पाहता फटाके वाजवण्यासाठी दिवाळीत फक्त दोन तासांची वेळ दिली.

सत्ताधाऱ्यांच्या सांगण्यावरून पालिका प्रशासनाने चक्क पालिकेचे उद्यान, आरजी मैदाने, इतकेच काय तर रस्त्याजवळ फटाकेविक्रीला परवानगी दिली. परवानगी मिळवणाºयांमध्ये नेतेही होते. नागरिकांनी केलेल्या तक्रारींना आयुक्त व पालिका अधिकाºयांनी सरकार व न्यायालयाच्या आदेशांना नेहमीप्रमाणेच हरताळ फासला. पोलीस यंत्रणेनेही फटाके फोडण्यासाठी मोकळे रान दिले. मध्यरात्र उलटून गेल्यावरही सर्रास फटाके फोडले गेले. तक्रारी ऐकून घ्यायच्या नाहीत, म्हणून रात्री येणारे कॉलच घेणे बंद केले.न्यायालय, सरकारने कितीही आदेश, नियम बनवले तरी ते मीरा-भार्इंदर शहरांसाठी लागू होत नाही. येथे आम्ही ठरवू तो कायदा, अशी प्रवृत्ती असल्याने संबंधित यंत्रणाही कारवाई करण्याचे नाव घेत नाही. कारवाई होऊ नये, यासाठी राजकीय दबाव आहे तो वेगळा. आम्ही आमच्या मनाचे राजे, प्रजेची आम्हाला चिंता नाही, अशी वृत्ती येथील राजकीय, प्रशासकीय यंत्रणेत दिसून येते.पोलीस व पालिका देशाचे संविधान, कायदे, न्यायालय तसेच सरकारी आदेशांचे पालन करण्याची हिंमत दाखवत नसतील, तर तेथे उल्लंघन करणाºया बाजारबुणग्यांचे फावणारच. ध्वनिप्रदूषणाला जातधर्म नाही. त्यामुळे ते रोखण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधी, पालिका, पोलीस यांच्यासह जागरूक नागरिकांचीही आहे. शांत झोप व मोकळा श्वास घेण्यासाठी संविधानाने अधिकार दिला असतानाही जर न्यायालयास आदेश काढावे लागतात, कायदे बनवावे लागतात, याचा विचार आता तरी सुजाण नागरिकांसह राजकीय व प्रशासकीय यंत्रणांनी केला पाहिजे. आकस, द्वेष न ठेवता मीरा-भार्इंदरमध्ये या यंत्रणा आतातरी सकारात्मक पावले उचलतील, अशी आशा करायला हरकत नाही. 

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाthaneठाणे