शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

मीरा-भार्इंदरमध्ये हम करे सो कायदा, यंत्रणा सकारात्मक पावले उचलणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 05:20 IST

वाढते ध्वनी व वायुप्रदूषण रोखणे, ही काळाची गरज आहे. मानवी आरोग्याच्या हिताबरोबरच पर्यावरण व पक्षीप्राण्यांच्या संरक्षणासाठी कायदे बनवले गेले आहेत.

वाढते ध्वनी व वायुप्रदूषण रोखणे, ही काळाची गरज आहे. मानवी आरोग्याच्या हिताबरोबरच पर्यावरण व पक्षीप्राण्यांच्या संरक्षणासाठी कायदे बनवले गेले आहेत. सर्वोच्च व उच्च न्यायालयाचे आदेश व सरकारची भूमिकाही स्पष्ट आहे. परंतु, स्थानिक पातळीवर मात्र प्रशासकीय व राजकीय यंत्रणाच याचे पालन करण्यास गंभीर नाहीत. व्यापक जनजागृती करण्याऐवजी उलट त्याचे उल्लंघन कसे होईल, अशी या दोन्ही यंत्रणांची भूमिका राहिली आहे. पोलीस, पालिकासारख्या यंत्रणाही राजकीय दबाव व धार्मिकतेचा मुद्दा पुढे करून आपली जबाबदारी झटकत असल्याचे यानिमित्ताने मीरा-भार्इंदरमध्ये दिसून आले. दिवाळीत तर मध्यरात्रीनंतरही फटाके फुटत होते. पालिकेनेच उद्याने, मैदाने, रस्ते फटाकेविक्रेत्यांना आंदण दिले. फटाक्यांमुळे ध्वनी व वायुप्रदूषणाने मर्यादा ओलांडलीच, पण दोन दिवसांत ३२ ठिकाणी आगी लागल्या. याला जबाबदार कोण? याचे उत्तर पालिका, पोलिसांसह लोकप्रतिनिधींकडे नाही. मुळात फटाके फोडू नका, असे सरकारचे आवाहन व सर्वोच्च न्यायालयाचे वेळेचे आदेश पाळण्यासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधीच गंभीर नव्हते. त्यांची मानसिकताच दिसली नाही. निदान, यापुढे तरी या यंत्रणा सजग राहतील व नागरिकही आपली जबाबदारी ओळखतील, अशी अपेक्षा आहे. फटाक्यांमुळे होणारा आवाज व धुराच्या त्रासाबद्दल नागरिकांमध्येच असलेली नाराजी काही नवीन नाही. ध्वनिप्रदूषणासारखा कायदा केंद्र सरकारने अमलात आणलेला आहे. यंदा सर्वोच्च न्यायालयानेही व्यापक जनहित पाहता फटाके वाजवण्यासाठी दिवाळीत फक्त दोन तासांची वेळ दिली.

सत्ताधाऱ्यांच्या सांगण्यावरून पालिका प्रशासनाने चक्क पालिकेचे उद्यान, आरजी मैदाने, इतकेच काय तर रस्त्याजवळ फटाकेविक्रीला परवानगी दिली. परवानगी मिळवणाºयांमध्ये नेतेही होते. नागरिकांनी केलेल्या तक्रारींना आयुक्त व पालिका अधिकाºयांनी सरकार व न्यायालयाच्या आदेशांना नेहमीप्रमाणेच हरताळ फासला. पोलीस यंत्रणेनेही फटाके फोडण्यासाठी मोकळे रान दिले. मध्यरात्र उलटून गेल्यावरही सर्रास फटाके फोडले गेले. तक्रारी ऐकून घ्यायच्या नाहीत, म्हणून रात्री येणारे कॉलच घेणे बंद केले.न्यायालय, सरकारने कितीही आदेश, नियम बनवले तरी ते मीरा-भार्इंदर शहरांसाठी लागू होत नाही. येथे आम्ही ठरवू तो कायदा, अशी प्रवृत्ती असल्याने संबंधित यंत्रणाही कारवाई करण्याचे नाव घेत नाही. कारवाई होऊ नये, यासाठी राजकीय दबाव आहे तो वेगळा. आम्ही आमच्या मनाचे राजे, प्रजेची आम्हाला चिंता नाही, अशी वृत्ती येथील राजकीय, प्रशासकीय यंत्रणेत दिसून येते.पोलीस व पालिका देशाचे संविधान, कायदे, न्यायालय तसेच सरकारी आदेशांचे पालन करण्याची हिंमत दाखवत नसतील, तर तेथे उल्लंघन करणाºया बाजारबुणग्यांचे फावणारच. ध्वनिप्रदूषणाला जातधर्म नाही. त्यामुळे ते रोखण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधी, पालिका, पोलीस यांच्यासह जागरूक नागरिकांचीही आहे. शांत झोप व मोकळा श्वास घेण्यासाठी संविधानाने अधिकार दिला असतानाही जर न्यायालयास आदेश काढावे लागतात, कायदे बनवावे लागतात, याचा विचार आता तरी सुजाण नागरिकांसह राजकीय व प्रशासकीय यंत्रणांनी केला पाहिजे. आकस, द्वेष न ठेवता मीरा-भार्इंदरमध्ये या यंत्रणा आतातरी सकारात्मक पावले उचलतील, अशी आशा करायला हरकत नाही. 

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाthaneठाणे