शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

यंदा बारावीची परीक्षा हाेणार की नाही? विद्यार्थी, पालक चिंतित 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2021 09:00 IST

राज्यातील बारावीच्या पार्श्वभूमीवर सध्या संभ्रमाचे वातावरण आहे. वर्षभरापेक्षा अधिक काळ झाला. आम्ही अभ्यास करत आहाेत. तरीही बारावी परीक्षेबाबत स्पष्टता नसल्यास बारावीचा अभ्यास करावा की स्पर्धां परीक्षांचा हा विचार विद्यार्थ्यांना अडचणीत टाकत आहे. 

ठाणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावीच्या परीक्षा सीबीएसई बोर्डाने रद्द केल्यानंतर राज्य सरकारनेही एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. पण मे महिना सुरू झाला तरी बारावीच्या परीक्षेचा निर्णय राज्य सरकारने घेतला नसल्याने विद्यार्थ्यांसह पालकांत चिंतेचे वातावरण आहे. ठाण्यातील विद्यार्थी आणि पालकांनी परीक्षेबाबत लवकर निर्णय घेऊन आमच्यावर असलेला ताण दूर करावा, अशी मागणी केली आहे. एक तर अंतर्गत मूल्यमापन करून पास करा किंवा परीक्षेचा निर्णय तरी घ्या, असे विद्यार्थी आणि पालकांनी सरकारला सुचविले आहे.राज्यातील बारावीच्या पार्श्वभूमीवर सध्या संभ्रमाचे वातावरण आहे. वर्षभरापेक्षा अधिक काळ झाला. आम्ही अभ्यास करत आहाेत. तरीही बारावी परीक्षेबाबत स्पष्टता नसल्यास बारावीचा अभ्यास करावा की स्पर्धां परीक्षांचा हा विचार विद्यार्थ्यांना अडचणीत टाकत आहे. विद्यार्थी मानसिक तणावामध्ये आहेत. सरकारने ऑफलाइन परीक्षा न घेता इयत्ता दहावीप्रमाणे अंतर्गत मूल्यमापनाने किंवा इतर पर्यायांचा विचार करून विद्यार्थ्यांना पास करावे, अशी सर्व विद्यार्थ्यांची मागणी असल्याचे विद्यार्थिनी प्रज्ञा माेरे हिने सांगितले, तर सेजल रांगळे ही विद्यार्थिनी म्हणते की, सातत्याने बारावीच्या परीक्षांच्या तारखा पुढे ढकलल्या जात आहेत. त्यात कोरोनाची परिस्थिती असल्याने याचा दुष्परिणाम आमच्या अभ्यासावर होत आहे.  एकीकडे कोरोनाची भीती, त्यात परीक्षेचा गोंधळ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मानसिक ताण वाढत आहे. तारखा पुढे ढकलल्या जात असल्याने अभ्यासातही मन रमेनासे झाले आहे. 

मी बारावीमध्ये असून, या वर्षाची परीक्षा कधी होईल ते अद्याप माहीत नाही. मला आता ५० टक्के इंटरनल गुण व ५० टक्के गुण ऑनलाइन परीक्षा घेऊन देण्यात यावे. जर ऑफलाइन परीक्षा द्यावी लागली तर लवकरात लवकर टाइमटेबल द्यावे. त्यात दोन पेपरमध्ये जास्त वेळ असावा. तोच तोच अभ्यास करून आता डोके थकून गेले आहे. कधी एकदा परीक्षा होते याचीच वाट बघत आहाेत.    - रोहित पांढरे, विद्यार्थी

मुलांच्या परीक्षेचा ताण पालकांवरही असतो. बारावीच्या परीक्षेबाबत निर्णय होत नसल्याने सर्वांवरच टांगती तलवार आहे. विद्यार्थ्यांबरोबर पालकांचा विचार करून ठोस निर्णय लवकर सरकारने घ्यावा. असे किती दिवस तणावात काढायच ?    - संध्या नाकती, पालक 

टॅग्स :examपरीक्षाcorona virusकोरोना वायरस बातम्याStudentविद्यार्थीTeacherशिक्षक