शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

यंदा बारावीची परीक्षा हाेणार की नाही? विद्यार्थी, पालक चिंतित 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2021 09:00 IST

राज्यातील बारावीच्या पार्श्वभूमीवर सध्या संभ्रमाचे वातावरण आहे. वर्षभरापेक्षा अधिक काळ झाला. आम्ही अभ्यास करत आहाेत. तरीही बारावी परीक्षेबाबत स्पष्टता नसल्यास बारावीचा अभ्यास करावा की स्पर्धां परीक्षांचा हा विचार विद्यार्थ्यांना अडचणीत टाकत आहे. 

ठाणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावीच्या परीक्षा सीबीएसई बोर्डाने रद्द केल्यानंतर राज्य सरकारनेही एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. पण मे महिना सुरू झाला तरी बारावीच्या परीक्षेचा निर्णय राज्य सरकारने घेतला नसल्याने विद्यार्थ्यांसह पालकांत चिंतेचे वातावरण आहे. ठाण्यातील विद्यार्थी आणि पालकांनी परीक्षेबाबत लवकर निर्णय घेऊन आमच्यावर असलेला ताण दूर करावा, अशी मागणी केली आहे. एक तर अंतर्गत मूल्यमापन करून पास करा किंवा परीक्षेचा निर्णय तरी घ्या, असे विद्यार्थी आणि पालकांनी सरकारला सुचविले आहे.राज्यातील बारावीच्या पार्श्वभूमीवर सध्या संभ्रमाचे वातावरण आहे. वर्षभरापेक्षा अधिक काळ झाला. आम्ही अभ्यास करत आहाेत. तरीही बारावी परीक्षेबाबत स्पष्टता नसल्यास बारावीचा अभ्यास करावा की स्पर्धां परीक्षांचा हा विचार विद्यार्थ्यांना अडचणीत टाकत आहे. विद्यार्थी मानसिक तणावामध्ये आहेत. सरकारने ऑफलाइन परीक्षा न घेता इयत्ता दहावीप्रमाणे अंतर्गत मूल्यमापनाने किंवा इतर पर्यायांचा विचार करून विद्यार्थ्यांना पास करावे, अशी सर्व विद्यार्थ्यांची मागणी असल्याचे विद्यार्थिनी प्रज्ञा माेरे हिने सांगितले, तर सेजल रांगळे ही विद्यार्थिनी म्हणते की, सातत्याने बारावीच्या परीक्षांच्या तारखा पुढे ढकलल्या जात आहेत. त्यात कोरोनाची परिस्थिती असल्याने याचा दुष्परिणाम आमच्या अभ्यासावर होत आहे.  एकीकडे कोरोनाची भीती, त्यात परीक्षेचा गोंधळ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मानसिक ताण वाढत आहे. तारखा पुढे ढकलल्या जात असल्याने अभ्यासातही मन रमेनासे झाले आहे. 

मी बारावीमध्ये असून, या वर्षाची परीक्षा कधी होईल ते अद्याप माहीत नाही. मला आता ५० टक्के इंटरनल गुण व ५० टक्के गुण ऑनलाइन परीक्षा घेऊन देण्यात यावे. जर ऑफलाइन परीक्षा द्यावी लागली तर लवकरात लवकर टाइमटेबल द्यावे. त्यात दोन पेपरमध्ये जास्त वेळ असावा. तोच तोच अभ्यास करून आता डोके थकून गेले आहे. कधी एकदा परीक्षा होते याचीच वाट बघत आहाेत.    - रोहित पांढरे, विद्यार्थी

मुलांच्या परीक्षेचा ताण पालकांवरही असतो. बारावीच्या परीक्षेबाबत निर्णय होत नसल्याने सर्वांवरच टांगती तलवार आहे. विद्यार्थ्यांबरोबर पालकांचा विचार करून ठोस निर्णय लवकर सरकारने घ्यावा. असे किती दिवस तणावात काढायच ?    - संध्या नाकती, पालक 

टॅग्स :examपरीक्षाcorona virusकोरोना वायरस बातम्याStudentविद्यार्थीTeacherशिक्षक