शहरं
Join us  
Trending Stories
1
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
2
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
3
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
4
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
5
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
6
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
7
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
8
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
9
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
10
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
11
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
12
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
13
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
14
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
15
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
16
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
17
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
18
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
19
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
20
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी

यंदा बारावीची परीक्षा हाेणार की नाही? विद्यार्थी, पालक चिंतित 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2021 09:00 IST

राज्यातील बारावीच्या पार्श्वभूमीवर सध्या संभ्रमाचे वातावरण आहे. वर्षभरापेक्षा अधिक काळ झाला. आम्ही अभ्यास करत आहाेत. तरीही बारावी परीक्षेबाबत स्पष्टता नसल्यास बारावीचा अभ्यास करावा की स्पर्धां परीक्षांचा हा विचार विद्यार्थ्यांना अडचणीत टाकत आहे. 

ठाणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावीच्या परीक्षा सीबीएसई बोर्डाने रद्द केल्यानंतर राज्य सरकारनेही एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. पण मे महिना सुरू झाला तरी बारावीच्या परीक्षेचा निर्णय राज्य सरकारने घेतला नसल्याने विद्यार्थ्यांसह पालकांत चिंतेचे वातावरण आहे. ठाण्यातील विद्यार्थी आणि पालकांनी परीक्षेबाबत लवकर निर्णय घेऊन आमच्यावर असलेला ताण दूर करावा, अशी मागणी केली आहे. एक तर अंतर्गत मूल्यमापन करून पास करा किंवा परीक्षेचा निर्णय तरी घ्या, असे विद्यार्थी आणि पालकांनी सरकारला सुचविले आहे.राज्यातील बारावीच्या पार्श्वभूमीवर सध्या संभ्रमाचे वातावरण आहे. वर्षभरापेक्षा अधिक काळ झाला. आम्ही अभ्यास करत आहाेत. तरीही बारावी परीक्षेबाबत स्पष्टता नसल्यास बारावीचा अभ्यास करावा की स्पर्धां परीक्षांचा हा विचार विद्यार्थ्यांना अडचणीत टाकत आहे. विद्यार्थी मानसिक तणावामध्ये आहेत. सरकारने ऑफलाइन परीक्षा न घेता इयत्ता दहावीप्रमाणे अंतर्गत मूल्यमापनाने किंवा इतर पर्यायांचा विचार करून विद्यार्थ्यांना पास करावे, अशी सर्व विद्यार्थ्यांची मागणी असल्याचे विद्यार्थिनी प्रज्ञा माेरे हिने सांगितले, तर सेजल रांगळे ही विद्यार्थिनी म्हणते की, सातत्याने बारावीच्या परीक्षांच्या तारखा पुढे ढकलल्या जात आहेत. त्यात कोरोनाची परिस्थिती असल्याने याचा दुष्परिणाम आमच्या अभ्यासावर होत आहे.  एकीकडे कोरोनाची भीती, त्यात परीक्षेचा गोंधळ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मानसिक ताण वाढत आहे. तारखा पुढे ढकलल्या जात असल्याने अभ्यासातही मन रमेनासे झाले आहे. 

मी बारावीमध्ये असून, या वर्षाची परीक्षा कधी होईल ते अद्याप माहीत नाही. मला आता ५० टक्के इंटरनल गुण व ५० टक्के गुण ऑनलाइन परीक्षा घेऊन देण्यात यावे. जर ऑफलाइन परीक्षा द्यावी लागली तर लवकरात लवकर टाइमटेबल द्यावे. त्यात दोन पेपरमध्ये जास्त वेळ असावा. तोच तोच अभ्यास करून आता डोके थकून गेले आहे. कधी एकदा परीक्षा होते याचीच वाट बघत आहाेत.    - रोहित पांढरे, विद्यार्थी

मुलांच्या परीक्षेचा ताण पालकांवरही असतो. बारावीच्या परीक्षेबाबत निर्णय होत नसल्याने सर्वांवरच टांगती तलवार आहे. विद्यार्थ्यांबरोबर पालकांचा विचार करून ठोस निर्णय लवकर सरकारने घ्यावा. असे किती दिवस तणावात काढायच ?    - संध्या नाकती, पालक 

टॅग्स :examपरीक्षाcorona virusकोरोना वायरस बातम्याStudentविद्यार्थीTeacherशिक्षक