शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

नवी मुंबई विमानतळाला 'दिबां'चे नाव देण्याकरिता संघर्ष करणार- कपिल पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2021 12:15 IST

बुधवारी कपिल पाटील यांनी केंद्रीय राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली असून, त्यांच्याकडे पंचायत राज विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली.

- नितीन पंडितभिवंडी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठ्या विश्वासाने केंद्रीय राज्यमंत्रिपदाची जबाबदारी माझ्यावर सोपविली असून, मिळालेल्या संधीचा फायदा देश विकासासाठी जास्तीत-जास्त कसा होईल, त्याचबरोबर आपली जन्मभूमी असलेल्या भिवंडी लोकसभा मतदारसंघाबरोबरच ठाणे जिल्ह्याचा विकास कसा होईल, याकडे आपण विशेष लक्ष देणार असल्याचे प्रतिपादन नवनियुक्त केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी `लोकमत`कडे केले. ठाणे जिल्ह्यातील सर्व निवडणुकांत भाजपची पताका डौलाने फडकवत ठेवण्याकरिता पक्ष सोपवेल ती जबाबदारी पार पाडण्याची ग्वाही पाटील यांनी दिली.

बुधवारी कपिल पाटील यांनी केंद्रीय राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली असून, त्यांच्याकडे पंचायत राज विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली. पदाची शपथ घेतल्यानंतर पाटील यांनी पहिल्यांदा `लोकमत`ला प्रतिक्रिया दिली. ठाणे जिल्ह्यातील आगामी महापालिका निवडणुकांमध्ये पाटील नेमकी काय भूमिका बजावणार, तुमचा सामना शिवसेनेसोबत होणार का, असे विचारले असता ते म्हणाले की, आता मी देशाचा राज्यमंत्री झालो आहे. त्यामुळे देशाचा विकास व देशाचे काम करण्याची संधी मला मिळाली असून, त्याकडेच सध्या माझे लक्ष आहे. 

नवी मुंबईत विमानतळाला स्व. लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यावरून आंदोलन सुरू आहे. त्याबाबत विचारले असता पाटील म्हणाले की, नवी मुंबई विमानतळाला स्व. लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे, अशी माझ्यासह स्थानिक भूमिपुत्रांची मागणी आहे. नवी मुंबई विमानतळाकरिता भूमिपुत्रांनी त्याग केला आहे. त्यामुळे त्यांच्या भावनांचा आदर केला गेलाच पाहिजे. त्याबाबत राज्य सरकार कोणती भूमिका घेते, याकडे आमचे लक्ष आहे.

टॅग्स :Kapil Patilकपिल मोरेश्वर पाटीलBJPभाजपाNavi Mumbaiनवी मुंबईMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार