शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

पुन्हा शिवसेना गड राखणार की, मनसेचे इंजीन धावणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2019 01:32 IST

२०१४ सालच्या निवडणुकीत शिवसेनेचे सुभाष भोईर हे निवडून आले होते. त्यामुळे मनसेला विजयाचे सातत्य राखता आले नाही.

मुरलीधर भवार।लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : कल्याण ग्रामीण मतदारसंघातून शिवसेनेचे रमेश म्हात्रे यांचा सामना मनसेचे उमेदवार राजू पाटील यांच्यासोबत होणार आहे. शिवसेनेचे विद्यमान आमदार सुभाष भोईर यांची उमेदवारी कापून त्यांच्या जागी म्हात्रे यांना उमेदवारी दिली आहे. २००९ साली राजू पाटील यांचे मोठे भाऊ रमेश पाटील यांनी रमेश म्हात्रे यांचा पराभव केला होता. तेव्हाही म्हात्रे हे शिवसेनेचे उमेदवार होते. २००९ साली मनसेचे इंजीन कल्याण ग्रामीणमध्ये घुसले होते.

मात्र, २०१४ सालच्या निवडणुकीत शिवसेनेचे सुभाष भोईर हे निवडून आले होते. त्यामुळे मनसेला विजयाचे सातत्य राखता आले नाही. २०१५ सालापासून महापालिकेत समाविष्ट केलेल्या २७ गावांचा मुद्दा गाजतो. स्वतंत्र नगरपालिकेच्या मागणीसाठी सरकारकडून आश्वासन दिले जात आहे. तसेच २७ गावे व नवी मुंबईतून वगळलेली १४ गावे आणि दिव्याच्या विकासाचा मुद्दा आहे. त्याचबरोबर या गावांना जोडणाऱ्या कल्याण-शीळ रोडवरील वाहतूककोंडीचा मुद्दाही महत्त्वाचा आहे. या मुद्याभोवती या मतदारसंघात म्हात्रे विरुद्ध पाटील यांच्यात खरा सामना रंगला आहे. तो निश्चितच पाहण्यासारखा असेल.जमेच्या बाजूशिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक आहेत. स्थायी समिती सभापतीचे पद चारवेळा भूषविले आहे. महापालिकेच्या महासभेत आरोग्य, बीएसयूपीची घरे, पाणीटंचाई या प्रश्नांवर प्रशासनाला धारेवर धरले. नगरसेवकपदाचा दांडगा अनुभव. त्यांच्या पत्नीदेखील नगरसेविका आहेत. २७ गावांच्या विकासासाठी आग्रही आहेत. प्रदूषणाच्या मुद्यावर त्यांनी अधिकाºयाना घेरले होते. निवडणुकीचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे.२००९ ते २०१४ या कालावधीत त्यांचे भाऊ रमेश पाटील हे या मतदारसंघाचे मनसेचे आमदार होते. २०१४ साली राजू पाटील यांनी मनसेच्या वतीने कल्याण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली आहे. त्यामुळे त्यांच्या गाठीशी निवडणुकीचा अनुभव आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रिय आहेत. राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाचा पाठिंबा आहे. राज ठाकरे यांचे निकटवर्तीय आहेत. त्यामुळे यशाचा दावा करीत आहेत.उणे बाजूस्पष्टवक्तेपणा हा गुण आहे. पण, राजकारणात काही वेळेस तो सगळ्यांनाच रूचत नाही. २७ गावे वेगळी करण्याच्या मुद्यावर सर्वपक्षीय संघर्ष समिती ठाम असताना शिवसेनेने ही गावे महापालिकेत समाविष्ट आहेत, त्यामुळे ती राहू द्यावीत. वेगळी करू नयेत, ही आग्रही भूमिका घेतली. पक्षाची ही भूमिका कदाचित त्रासदायक ठरू शकते. २७ गावांतील वेगळ्या नगरपालिकेचा मुद्दा हा शिवसेनेला मान्य नाही.पक्षाचे नेतेपद त्यांच्याकडे असूनदेखील पक्षाच्या अनेक स्थानिक कार्यक्रमांना ते उपस्थिती लावत नाहीत. पक्षाच्या कार्यक्रमातील प्रसिद्धीपासून ते दूर राहणे पसंत करतात. त्यांच्या संपर्काचा मुद्दा पक्षात चर्चिला जातो. पदाधिकाऱ्यांचेही फोन घेत नाहीत, असे पदाधिकारीच सांगतात. व्यवसायानिमित्त परदेशी दौºयावर असतात. त्यामुळे कार्यकर्त्यांना सहज उपलब्ध होत नाहीत, अशी तक्रार आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाMNSमनसेkalyan-rural-acकल्याण ग्रामीण