शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचं टार्गेट किलिंग! ५ मिलियन डॉलरचे इनाम असलेला टॉप कमांडर बेरूतमध्ये हवाई हल्ल्यात उडवला
2
शेख हसीनांच्या प्रत्यार्पणासाठी बांगलादेशची भारताला थेट मागणी; फाशीच्या शिक्षेमुळे वाढले टेन्शन!
3
Wing Commander Namansh Syal :'भारत माता की जय'च्या घोषणा, हजारो नागरिकांच्या उपस्थितीत वीरपत्नीचा 'तो' अखेरचा सॅल्यूट...
4
India ODI Squad vs SA: भारतीय वनडे संघाची घोषणा! KL राहुल कॅप्टन; ऋतुराजलाही मिळाली संधी
5
Travel : भारतातील ५ सुंदर गावं, जिथे फिरायला जाल तर इटली अन् पॅरिसही विसराल! पाहा कुठे आहेत...
6
अल-फलाह डॉक्टरांच्या अटकेनंतर सर्च ऑपरेशन सुरू; मशिदीतून संशयास्पद पावडरसह विदेशी दारूही जप्त!
7
“स्वामी समर्थांनी सांगितले, आळशी माणसाचे तोंड पाहू नका”; शिंदेंचा नाव न घेता ठाकरेंना टोला
8
गुरुवारी दत्त जयंती २०२५: ११ दिवस सेवा करा, नक्की फल मिळेल; काळजी सोडा, स्वामी शुभच करतील!
9
संतापजनक! सोयाबीनची भाजी केली म्हणून पतीने पत्नीचे डोके फोडले; सिद्धार्थनगरमध्ये हादरवणारी घटना
10
बिबट्या पुण्याच्या वेशीवर; पहाटे पहाटे औंधमध्ये  बिबट्याचे दर्शन; पुणे शहरात खळबळ, वनविभाग आणि RESQ सतर्क
11
“काँग्रेसच्या विकासकांमाची यादी करायची तर कागद संपतो, भाजपाने मात्र...”: हर्षवर्धन सपकाळ
12
IND vs SA 2nd Test Day 2 Stumps : धोक्याची घंटा वाजली! टीम इंडिया पलटवार करू शकेल का?
13
६, ९, ५, २२ अन् २५ हे केवळ अंक नाहीत, अयोध्या राम मंदिराशी खास कनेक्शन; तुम्हाला माहितीये?
14
"महिलेचा गर्भपात, पती म्हणून अनंत गर्जेंचे नाव"; डॉक्टर गौरींना मिळाली होती कागदपत्रे, प्रकरणाला धक्कादायक वळण
15
Smriti Mandhana Wedding Postponed: वडिलांची तब्येत बिघडली; स्मृतीनं घेतला लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय
16
"अनंतचा फोन आलेला, खूप रडत होता; त्याने मला सांगितलं की..."; गौरी पालवे प्रकरणावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
17
Video - क्लिनिकबाहेर उभ्या असलेल्या डॉक्टरला आला हार्ट अटॅक, खाली कोसळला अन्...
18
“भाजपाने सुसंस्कृत राजकारण सोडले, सरकार नैतिक कर्तव्य विसरले”; सुप्रिया सुळेंची टीका
19
भारताच्या तेल पुरवठ्यावर अमेरिकेचा मोठा 'बॅन'; रशियाकडून मिळणारे ४०% स्वस्त तेल आता कमी होणार?
20
सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच मिळणार फायदे! नवीन लेबर कोडमुळे कामगारांना मिळणार मोठा आधार
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा शिवसेना गड राखणार की, मनसेचे इंजीन धावणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2019 01:32 IST

२०१४ सालच्या निवडणुकीत शिवसेनेचे सुभाष भोईर हे निवडून आले होते. त्यामुळे मनसेला विजयाचे सातत्य राखता आले नाही.

मुरलीधर भवार।लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : कल्याण ग्रामीण मतदारसंघातून शिवसेनेचे रमेश म्हात्रे यांचा सामना मनसेचे उमेदवार राजू पाटील यांच्यासोबत होणार आहे. शिवसेनेचे विद्यमान आमदार सुभाष भोईर यांची उमेदवारी कापून त्यांच्या जागी म्हात्रे यांना उमेदवारी दिली आहे. २००९ साली राजू पाटील यांचे मोठे भाऊ रमेश पाटील यांनी रमेश म्हात्रे यांचा पराभव केला होता. तेव्हाही म्हात्रे हे शिवसेनेचे उमेदवार होते. २००९ साली मनसेचे इंजीन कल्याण ग्रामीणमध्ये घुसले होते.

मात्र, २०१४ सालच्या निवडणुकीत शिवसेनेचे सुभाष भोईर हे निवडून आले होते. त्यामुळे मनसेला विजयाचे सातत्य राखता आले नाही. २०१५ सालापासून महापालिकेत समाविष्ट केलेल्या २७ गावांचा मुद्दा गाजतो. स्वतंत्र नगरपालिकेच्या मागणीसाठी सरकारकडून आश्वासन दिले जात आहे. तसेच २७ गावे व नवी मुंबईतून वगळलेली १४ गावे आणि दिव्याच्या विकासाचा मुद्दा आहे. त्याचबरोबर या गावांना जोडणाऱ्या कल्याण-शीळ रोडवरील वाहतूककोंडीचा मुद्दाही महत्त्वाचा आहे. या मुद्याभोवती या मतदारसंघात म्हात्रे विरुद्ध पाटील यांच्यात खरा सामना रंगला आहे. तो निश्चितच पाहण्यासारखा असेल.जमेच्या बाजूशिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक आहेत. स्थायी समिती सभापतीचे पद चारवेळा भूषविले आहे. महापालिकेच्या महासभेत आरोग्य, बीएसयूपीची घरे, पाणीटंचाई या प्रश्नांवर प्रशासनाला धारेवर धरले. नगरसेवकपदाचा दांडगा अनुभव. त्यांच्या पत्नीदेखील नगरसेविका आहेत. २७ गावांच्या विकासासाठी आग्रही आहेत. प्रदूषणाच्या मुद्यावर त्यांनी अधिकाºयाना घेरले होते. निवडणुकीचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे.२००९ ते २०१४ या कालावधीत त्यांचे भाऊ रमेश पाटील हे या मतदारसंघाचे मनसेचे आमदार होते. २०१४ साली राजू पाटील यांनी मनसेच्या वतीने कल्याण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली आहे. त्यामुळे त्यांच्या गाठीशी निवडणुकीचा अनुभव आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रिय आहेत. राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाचा पाठिंबा आहे. राज ठाकरे यांचे निकटवर्तीय आहेत. त्यामुळे यशाचा दावा करीत आहेत.उणे बाजूस्पष्टवक्तेपणा हा गुण आहे. पण, राजकारणात काही वेळेस तो सगळ्यांनाच रूचत नाही. २७ गावे वेगळी करण्याच्या मुद्यावर सर्वपक्षीय संघर्ष समिती ठाम असताना शिवसेनेने ही गावे महापालिकेत समाविष्ट आहेत, त्यामुळे ती राहू द्यावीत. वेगळी करू नयेत, ही आग्रही भूमिका घेतली. पक्षाची ही भूमिका कदाचित त्रासदायक ठरू शकते. २७ गावांतील वेगळ्या नगरपालिकेचा मुद्दा हा शिवसेनेला मान्य नाही.पक्षाचे नेतेपद त्यांच्याकडे असूनदेखील पक्षाच्या अनेक स्थानिक कार्यक्रमांना ते उपस्थिती लावत नाहीत. पक्षाच्या कार्यक्रमातील प्रसिद्धीपासून ते दूर राहणे पसंत करतात. त्यांच्या संपर्काचा मुद्दा पक्षात चर्चिला जातो. पदाधिकाऱ्यांचेही फोन घेत नाहीत, असे पदाधिकारीच सांगतात. व्यवसायानिमित्त परदेशी दौºयावर असतात. त्यामुळे कार्यकर्त्यांना सहज उपलब्ध होत नाहीत, अशी तक्रार आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाMNSमनसेkalyan-rural-acकल्याण ग्रामीण