शहरं
Join us  
Trending Stories
1
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
2
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
5
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
6
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
7
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
8
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
9
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
10
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
11
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
12
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
13
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
14
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
15
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
16
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
17
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
18
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
19
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

पुन्हा शिवसेना गड राखणार की, मनसेचे इंजीन धावणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2019 01:32 IST

२०१४ सालच्या निवडणुकीत शिवसेनेचे सुभाष भोईर हे निवडून आले होते. त्यामुळे मनसेला विजयाचे सातत्य राखता आले नाही.

मुरलीधर भवार।लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : कल्याण ग्रामीण मतदारसंघातून शिवसेनेचे रमेश म्हात्रे यांचा सामना मनसेचे उमेदवार राजू पाटील यांच्यासोबत होणार आहे. शिवसेनेचे विद्यमान आमदार सुभाष भोईर यांची उमेदवारी कापून त्यांच्या जागी म्हात्रे यांना उमेदवारी दिली आहे. २००९ साली राजू पाटील यांचे मोठे भाऊ रमेश पाटील यांनी रमेश म्हात्रे यांचा पराभव केला होता. तेव्हाही म्हात्रे हे शिवसेनेचे उमेदवार होते. २००९ साली मनसेचे इंजीन कल्याण ग्रामीणमध्ये घुसले होते.

मात्र, २०१४ सालच्या निवडणुकीत शिवसेनेचे सुभाष भोईर हे निवडून आले होते. त्यामुळे मनसेला विजयाचे सातत्य राखता आले नाही. २०१५ सालापासून महापालिकेत समाविष्ट केलेल्या २७ गावांचा मुद्दा गाजतो. स्वतंत्र नगरपालिकेच्या मागणीसाठी सरकारकडून आश्वासन दिले जात आहे. तसेच २७ गावे व नवी मुंबईतून वगळलेली १४ गावे आणि दिव्याच्या विकासाचा मुद्दा आहे. त्याचबरोबर या गावांना जोडणाऱ्या कल्याण-शीळ रोडवरील वाहतूककोंडीचा मुद्दाही महत्त्वाचा आहे. या मुद्याभोवती या मतदारसंघात म्हात्रे विरुद्ध पाटील यांच्यात खरा सामना रंगला आहे. तो निश्चितच पाहण्यासारखा असेल.जमेच्या बाजूशिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक आहेत. स्थायी समिती सभापतीचे पद चारवेळा भूषविले आहे. महापालिकेच्या महासभेत आरोग्य, बीएसयूपीची घरे, पाणीटंचाई या प्रश्नांवर प्रशासनाला धारेवर धरले. नगरसेवकपदाचा दांडगा अनुभव. त्यांच्या पत्नीदेखील नगरसेविका आहेत. २७ गावांच्या विकासासाठी आग्रही आहेत. प्रदूषणाच्या मुद्यावर त्यांनी अधिकाºयाना घेरले होते. निवडणुकीचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे.२००९ ते २०१४ या कालावधीत त्यांचे भाऊ रमेश पाटील हे या मतदारसंघाचे मनसेचे आमदार होते. २०१४ साली राजू पाटील यांनी मनसेच्या वतीने कल्याण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली आहे. त्यामुळे त्यांच्या गाठीशी निवडणुकीचा अनुभव आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रिय आहेत. राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाचा पाठिंबा आहे. राज ठाकरे यांचे निकटवर्तीय आहेत. त्यामुळे यशाचा दावा करीत आहेत.उणे बाजूस्पष्टवक्तेपणा हा गुण आहे. पण, राजकारणात काही वेळेस तो सगळ्यांनाच रूचत नाही. २७ गावे वेगळी करण्याच्या मुद्यावर सर्वपक्षीय संघर्ष समिती ठाम असताना शिवसेनेने ही गावे महापालिकेत समाविष्ट आहेत, त्यामुळे ती राहू द्यावीत. वेगळी करू नयेत, ही आग्रही भूमिका घेतली. पक्षाची ही भूमिका कदाचित त्रासदायक ठरू शकते. २७ गावांतील वेगळ्या नगरपालिकेचा मुद्दा हा शिवसेनेला मान्य नाही.पक्षाचे नेतेपद त्यांच्याकडे असूनदेखील पक्षाच्या अनेक स्थानिक कार्यक्रमांना ते उपस्थिती लावत नाहीत. पक्षाच्या कार्यक्रमातील प्रसिद्धीपासून ते दूर राहणे पसंत करतात. त्यांच्या संपर्काचा मुद्दा पक्षात चर्चिला जातो. पदाधिकाऱ्यांचेही फोन घेत नाहीत, असे पदाधिकारीच सांगतात. व्यवसायानिमित्त परदेशी दौºयावर असतात. त्यामुळे कार्यकर्त्यांना सहज उपलब्ध होत नाहीत, अशी तक्रार आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाMNSमनसेkalyan-rural-acकल्याण ग्रामीण