शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

मेट्रोचा सेस रद्द न केल्यास याचिका दाखल करणार; बिल्डर संघटनेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2020 00:51 IST

मुख्यमंत्र्यांची घेणार भेट, बेकायदा बांधकामांना गृहकर्ज कशाच्या आधारे?

कल्याण : ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रोच्या कामाची एक वीटही कल्याण-डोंबिवलीत रचलेली नसताना या प्रकल्पाच्या बदल्यात बिल्डरांकडून दोन टक्के सेस आकारण्याच्या नोटिसा पाठविल्या जात आहेत. हा सेस रद्द करण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून एमसीएचआय संघटनेतर्फे केली जाणार आहे. त्यानंतरही सेस रद्द न केल्यास याचिका दाखल करण्याचा इशारा संघटनेचे माजी अध्यक्ष, तथा सदस्य रवी पाटील यांनी दिला आहे.

एसीएचआयतर्फे कल्याणमध्ये भरवण्यात येणाऱ्या प्रॉपर्टी एक्स्पोसंदर्भात माहिती देण्यासाठी मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पाटील यांनी ही माहिती दिली. यावेळी एमसीएचआयचे अध्यक्ष दीपक मेहता, सचिव मिलिंद चव्हाण, दिनेश मेहता, जयेश तिवारी, मिलिंद कुलकर्णी, मोहित भोईर आणि एक्स्पोचे अध्यक्ष मिलिंद वरक आदी मान्यवर उपस्थित होते.

पाटील म्हणाले, ‘नोटबंदी, त्यानंतर आर्थिक मंदीतून बिल्डर सावरत असताना सरकारने मेट्रोच्या बदल्यात दोन टक्के सेस लागू केला आहे. हा सेस बिल्डरांनी २०१७ पासून भरायचा आहे. मेट्रो रेल्वेचा पत्ताच नसताना कल्याण-डोंबिवलीतील सर्वच बिल्डरांना नोटिसा धाडल्या आहेत. याउलट मुंबईत मेट्रो परिसर नजीकच्या बिल्डरांकडून सेस आकारला गेला. त्यामुळे येथील सर्व बिल्डरांना नोटिसा पाठवणे अन्यायकारक आहे. शिवाय सेस कधीपर्यंत आकारला जाणार याविषयीही सुस्पष्टता नाही. सेस रद्द करण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे यांना भेटून निवेदन देण्यात येणार आहे. सेस रद्द न केल्यास न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार आहे.’

ते पुढे म्हणाले, ‘महापालिका बिल्डरांकडून विकासकराची आकारणी करते. त्यावेळी बिल्डराकंडून अनामत रक्कम घेतली जाते. मात्र, ही रक्कम अद्याप एकाही बिल्डरला परत केलेली नाही. असे असतानाही त्यात दोन टक्के कामगार व पाच टक्के इन्फ्रास्ट्रक्चर कराची भर पडली आहे.’गृहकर्ज, घरनोंदणी कशी होते?एकीकडे महापालिका हद्दीत ७० अधिकृत बिल्डरांचे रेरा नोंदणीकृत १५० गृहप्रकल्प सध्या सुरू आहेत. मात्र, दुसरीकडे बेकायदा बांधकामांचे प्रमाण सगळ्यात जास्त आहे. असे असतानाही त्यांना वीज, पाणी पुरविले जाते. बेकायदा बांधकामांमधील घरे विकून सामान्य नागरिकांची फसवणूक केली जात आहे. बेकायदा बांधकामांमध्ये घरे घेणाऱ्यांना बँका गृहकर्ज कशाच्या आधारे देतात, असा सवाल पाटील यांनी केला.बेकायदा बांधकामांच्या विरोधात महापालिकेकडून कारवाई होत नाही. तर, दुसरीकडे अशा बांधकामांमधील घरांची उपनिबंधक कार्यालयातून कशी नोंदणी होते? मध्यंतरी ठाणे जिल्हाधिकाºयांनी घरांची नोंदणी स्थगित केली होती. मात्र पुन्हा बेकायदा नोंदणी करण्यात आली. त्याकडेही सरकारी यंत्रणेचे दुर्लक्ष होत आहे, असा आरोपही पाटील यांनी केला आहे.

टॅग्स :Metroमेट्रो