शहरं
Join us  
Trending Stories
1
India Lifts First ODI World Cup Trophy: हरमनप्रीतसह संघातील खेळाडूंनी खास अंदाजात उंचावली ट्रॉफी (VIDEO)
2
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
3
‘परिवहन’ची मंजुरी इलेक्ट्रिकला अन् सुसाट धावतात पेट्रोल बाइक टॅक्सी; कारवाईला ठेंगा
4
महापौर आमचाच होऊ दे; उद्धव ठाकरे यांचे महोत्सवात देवाला गाऱ्हाणे; कार्यकर्त्यांना सल्ला
5
पॅलेस्टाइन-इस्रायल युद्धाच्या झळांनी होरपळलेले नागरिक आणि ‘कलिंगड’ आइस्क्रीम!
6
अग्रलेख: ‘सत्या’च्या मोर्चात ‘महा-मनसे’! मविआ + राज ठाकरे : शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे !!
7
विशेष लेख: शेतकऱ्यांना कर्जमुक्ती नाही, तर आम्ही थांबणार नाही; हा एल्गार थांबणार नाही..!!
8
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
9
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
10
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
11
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
12
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
13
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
14
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
15
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
16
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
17
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
18
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
19
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
20
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!

सुक्या कचऱ्याच्या वर्गीकरणाचा प्रकल्प जानेवारी अखेरीस सुरू होणार ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2018 17:45 IST

मीरा-भार्इंदर महापालिका हद्दीतील कचऱ्याचे सरकारी आदेशानुसार ओला व सुका असे वर्गीकरण करण्याची कार्यवाही प्रशासनाने काही महिन्यांपासून सुरू केली आहे.

- राजू काळेभार्इंदर - मीरा-भार्इंदर महापालिका हद्दीतील कचऱ्याचे सरकारी आदेशानुसार ओला व सुका असे वर्गीकरण करण्याची कार्यवाही प्रशासनाने काही महिन्यांपासून सुरू केली आहे. मात्र वर्गीकरण झालेल्या कचऱ्यावर प्रक्रियाच होत नसल्याचा आरोप प्रशासनावर होत असताना त्यातील सुका कचऱ्याच्या वर्गीकरणाचा प्रकल्प जानेवारीच्या अखेरीस तर ओला कचऱ्यावरील प्रक्रियेसाठी तांत्रिक अडचणीमुळे एप्रिल महिना उजाडणार असल्याची माहिती आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी खास लोकमतला दिली.पालिका हद्दीत दिवसाकाठी सुमारे ४०० ते ५०० मेट्रिक टन कचरा निर्माण होतो. हा कचरा उत्तन येथील धावगी-डोंगर घनकचरा प्रकल्पात टाकला जातो. एकत्रितपणे टाकण्यात येणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया होत नसल्याने त्यातून दुर्गंधीचे साम्राज्य परिसरात पसरू लागले आहे. त्यातील सांडपाणी आसपासच्या रहिवासी क्षेत्रात जाऊ लागले असून साठलेल्या कच-याला आॅक्सिजन न मिळाल्याने मिथेन वायू तयार होऊन त्याला सतत आगी लागल्याच्या घटनांमुळे स्थानिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे हा प्रकल्पच तेथून स्थलांतर करण्याची मागणी स्थानिकांकडून होऊ लागली आहे. यावर त्यांनी नागरी हक्क समितीच्या माध्यमातून राष्ट्रीय हरित लवादाकडे याचिकासुद्धा दाखल केली आहे. त्यावर अनेकदा पार पडलेल्या सुनावणीत लवादाने पालिकेला त्वरित कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करण्याचे निर्देश पालिकेला दिले.दरम्यान, पालिकेला ७० कोटींची रक्कम एस्क्रो खात्यात जमा करण्याचे निर्देशही देण्यात आले. त्यावर पालिकेने हा प्रकल्प वसई तालुक्यातील सकवार येथे स्थलांतर करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आल्याचे लवादाच्या निदर्शनास आणून दिले. या प्रकल्पात कच-यापासून वीजनिर्मिती करण्यात येणार असून, प्रकल्पाचा अंदाजे खर्च १५० कोटी असल्याचे स्पष्ट केले. त्यावर प्रकल्पाची ५० टक्के रक्कम जमा करण्याचे आदेशही पालिकेला देण्यात आले. परंतु पालिकेने सकवार येथील जागेचा सातबारा अद्याप आपल्या नावेच केला नसल्याची बाब समोर आल्याने प्रकल्प लांबणीवर पडू लागला.तत्पूर्वी पालिकेने लवादाच्या निर्देशानुसार मुंबईतील आयआयटी तज्ञांच्या सल्लयाप्रमाणे कच-यावर प्रक्रिया करण्याची कार्यवाही सुरू केली. एव्हाना २००८ मध्ये सुरू झालेल्या प्रकल्पात कच-याचे डोंगर निर्माण झाल्याने त्यावर हिरवळ साकारण्यासाठी किमान ५ वर्षांचा कालावधी लागणार असल्याचे पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले. यामुळे प्रकल्पाचे स्थलांतर रेंगाळण्याची चिन्हे निर्माण झाली. तद्नंतर राज्य सरकारने कचऱ्याचे ओला व सुका असे वर्गीकरण करून त्यावर प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश स्थानिक प्रशासनांना दिले. त्यानुसार पालिकेने गतवर्षापासून कचरा वर्गीकरणाची मोहीम सुरू करून सध्याच्या प्रकल्पात वर्गीकरण निहाय कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी मेसर्स सौराष्ट्र एन्व्हायरो प्रा. लि. या कंपनीला कंत्राट दिले. यातील सुका कचऱ्यावरील प्रक्रियेचा प्रकल्प जानेवारीच्या अखेरीस सुरू होणार असून या कचऱ्यातील प्रत्येक पुनर्वापर होणारा कचरा वेगळा करून तो कंत्राटदारामार्फत शहराबाहेर पुनर्प्रक्रियेसाठी पाठविला जाणार आहे. तर ओला कचऱ्यातून दुर्गंधी सुटून त्यातील सांडपाणी बाहेर पडू नये व त्यात निर्माण होणारा मिथेन वायू नष्ट करण्यासाठी त्यात आॅक्सिजन सोडण्यात येणार आहे.ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत तयार केले जाणार असून, त्यात आॅक्सिजन सोडल्यास कचरा लवकर सडून खताची प्रक्रिया त्वरित केली जाते. त्यातून तयार होणारे खत काही प्रमाणात पालिकेला मोफत दिले जाणार असून, उर्वरित मागणीनुसार शहराबाहेरील शेतकऱ्यांना कंत्राटदाराकडून दिले जाणार आहे. सध्या त्यातील तांत्रिक बाबी तपासण्यात येत असल्याने तो एपिलमध्ये सुरू होणार असल्याचे आयुक्तांकडून सांगण्यात आले. कचऱ्यावरील प्रक्रिया सुरू झाल्यानंतर त्याचा त्रास आसपासच्या रहिवाशांना होणार नसल्याने एकही तक्रार प्रशासनाकडे येणार नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे हा प्रकल्प देशातील रोल मॉडेल ठरणार असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. आयुक्तांनी उपायुक्त डॉ. संभाजी पानपट्टे, शहर अभियंता शिवाजी बारकुंड, कार्यकारी अभियंता दीपक खांबित यांच्यासह नुकतीच प्रकल्पाची पाहणी केली.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर