शहरं
Join us  
Trending Stories
1
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
2
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
3
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
4
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
5
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
6
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
7
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
8
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
9
शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली
10
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
11
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
12
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
13
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
14
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
15
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात
16
अमृता खानविलकर या कारणामुळे सोशल मीडियावर शेअर करत नाही नवऱ्यासोबतचे फोटो, म्हणाली - एकमेकांना...
17
Mouni Roy : "दिवसाला खाल्ल्या 30 गोळ्या, वजन वाढलं, आयुष्य संपलं..."; मौनी रॉयला आला भयंकर अनुभव
18
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
19
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
20
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...

कोणाच्याही घराची वीज कापलीत तर...; विजेच्या वाढत्या बिलांविरोधात मनसेचा आक्रमक पवित्रा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2020 11:33 AM

ठाण्यात वाढत्या वीज बिलांविरोधात मनसे आक्रमक

ठाणे: कोरोना संकट आणि त्यामुळे ठप्प झालेली अर्थव्यवस्था याचा फटका सर्वसामान्यांना बसला आहे. कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या संकटात आल्या आहेत. त्यातच वीज कंपन्या अव्वाच्या सव्वा बिलं पाठवत असल्यानं सामान्य नागरिक मेटाकुटीला आला आहे. याविरोधात आता मनसेनं आक्रमक पवित्रा घेतला आहे. कोणाच्याही घरातील वीज कापली गेल्यास मनसे एमएससीबीसोबत सरकारी कार्यालयांमधील वीज कापू, असा इशारा मनसेचे ठाण्याचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिला आहे. कोरोनामुळे आधीच नागरिक त्रस्त आहेत. त्यात आता त्यांना वाढीव वीज बिलं पाठवून आणखी मनस्ताप देण्यात येत असल्याचं जाधव म्हणाले. 'ठाण्याच्या हिरानंदनी भागातील एका महिलेला आधी हजार रुपये बिल यायचं. आता ते थेट २० हजारांवर गेलं आहे. त्या महिलेची तक्रार ऐकून घेण्यासाठी गेलो असता, तिथे आणखी १०० माणसं भेटली. त्यांचीदेखीस तिच तक्रार होती. आधी ज्यांना २ हजार रुपये बिल यायचं, त्यांना आता २० हजारांचं बिल पाठवण्यात येत आहे,' असं जाधव म्हणाले.'सध्या कोरोनामुळे अनेकजण घरीच थांबले आहेत. त्यामुळे २ हजार रुपये येणारं वीज बिल तीन-साडे तीन हजार आल्यास समजू शकतो. पण ते थेट २० हजार कसं काय येतं?,' असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ठाकरे सरकारनं घर मालकांना, दुकान मालकांना भाडं वसूल न करण्याचं आवाहन केलं. अनेकांनी मनाचा मोठेपणा दाखवला. मग आता सरकारनं गेल्या तीन महिन्यांचं वीज बिल माफ करावं, अशी मागणी जाधव यांनी केली. ठाण्यात कोणाचीही वीज कापली गेल्यास मनसे एमएससीबीसह सरकारी कार्यालयांची वीज कापेल, असा इशारा जाधव यांनी दिला आहे. आधीच अनेकांचे रोजगार गेले आहेत. अनेकांच्या नोकऱ्यांवर टांगती तलवार आहे. अनेकांना पगार मिळालेले नाहीत. काहींना बिनपगारी सुट्ट्या देण्यात आल्या आहेत. अशा व्यक्तींनी वीज बिलं कशी भरायची, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. सध्या लोकांना कोरोनापेक्षा वीज बिलाची भीती वाटू लागली असल्याचं ते म्हणाले. 

टॅग्स :Maharashtra Navnirman Senaमहाराष्ट्र नवनिर्माण सेनाelectricityवीज