शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
2
मराठी तरुणीला मारहाण करून पळालेल्या परप्रांतीय तरुणाला मनसैनिकांनी पकडले, चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले 
3
केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 
4
महिलांना लग्नाच्या जाळ्यात ओढून उकळायचा पैसे; मंदिरात लग्न उरकायचा अन्...
5
७/११ बॉम्बस्फोटाच्या निकालाविराेधात सरकार सुप्रीम कोर्टात; गुरुवारी सुनावणी
6
भोंग्याबाबतचे नियम दुसऱ्यांदा मोडल्यास गुन्हा नोंदवा! राज्याच्या पोलिस महासंचालकांचे आदेश
7
नवे उपराष्ट्रपती निवडताना भाजपला नाही चिंता; ४२२ सदस्यांचे समर्थन; बहुमताने एकच उमेदवार
8
अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार; शिक्षिकेला मिळाला जामीन
9
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा वादात; म्हणे ‘शासनच भिकारी’
10
दिल्लीत लँडिंग होताच विमानाला अचानक आग; सर्व प्रवासी व कर्मचारी सुखरूप
11
मतदार यादीवरून विरोधक आक्रमकच; पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कामकाज ठप्प
12
धनखड यांनी राजीनामा नेमका का दिला? संसदेबाहेर चर्चा
13
गडचिरोलीत विकासविरोधी कारवायांना विदेशातून फंडिंग! नक्षलींनी बंदुका सोडून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन
14
Mumbai Local: मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
15
कॅप्टनच्या 'सेंच्युरी'नंतर टीम इंडियाकडून क्रांतीचा 'सिक्सर'! टी-२० सह इंग्लंडला वनडेतही 'धोबीपछाड'
16
‘गँग्ज ऑफ उल्हासनगर’पुढे पोलिसांचे सपशेल लोटांगण; आरोपीची पीडित मुलीच्या घरासमोर मिरवणूक
17
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
18
रहस्यमय रस्ता, दिवसातून केवळ दोन तासच दिसतो, मग गायब होतो, कारण काय?
19
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
20
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा

मार्चअखेर ठाण्यात सुरू होणार वायफाय

By admin | Updated: February 1, 2016 01:19 IST

इंटरनेटच्या युगात आता ठाण्यातील प्रत्येक नागरिकाला वायफायने कनेक्ट करण्यासाठी ठाणे महापालिकेने पावले उचलली असून शहर वायफायने कनेक्ट करण्याचा निर्णय घेतला आहे

ठाणे : इंटरनेटच्या युगात आता ठाण्यातील प्रत्येक नागरिकाला वायफायने कनेक्ट करण्यासाठी ठाणे महापालिकेने पावले उचलली असून शहर वायफायने कनेक्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. ठाणेकरांना ही सुविधा पुरविण्यासाठी ११ हून अधिक बड्या नामांकित कंपन्यांनी सहभागासाठी पालिकेकडे पत्रव्यवहार केला आहे. त्यानुसार, येत्या महिनाभरात आॅनलाइन निविदांची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मार्चअखेर ठाणेकरांना पहिल्या टप्प्यातील वायफाय सेवा मोफत वापरण्याची संधी मिळणार आहे. नोव्हेंबर महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाहतूक पोलिसांच्या एका कार्यक्रमात ठाणे शहर येत्या सहा महिन्यांत वायफायने कनेक्ट करण्याबरोबरच शहरात १५०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. त्या अनुषंगाने महापालिकेने यापूर्वीच त्याची तयारी केली असून आता हा प्रकल्प प्रत्यक्षात अमलात आणण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. त्यानुसार, वायफायची यंत्रणा बसविण्यासाठी महापालिका ३२ हजार ५०० विद्युत पोलचा वापर करणार आहे. याच पोलवर पहिल्या टप्प्यात ४०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार असल्याची माहिती आयुक्तांनी दिली. दरम्यान, वायफाय सिस्टीममध्ये ठाणे महापालिकेला एकही पैसा खर्च करावा लागणार नसून महापालिका संबंधित एजन्सीला विद्युत पोल उपलब्ध होणार आहे.