शहरं
Join us  
Trending Stories
1
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
2
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
3
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
4
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
5
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
6
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
7
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
8
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
9
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
10
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
11
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
12
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
13
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
14
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
15
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
16
बोगस खेळाडू आढळल्यामुळे वय निश्चितीची अट; शालेय क्रीडा स्पर्धांपासून मुले राहताहेत वंचित
17
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
18
Upcoming Smartphones: वनप्लस १५, विवो एक्स ३०० आणि बरंच काही; ऑक्टोबरमध्ये लॉन्च होत आहेत 'हे' ६ फोन!
19
"गुरूजी म्हणाले, 'दाताखाली जीभ आली म्हणून आपण दात पाडत नाही"; मोदींनी सांगितली आठवण
20
ST Bus Fare Update: दिवाळासाठी एसटीने केलेली १० टक्के भाडेवाढ रद्द; पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी केली घोषणा

दीड वर्षात उपसमितीची बैठक का घेतली नाही?; एअरबस प्रकरणी उदय सामंत यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2022 07:16 IST

एअरबस प्रकल्प महाराष्ट्रात येण्याकरिता महाविकास आघाडी सरकारने दीड वर्षात कोणतेही प्रयत्न केले नाहीत.

ठाणे : एअरबस प्रकल्प महाराष्ट्रात येण्याकरिता महाविकास आघाडी सरकारने दीड वर्षात कोणतेही प्रयत्न केले नाहीत. मागील सरकारने कुठल्याही प्रकल्पाला मंजुरी देण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक घेतली नाही, असे आरोप उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शनिवारी येथे केले. सर्व पुरावे व कागदपत्रे सोबत घेऊन आपण हे आरोप करीत असल्याचे ते म्हणाले. 

काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सामंत म्हणाले की, एअरबस प्रकल्पाबाबत तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारची भूमिका स्पष्ट नव्हती. त्यामुळे हा प्रकल्प राज्यातून गेला. उत्तम काम करीत असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नाहक बदनाम केले जात आहे.

सामंत म्हणाले की,  मंत्रिमंडळाच्या उपसमितीची दीड वर्षात एकही बैठक घेतली नाही. सरकार गेल्याचा राग त्यांच्या मनात असू शकतो, पण किती खोटे बोलायचे याला मर्यादा हवी, असा टोला माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांचे नाव न घेता लगावला. अडीच वर्षांत बल्कड्रग प्रकल्पासाठी संवाद साधला नसल्याचा आरोप सामंत यांनी केला. 

या मोठ्या प्रकल्पांना दिली मान्यता

विद्यमान सरकारमध्ये १० मोठ्या प्रकल्पांना मान्यता दिल्याचे त्यांनी सांगितले. त्यात सिनारामस पल्प अँड पेपर (२० हजार कोटी), सोलार इंडस्ट्रीज (३७८ कोटी),  महाराष्ट्र सिमलेस (३७५ कोटी), सनफ्रेश अँग्रो (६६२ कोटी), वरूण बेवरेजेस (७७९ कोटी), विठ्ठल कॉर्पोरेशन (१२६ कोटी), आयएफबी रेफ्रिजरेटर्स (४०० कोटी), जेनक्रेस्ट बायो प्रॉडक्ट (६५० कोटी), मेगा पाईप्स (७५८ कोटी) आणि ग्रासिम (एक हजार ४० कोटी) यांचा समावेश असल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले. 

पवारांनी कधीही गद्दार म्हटले नाही

माझा राजीनामा घेण्याची मागणी केली जात आहे, पण मी चारवेळा निवडणूक लढलो आणि निवडून आलो. मी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून शिवसेनेत आलो म्हणून शरद पवार यांनी कधी गद्दार म्हटले नाही, खोक्यांची भाषा केली नाही, असे सामंत म्हणाले. शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांचे त्यांनी कौतुक केले. ठाकरे सरकारच्या काळात मराठी उद्योजकांना कोणी त्रास दिला हेही समोर आले पाहिजे, अशी मागणी सामंत यांनी केली.

टॅग्स :Uday Samantउदय सामंतMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार