शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
2
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
3
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
4
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
5
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
6
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
7
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
8
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
9
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
10
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
11
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
12
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
13
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
14
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
15
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
16
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
17
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
18
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
19
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
20
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य

दीड वर्षात उपसमितीची बैठक का घेतली नाही?; एअरबस प्रकरणी उदय सामंत यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2022 07:16 IST

एअरबस प्रकल्प महाराष्ट्रात येण्याकरिता महाविकास आघाडी सरकारने दीड वर्षात कोणतेही प्रयत्न केले नाहीत.

ठाणे : एअरबस प्रकल्प महाराष्ट्रात येण्याकरिता महाविकास आघाडी सरकारने दीड वर्षात कोणतेही प्रयत्न केले नाहीत. मागील सरकारने कुठल्याही प्रकल्पाला मंजुरी देण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक घेतली नाही, असे आरोप उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शनिवारी येथे केले. सर्व पुरावे व कागदपत्रे सोबत घेऊन आपण हे आरोप करीत असल्याचे ते म्हणाले. 

काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सामंत म्हणाले की, एअरबस प्रकल्पाबाबत तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारची भूमिका स्पष्ट नव्हती. त्यामुळे हा प्रकल्प राज्यातून गेला. उत्तम काम करीत असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नाहक बदनाम केले जात आहे.

सामंत म्हणाले की,  मंत्रिमंडळाच्या उपसमितीची दीड वर्षात एकही बैठक घेतली नाही. सरकार गेल्याचा राग त्यांच्या मनात असू शकतो, पण किती खोटे बोलायचे याला मर्यादा हवी, असा टोला माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांचे नाव न घेता लगावला. अडीच वर्षांत बल्कड्रग प्रकल्पासाठी संवाद साधला नसल्याचा आरोप सामंत यांनी केला. 

या मोठ्या प्रकल्पांना दिली मान्यता

विद्यमान सरकारमध्ये १० मोठ्या प्रकल्पांना मान्यता दिल्याचे त्यांनी सांगितले. त्यात सिनारामस पल्प अँड पेपर (२० हजार कोटी), सोलार इंडस्ट्रीज (३७८ कोटी),  महाराष्ट्र सिमलेस (३७५ कोटी), सनफ्रेश अँग्रो (६६२ कोटी), वरूण बेवरेजेस (७७९ कोटी), विठ्ठल कॉर्पोरेशन (१२६ कोटी), आयएफबी रेफ्रिजरेटर्स (४०० कोटी), जेनक्रेस्ट बायो प्रॉडक्ट (६५० कोटी), मेगा पाईप्स (७५८ कोटी) आणि ग्रासिम (एक हजार ४० कोटी) यांचा समावेश असल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले. 

पवारांनी कधीही गद्दार म्हटले नाही

माझा राजीनामा घेण्याची मागणी केली जात आहे, पण मी चारवेळा निवडणूक लढलो आणि निवडून आलो. मी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून शिवसेनेत आलो म्हणून शरद पवार यांनी कधी गद्दार म्हटले नाही, खोक्यांची भाषा केली नाही, असे सामंत म्हणाले. शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांचे त्यांनी कौतुक केले. ठाकरे सरकारच्या काळात मराठी उद्योजकांना कोणी त्रास दिला हेही समोर आले पाहिजे, अशी मागणी सामंत यांनी केली.

टॅग्स :Uday Samantउदय सामंतMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार