शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

दीड वर्षात उपसमितीची बैठक का घेतली नाही?; एअरबस प्रकरणी उदय सामंत यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2022 07:16 IST

एअरबस प्रकल्प महाराष्ट्रात येण्याकरिता महाविकास आघाडी सरकारने दीड वर्षात कोणतेही प्रयत्न केले नाहीत.

ठाणे : एअरबस प्रकल्प महाराष्ट्रात येण्याकरिता महाविकास आघाडी सरकारने दीड वर्षात कोणतेही प्रयत्न केले नाहीत. मागील सरकारने कुठल्याही प्रकल्पाला मंजुरी देण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक घेतली नाही, असे आरोप उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शनिवारी येथे केले. सर्व पुरावे व कागदपत्रे सोबत घेऊन आपण हे आरोप करीत असल्याचे ते म्हणाले. 

काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सामंत म्हणाले की, एअरबस प्रकल्पाबाबत तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारची भूमिका स्पष्ट नव्हती. त्यामुळे हा प्रकल्प राज्यातून गेला. उत्तम काम करीत असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नाहक बदनाम केले जात आहे.

सामंत म्हणाले की,  मंत्रिमंडळाच्या उपसमितीची दीड वर्षात एकही बैठक घेतली नाही. सरकार गेल्याचा राग त्यांच्या मनात असू शकतो, पण किती खोटे बोलायचे याला मर्यादा हवी, असा टोला माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांचे नाव न घेता लगावला. अडीच वर्षांत बल्कड्रग प्रकल्पासाठी संवाद साधला नसल्याचा आरोप सामंत यांनी केला. 

या मोठ्या प्रकल्पांना दिली मान्यता

विद्यमान सरकारमध्ये १० मोठ्या प्रकल्पांना मान्यता दिल्याचे त्यांनी सांगितले. त्यात सिनारामस पल्प अँड पेपर (२० हजार कोटी), सोलार इंडस्ट्रीज (३७८ कोटी),  महाराष्ट्र सिमलेस (३७५ कोटी), सनफ्रेश अँग्रो (६६२ कोटी), वरूण बेवरेजेस (७७९ कोटी), विठ्ठल कॉर्पोरेशन (१२६ कोटी), आयएफबी रेफ्रिजरेटर्स (४०० कोटी), जेनक्रेस्ट बायो प्रॉडक्ट (६५० कोटी), मेगा पाईप्स (७५८ कोटी) आणि ग्रासिम (एक हजार ४० कोटी) यांचा समावेश असल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले. 

पवारांनी कधीही गद्दार म्हटले नाही

माझा राजीनामा घेण्याची मागणी केली जात आहे, पण मी चारवेळा निवडणूक लढलो आणि निवडून आलो. मी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून शिवसेनेत आलो म्हणून शरद पवार यांनी कधी गद्दार म्हटले नाही, खोक्यांची भाषा केली नाही, असे सामंत म्हणाले. शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांचे त्यांनी कौतुक केले. ठाकरे सरकारच्या काळात मराठी उद्योजकांना कोणी त्रास दिला हेही समोर आले पाहिजे, अशी मागणी सामंत यांनी केली.

टॅग्स :Uday Samantउदय सामंतMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार