शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

कळवा-मुंब्य्रात मेट्रो का नाही?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2018 06:32 IST

राष्ट्रवादीची बॅनरबाजी : आयुक्त संजीव जयस्वाल यांना केला सवाल

ठाणे : एकीकडे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या भूमिपुजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मंगळवारी कल्याणला येत असतांना दुसरीकडे कळवा आणि मुंब्रावासियांवर अन्याय का? असा सवाल राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शनिवारी शहरात फलकबाजीकरून आयुक्तांना केला. सत्ताधाऱ्यांकडून आम्हांला अपेक्षा नाही. परंतु, महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी यात लक्ष घालावे, अशी मागणी त्यांनी त्यात केली आहे. सध्या कळवा, मुंब्राकर मेट्रोपासून वंचित का? आयुक्त जयस्वाल उत्तर द्या अशा आशयाच्या या फलकांनी मात्र सर्वांचे लक्ष वेधले आहे.

मेट्रो चारच्या प्रकल्पाच्या कामाला ठाण्यात सुरुवात झाली आहे. तर कल्याण - भिवंडी मेट्रोच्या कामाचे भूमिपुजन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तसेच ठाणे महापालिकेच्या माध्यमातून अंतर्गत मेट्रोचीही बांधणी करण्याचे काम वेगाने सुरू आहे. यामध्ये कळवा आणि मुंब्य्राच्या एकाही भागाचा समावेश नसल्याने आव्हाड यांनी कळवा आणि मुंब्राकर मेट्रोपासून वंचित का? असे फलक लावले आहेत.खासदारांचे दुर्लक्षमेट्रोची लाईन कुठे न्यायची हे काम वास्तविक खासदाराचे असते. परंतु, त्यांनी याकडे लक्ष दिलेले नाही. सत्ताधाºयांकडूनही आम्हाला काहीचअपेक्षा नाहीत, त्यामुळेच आयुक्त जयस्वाल यांनी मेट्रोसाठी काहीतरी करावे, अशी मागणी आव्हाड यांनी केली आहे. मुख्य मेट्रो किंवा अंतर्गत मेट्रोत कळव्याचा आणि मुंब्य्राचा समावेश करावा असेही त्यांचे म्हणणे आहे. 

टॅग्स :thaneठाणेMetroमेट्रो