शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

मराठी नाटक निर्माता - दिग्दर्शक यांची लता मंगेशकर नाट्यगृहाकडे पाठ कशाला? नाट्य रसिकांचा सवाल 

By धीरज परब | Updated: November 20, 2023 15:40 IST

असा सवाल नाट्य रसिक करत आहेत . 

लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड - प्रायोजित नाट्य महोत्सवात गाजलेल्या आणि दिग्गज कलाकारांच्या नाटकांचे प्रयोग लता मंगेशकर नाट्यगृहात होऊ शकतात तर मग  तांत्रिक करणे पुढे करून मराठी नाटक निर्माता - दिग्दर्शक यांची लता मंगेशकर नाट्यगृहा कडे पाठ कशाला ? असा सवाल नाट्य रसिक करत आहेत . 

मीरारोडच्या शिवार तलाव जवळ असलेले नाट्यगृहाचे एकमेव आरक्षण संगनमत व नियमबाह्यपणे एका वादग्रस्त विकासकाच्या घशात घालण्याचा प्रकार केल्याने शहरातील नागरिकांना नाट्यगृह मिळण्याचे मार्ग बंद झाले होते . मात्र आमदार प्रताप सरनाईक यांनी गेल्या अनेकवर्षां पासून सातत्याने पाठपुरावा करत होते . नाट्यगृहाच्या कामात विविध प्रकारे खो घालण्याचा प्रयत्न तत्कालीन पालिकेतील सत्ताधारी भाजपाने बहुमताच्या बळावर चालवला . निधी दिला नाही . मात्र शासना कडून मंजुऱ्या घेऊन काशीमीरा येथे आलिशान नाट्यगृह , आर्ट गॅलरी आ . सरनाईक यांनी उभारून घेतली .  ११ ऑक्टोबर २०२२ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतरत्न लता मंगेशकर नाट्यगृहाचे लोकार्पण केले . 

नाट्यगृह उभारताना आ . सरनाईक यांनी नाट्य निर्माते , दिग्दर्शक , कलाकार आदींना पाचारण करून नाट्यगृहात आवश्यक त्या गोष्टींसाठी त्यांच्या सूचना घेऊन काम पूर्ण केले होते . संपूर्ण वातानुकूलित चार  मजली इमारतीत एक मोठे तर एक छोटे नाट्यगृह, २ आर्ट गॅलरी, बेसमेंट मध्ये व तळमजल्यावर वाहन पार्किंग या शिवाय वेटिंग हॉल , कॅफेटेरिया , व्हीआयपी रूम , ग्रीन रुम , ६ लिफ्ट, चांगली आसन व्यवस्था,  आधुनिक पद्धतीची ध्वनी यंत्रणा व प्रकाश व्यवस्था येथे केली गेली . त्यामुळे शहरातील नाट्यरसिक ह्या नाट्यगृहात नाटकाची तिसरी घंटा वाजण्याच्या प्रतीक्षेत होते . 

मात्र  १३ नोव्हेंबर २०२२ रोजी आयोजित ३८ कृष्ण विला हा पहिलाच नाट्य प्रयोग त्यावेळी साउंड सिस्टीम आदी तांत्रिक त्रुटींची करणे देऊन निर्मात्याने रद्द केला होता . विशेष म्हणजे ह्या दरम्यान गुजराती, मल्याळी आदी अन्य भाषिक नाटकांचे प्रयोग होत असताना मराठी नाटके मात्र  होत नसल्याने रसिक नाराज झाले होते . दरम्यान तांत्रिक त्रुटी नेमक्या काय होत आहेत हे समजून त्या दुरुस्त केल्या गेल्या . तब्बल १० महिन्यांनी म्हणजेच विवार ६ ऑगस्ट २०२३ रोजी करून गेलो गाव ह्या पहिल्या मराठी नाटकाचा तोही हाऊसफुल्ल प्रयोग झाला . 

दिवाळीच्या निमित्ताने आ . सरनाईक यांनी  नाट्यमहोत्सवाचे आयोजन करून 'एका लग्नाची पुढची गोष्ट ', ' तू तू मी मी' ,  'तू म्हणशील तसं' व  'देवबाभळी ' ह्या गाजलेल्या आणि दिग्गज कलाकार असलेल्या नाटकांचे प्रयोग झाले . शिवाय रसिकांनी देखील हाऊसफुल्ल प्रतिसाद दिला . हि गाजलेली नाटके ह्या नाट्यगृहात सुरळीत झाली असताना नियमित मराठी नाटके होत नसल्या बद्दल नाट्यरसिकांनी नाराजी व्यक्त केली .  मराठी नाट्य चळवळ सर्वत्र पसरली पाहिजे , नाटकांचे प्रयोग मीरा भाईंदर सारख्या मोठ्या शहरात सुद्धा नियमित झाले पाहिजेत . नाट्यकला जोपासण्या ऐवजी फक्त व्यावसायिक आर्थिक गणितांची आकडेमोड मराठी नाट्यसंस्था , निर्माते यांनी करणे योग्य नसल्याचे नाट्यरसिकांनी बोलून दाखवले . 

बाळकृष्ण तेंडुलकर ( नाट्य व कला रसिक ) - इतके आलिशान सुसज्ज नाट्यगृह शहरात झाले असताना व्यावसायिक नाट्य निर्माता व दिग्दर्शक यांनी नाट्य प्रयोग न लावणे हे नाट्यकला व नाट्यरसिकांचे दुर्दैव म्हणावे लागेल . केवळ आर्थिक फायद्याचा विचार न करता नवीन नाट्यगृहात चांगल्या दर्जेदार नाटकांच्या प्रयोगास त्यांनी प्राधान्य दिले पाहिजे . 

मिलींद रकवी ( नाट्य रसिक ) - मीरा भाईंदर मध्ये नाट्य कला रसिक मोठ्या प्रमाणात आहेत . आजही गावा गावात स्थानिक कलालकर नाटकांचे आयोजन करतात . पूर्वी परळ - दादर ला नाटक बघण्यास जावे लागायचे पण शहरात इतके सुसज्ज नाट्यगृह होऊन देखील मराठी नाटकांचे प्रयोग जर नाट्यसंस्था , निर्माते आयोजित करत नसतील तर चुकीचे आहे . उलट त्यांनी नवीन नाट्यगृहास प्रोत्साहन व प्राधान्य दिले पाहिजे . महापालिकेने सुद्धा मराठी नाटकांना सवलतीने भाडे आकारावे . 

टॅग्स :Natakनाटक