शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
3
सिंधू पाणी करार मोडल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
5
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
6
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
7
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
8
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
9
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
10
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
11
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
12
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
13
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
14
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
15
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
16
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
17
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
18
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
19
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
20
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली

अक्षय शिंदेसाठी ‘ते’च वाहन का निवडले? पोलिस चकमकप्रकरणी सीआयडीचा पोलिसांना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2024 05:30 IST

बदलापुरात मोठे जनआंदोलन झाले होते. आरोपीवर हल्ला होण्याची शक्यता तसेच संवेदनशील प्रकरण असल्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने मोठ्या वाहनाची निवड करावी लागल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने खासगीत दिली.

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेशी ज्या  वाहनात चकमक झडली त्याच मोठ्या वाहनाची निवड त्याला नेण्यासाठी कोणत्या कारणास्तव केली गेली, असा सवाल गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) अधिकाऱ्यांनी ठाणे पोलिसांच्या मोटार परिवहन विभागाला केला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.    

आरोपी अक्षयचा पोलिस चकमकीत मृत्यू झाल्यानंतर या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला होता.  याप्रकरणी पुणे सीआयडीचे विशेष पोलिस महानिरीक्षक सारंग आव्हाड आणि नवी मुंबईच्या कोकण भवन येथील सीआयडीचे अधीक्षक राहुल वाघुंडे ठाणे पोलिसांकडे चौकशी करीत आहेत.  

आरोपी एकच असूनही त्याला वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय शिंदे आणि सहायक पोलिस निरीक्षक नीलेश मोरे यांच्यासह चारही पोलिस नियंत्रणात का आणू शकले नाहीत? मोठ्या वाहनाची गरज होती का?  अशी विचारणा एका पत्राद्वारे सीआयडी अधिकाऱ्यांनी केल्याची माहिती एका वरिष्ठ पाेलिस अधिकाऱ्याने दिली.

सुरक्षेच्या कारणास्तव मोठ्या वाहनाचा वापर 

बदलापुरात मोठे जनआंदोलन झाले होते. त्यामुळे आरोपीवर हल्ला होण्याची शक्यता तसेच संवेदनशील प्रकरण असल्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने मोठ्या वाहनाची निवड करावी, लागल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने खासगीत दिली.

 

टॅग्स :badlapurबदलापूरCriminal Investigation Department CIDराज्य गुन्हे अन्वेषण विभाग सीआयडी