शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्याचा ‘ठाणे’दार ठरेल कोण? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचे अस्तित्व पणाला

By अजित मांडके | Updated: May 13, 2024 08:33 IST

ही लढत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे यांच्यातील आहे. ठाण्यातील निकाल महाराष्ट्राच्या राजकारणावर दूरगामी परिणाम करणार असेल.

अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : ठाणे लोकसभेत यंदा प्रथमच शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत होत आहे. उद्धव सेनेकडून विद्यमान खासदार राजन विचारे तर शिंदे सेनेकडून शिंदे यांचे निष्ठावान माजी महापौर नरेश म्हस्के हे निवडणुकीच्या रिंगणात उभे ठाकले आहेत. ही लढत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे यांच्यातील आहे. ठाण्यातील निकाल महाराष्ट्राच्या राजकारणावर दूरगामी परिणाम करणार असेल.

ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, त्यामुळे तो शिंदे की ठाकरे यांच्यापैकी कोण सर करणार, हे पाहणे महत्वाचे आहे. विचारे व म्हस्के हे दोघेही स्व. आनंद दिघे यांचे शिष्य असल्याने खरा शिष्य कोण, हेही ठाणेकर नक्की करणार आहे.  उद्धव सेनेची साथ सोडून म्हस्के शिंदे यांच्यासोबत गेले. स्वीकृत नगरसेवक, सभागृह नेते, स्थायी समिती सभापती, महापौर व आता शिंदे सेनेचे प्रवक्ते असा म्हस्के यांचा प्रवास आहे. तर उद्धव सेनेने  राजन विचारे यांना सलग तिसऱ्यांदा संधी दिली आहे.  

गाजत असलेले मुद्दे

आनंद दिघे यांचा खरा शिष्य कोण? ठाण्याचा गड कोण राखणार? निष्ठावंत की गद्दार? खासदार लोकांच्या संपर्कात होते का? भाजपमधील नाराजांची भूमिका काय?

नाराजीचा सूर

शिंदे सेनेकडून नरेश म्हस्के यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नवी मुंबईत आणि मीरा-भाईंदरमध्ये नाराजीचा सूर उमटला. गणेश नाईक कुटुंबीयांची नाराजी दूर करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बैठक घ्यावी लागली. त्यानंतर नाराजी दूर झाल्याचे नाईक यांनी जाहीर केले असले तरी दिल्लीतून नेत्यांना ठाण्यात पाठवले जाणार आहे. 

नेत्यांची भूमिका महत्त्वाची 

भाजपच्या गणेश नाईक यांची भूमिका महत्वाची आहे. नवी मुंबईतून म्हस्के यांना किती मताधिक्य मिळते, त्यावर त्यांचे विजयाचे गणित अवलंबून आहे. मुख्यमंत्री शिंदे हे ठाण्याकडे अधिक लक्ष देऊन आहेत. विचारे यांच्या प्रचारासाठी सुषमा अंधारे मैदानात उतरल्या आहेत.

निवडणुकीतील कळीचे मुद्दे

ठाण्याला अद्यापही हक्काचे धरण उपलब्ध होऊ शकलेले नाही. मेट्रोच्या कामामुळे होणारी वाहतूककोंडी केव्हा सुटणार. जलवाहतुकीचे भिजत पडलेले घोंगडे. नवीन ठाणे स्टेशनचे काम केव्हा पूर्ण होणार. पाण्याची समस्या आजही सुटू शकलेली नाही.

२०१९ मध्ये काय घडले ?

राजन विचारे            शिवसेना (विजयी)    ७,४०,९६९आनंद परांजपे         राष्ट्रवादी काँग्रेस    ३,२८,८२४

२०१९ पूर्वीच्या निवडणुकीत कोणाची बाजी ?

वर्ष    विजयी उमेदवार    पक्ष     टक्के२०१४    राजन विचारे    शिवसेना    २८.७२२००९    संजीव नाईक    राष्ट्रवादी     ४०.१४२००४    प्रकाश परांजपे    शिवसेना     ४८.०८१९९९    प्रकाश परांजपे    शिवसेना     ४३.२२१९९८    प्रकाश परांजपे    शिवसेना     ५९.२१ 

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४thane-pcठाणेShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेbig Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४