शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना संसर्ग झाल्यास जबाबदारी कोण घेणार? अंगणवाडी सेविकांच्या सहभागाला विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2020 23:59 IST

महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायत इत्यादी ठिकाणी ही मोहीम राबवली जाणार असून शहरे, गावे, वाडी, पाडे इत्यादीमध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाची तपासणी केली जाणार आहे.

हितेन नाईक / अनिरुद्ध पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कपालघर / बोर्डी : ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’अंतर्गत कोविडबाधित रुग्णांच्या निकट संपर्कातील व्यक्तीचा शोध घेण्याच्या कामासाठी अंगणवाडी सेविकांच्या सहभागाला महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समितीने विरोध केला आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर लहान बालके, गरोदर मातांना संसर्गाची बाधा झाल्यास जबाबदार कोण? असा प्रश्न कृती समितीने उपस्थित केला आहे.

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेअंतर्गत राज्यात सध्या कोविडबाधित रुग्णांच्या निकट संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्यासाठी ‘रेस ट्रॅक ट्रॅक’ या त्रिसूत्रीचा वापर करून कोविडचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.राज्यात कोविड-१९ आजाराने रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येतआहेत. राज्याच्या अनलॉक मार्गदर्शक सूचनांनुसार हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत असून सामान्य जनतेमध्ये या आजाराची भीती कमी होत आहे.अनलॉक सुरू असताना राज्यातील सर्व लोकांना दोन वेळा भेटी देऊन आरोग्य शिक्षण, महत्त्वाचे आरोग्य संदेश, संशयित रुग्ण शोधून तसेच मधुमेह, हृदयविकार, किडनी आजार, लठ्ठपणा यासारख्या महत्त्वाच्या व्यक्ती शोधून काढणे असा उपक्रम या मोहिमेअंतर्गत १५ सप्टेंबर ते २५ आॅक्टोबर दरम्यान दोन टप्प्यात राबविण्यात येणार आहे.

महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायत इत्यादी ठिकाणी ही मोहीम राबवली जाणार असून शहरे, गावे, वाडी, पाडे इत्यादीमध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाची तपासणी केली जाणार आहे. गृहभेटीसाठी एक आरोग्य कर्मचारी व दोन स्वयंसेवक असे तिघांचे पथक नेमण्यात आले असून एका पथकाला ५० घरांना भेटी देण्याचे बंधन ठेवण्यात आले आहे.या पथकात अंगणवाडी सेविकांचा अंतर्भाव करण्यात येऊ नये, असे पत्र कृती समितीने महिला व बालकल्याण मंत्र्यांना दिले होते. असे असतानाही त्याचा विचार न करता बालकल्याण सचिवांनी अधिकृत परवानगी दिली आहे.

एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविकांना पोषण आहार वाटप, ग्रोथ मॉनिटरिंग, एसएम या बालकाला व्हीसीडीसीमध्ये दाखल करणे, सॅम बालकांच्या घरी भेट देणे, इत्यादी कामे प्राधान्याने करावयाची असतात.ही कामे करताना सेविकांना लहान बालके, गरोदर महिला, स्तनदा माता या अतिसंवेदनशील लोकांमध्ये मिसळावे लागते. अशा स्थितीत या लोकांना संसर्गाची बाधा झाल्यास त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचे सचिव राजेश सिंग यांनी उपस्थित केला आहे.अंगणवाडी सेविकांना वगळावे, अन्यथा...आयुक्त कार्यालयाने वेळोवेळी योजनाबाह्य कामे अंगणवाडीला न देण्याबाबत परिपत्रक काढले आहे. युनोने नजीकच्या काळातली पार्श्वभूमी पाहता तीन लाख बालके मृत्युमुखी पडतील, असा कयास व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर अशी गंभीर घटना घडू नये, याकरिता या मोहिमेतून अंगणवाडी सेविकांना वगळावे, अन्यथा २१ सप्टेंबरपासून अंगणवाडी कर्मचारी नियमित योजनेची कामे सोडून, अन्य कामात सहभागी होणार नाहीत, असा इशारा अंगणवाडी कृती समितीच्या अधिकाऱ्यांनी राज्याचे मुख्य सचिव, एकात्मिक बालविकास सेवा योजनांचे आयुक्त आदींना दिला आहे.प्रतिदिन ५० घरांनाभेट देण्याचे टार्गेट‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या योजनेंतर्गत प्रत्येक अंगणवाडी सेविकांना प्रतिदिन ५० घरांना भेट देण्याचे टार्गेट आहे. त्यानुसार एका घराचे सर्वेक्षण करण्यासाठी २० मिनिटांचा कालावधी लागत आहे. यासाठी दिवसागणिक सुमारे १७ तास लागतात. त्यामुळे महिला व बालकल्याण विभागाच्या जबाबदारीव्यतिरिक्त अधिकचे काम प्रत्येक दिवशी करावे लागणार आहे. तथापि, ही जबाबदारी अव्यवहार्य तसेच अशक्य असल्याचे मत अंगणवाडी सेविकांनी व्यक्त केले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस