शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

ठाणे ग्रामीणमधील अवैध धंद्यांसह गुन्हेगारांना वेसण घालणार- शिवाजी राठोड

By जितेंद्र कालेकर | Updated: August 3, 2018 23:30 IST

पोलीस-जनता यांच्यात सुसंवाद निर्माण करून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही ठाणे ग्रामीणचे नवे पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांनी शुक्रवारी दिली. ठाण्याची सूत्रे घेतल्यानंतर ‘लोकमत’शी मनमोकळेपणाने बातचीत करताना त्यांनी हा मानस व्यक्त केला.

ठळक मुद्देकौटुंबिक मेळाव्यात तणाव दूर करणारनागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणार ठाणे पोलीस अधीक्षकपदाची घेतली सूत्रे

जितेंद्र कालेकरलोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाणे ग्रामीण भागातील अवैध धंदे आणि कुख्यात गुन्हेगारांचा बीमोड केला जाईल. कामात कुचराई करणाऱ्या पोलिसांवर प्रसंगी कारवाई केली जाईल. पोलीस-जनता यांच्यात सुसंवाद निर्माण करून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही ठाणे ग्रामीणचे नवे पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांनी शुक्रवारी दिली. ठाण्याची सूत्रे घेतल्यानंतर ‘लोकमत’शी मनमोकळेपणाने बातचीत करताना त्यांनी हा मनोदय व्यक्त केला.डॉ. राठोड हे यापूर्वीही २००९ ते २०११ या कालावधीमध्ये ठाणे मुख्यालयात होते. २०११ ते २०१४ या काळात उल्हासनगरच्या उपायुक्तपदी त्यांनी आपली कारकीर्द गाजवली. त्यावेळी पप्पू कलानी यांना त्यांनी निवडणूक काळात अटकही केली होती. वेळ आणि शिस्तीचा लातूरमध्ये अधीक्षकपदी दबदबा निर्माण केलेल्या डॉ. राठोड यांनी मराठा मोर्चा आंदोलनासह अनेक प्रकरणे कौशल्याने हाताळली. अविनाश चव्हाण या खासगी क्लासचालकाच्या खून प्रकरणाचा २४ तासांतच छडा लावून आठ जणांना अटक केली. ‘मनोमिलन’ या अनोख्या उपक्रमांतर्गत भांडणामुळे विभक्त होण्याच्या वाटेवर असलेल्या सुमारे एक हजारांपेक्षा अधिक दाम्पत्यांचा संसार त्यांनी गेल्या तीन वर्षांत नव्याने फुलवला. स्वत: गायक असल्यामुळे महंमद रफी यांच्या आवाजातील ‘बहारों फुल बरसाओ...’ हे गाणे ते ‘मनोमिलना’च्या उपक्रमात गाऊन अशा जोडप्यांना त्यांच्या विवाहाच्या प्रसंगाची आठवण करून देत असल्याचेही त्यांनी सांगितले. गायनाच्या आवडीमुळे पोलीस आणि त्यांच्या कुटुंबीयांनाही त्यांनी एक सांस्कृतिक व्यासपीठ तयार केले. पोलीस स्रेहमेळाव्यातून स्वत: गाणी गात असल्यामुळे पोलीस अधिकारी, कर्मचारी यांचा कामावरील ताणतणाव आपोआपच दूर होत असल्याचे ते विश्वासाने सांगतात.चुकून घडलेल्या गुन्ह्यांमुळे एखाद्याला शिक्षा झाल्यानंतर शिक्षा भोगून आलेल्या व्यक्तीचे ‘परिवर्तन’ या कार्यक्रमात मनोगत ठेवून इतरांनी अशा गुन्ह्यांकडे न वळण्यासाठी प्रेरित केले जाते. बळीराजा सबलीकरण या मोहिमेंतर्गत लग्न किंवा इतर कार्यक्रमात डॉल्बी वाजवण्याला बंदी आणून तोच खर्च शेतकºयांच्या मदतीसाठी दिला. लातूरमध्ये अशी २५ लाखांची मदत लोकांनी करण्यासाठी त्यांचे मन वळवल्याची आठवणही त्यांनी सांगितली.ठाण्यातील अवैध धंदे आणि गावठी दारूविरुद्धची मोहीम यापुढेही अशाच प्रकारे व्यापकपणे चालू ठेवणार आहे. कुख्यात गुन्हेगारांवर मकोका आणि हद्दपारीची कारवाई करणार आहे. आरोपी दत्तक योजनेंतर्गत एक पोलीस एका आरोपीच्या हालचालींवर नजर ठेवेल. पोलीस आणि जनता संबंध दृढ करण्यावर भर देणार असून पोलीस ठाण्यात येणाºया प्रत्येकाचे समाधान करण्याच्या सूचनाही देण्यात येतील. त्यातून पोलिसांचीही प्रतिमा सुधारण्यास मदत होईल. शून्य पेंडन्सीद्वारे गुन्हे आणि अर्ज निकाली काढण्यावरही भर देणार असून गैरकृत्य आणि कामात कुचराई करणाºया पोलिसांवर तसेच अवैध धंद्यांवर कारवाईचा बडगा उगारणार असल्याचा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.....................रोज १० किलोमीटर चालणेगायनाची आवड असलेल्या डॉ. राठोड यांना चालण्याचीही आवड असून ते रोज १० किलोमीटर नियमित चालत असल्याचे सांगतात. गेल्या आठ वर्षांमध्ये यात खंड झालेला नसून चालण्यामुळे शरीरही तंदुरुस्त राहते. त्यामुळे ठाण्यातील पोलिसांमध्येही ही सवय आपण रुजवणार असल्याचे ते म्हणाले.............................दरम्यान, मावळते अधीक्षक डॉ. महेश पाटील यांनी ठाण्याची सूत्रे डॉ. राठोड यांच्याकडे सुपूर्द केल्यानंतर त्यांनी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची सूत्रे घेतली. ठाणे ग्रामीणच्या जनतेचे चांगले सहकार्य लाभले. ठाण्यात अवैध गावठी दारु बंदीबरोबरच अनेक क्लीष्ट गुन्हयांचा छडा लावल्याचे समधान असल्याचेही ते म्हणाले. 

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिसTransferबदली