शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुकच्या अटकेबाबत सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला नोटीस बजावली; पत्नी गीतांजली यांनी केल्या दोन मागण्या
2
संरक्षण करारानंतर सौदी अरेबियाची पाकिस्तानला आणखी एक मोठी भेट; ३० लाख लोकांना रोजगार मिळणार
3
Manas Polymers Listing: १५३ रुपयांवर लिस्ट झाला हा स्वस्त IPO; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना ९०%चा फायदा, झाले मालामाल
4
दहा वर्षांपासून मुलांना Coldrif सिरप देतोय; 'त्या' मृत मुलांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरची प्रतिक्रिया
5
Coldrif Cough Syrup: मुलांच्या जीवावर उठलं कफ सिरप; कंपनीची १६ वर्षांपासून ना झाली वार्षिक बैठक, ना बॅलन्स शीटही झाली अपडेट
6
४ दिवसांपूर्वी शिंदेसेनेत प्रवेश अन् आज भाजपा मंत्री नितेश राणेंवर लावला गंभीर आरोप, म्हणाले...
7
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! टाटा-रिलायन्ससारख्या २४० दिग्गज कंपन्यांत पैसे लावा; कोणी आणली ऑफर?
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' सरकारी बँकेचे आणखी शेअर खरेदी केले, LIC चाही मोठा डाव; करतोय मालामाल!
9
गाझा युद्धविराम योजना: ट्रम्प-नेतन्याहू यांच्यात फोनवर तुफान वाद! अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर संतापले इस्रायलचे पंतप्रधान
10
Cough Syrup : "कफ सिरपने मुलाचा जीव घेतला, उपचारासाठी जमीन गहाण ठेवून ४ लाखांचं कर्ज, पण... "
11
'या' अभिनेत्रीला आदर्श मानते 'सैयारा' गर्ल अनीत पड्डा; म्हणाली, "रिलीजनंतर १० मिनिटं तिच्याशी..."
12
भारतीय नौदलाची ताकद वाढणार! आज अँड्रोथ युद्धनौका मिळणार, जाणून काय आहे खास?
13
"मी माझ्या भावाचा मृतदेह स्वतःच्या हाताने बाहेर काढला", प्रत्यक्षदर्शीने सांगितली आपबीती
14
३ महिने भरपूर पैसा, ४ राशींचे आयुष्यच बदलेल; कल्पनेपलीकडे यश-लाभ, बाबा वेंगांचे मोठे भाकित!
15
हरमनप्रीत कौरचे तेवर! नजरेने धाक दाखवणारी पाकिस्तानी खेळाडू खाली मान घालून पळाली (VIDEO)
16
Mumbai Accident: दादरमध्ये अपघात, 'बेस्ट बस'ला टेम्पो ट्रॅव्हलरची धडक; एक ठार, चार जखमी
17
'या' माशांना वाचवण्यासाठी बांगलादेशनं उतरवलं सैन्य दल; बंगालच्या खाडीत पाठवल्या १७ युद्धनौका
18
Indian shot dead: "मित्रा, तू बरा आहेस ना?" मदतीसाठी आलेल्या भारतीय व्यक्तीचीच गोळी घालून हत्या
19
Tata Capital IPO: प्रतीक्षा संपली! तुमच्या खिशात आहेत का १४,९९६ रुपये? तर बनू शकता टाटांच्या कंपनीचे प्रॉफिट पार्टनर
20
VIRAL : 'सर डोकं दुखतंय...', कर्मचारी आजारी तरीही मॅनेजर सुट्टी देईना! संतापलेल्या तरुणानं काय केलं बघाच  

ठाणे ग्रामीणमधील अवैध धंद्यांसह गुन्हेगारांना वेसण घालणार- शिवाजी राठोड

By जितेंद्र कालेकर | Updated: August 3, 2018 23:30 IST

पोलीस-जनता यांच्यात सुसंवाद निर्माण करून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही ठाणे ग्रामीणचे नवे पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांनी शुक्रवारी दिली. ठाण्याची सूत्रे घेतल्यानंतर ‘लोकमत’शी मनमोकळेपणाने बातचीत करताना त्यांनी हा मानस व्यक्त केला.

ठळक मुद्देकौटुंबिक मेळाव्यात तणाव दूर करणारनागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणार ठाणे पोलीस अधीक्षकपदाची घेतली सूत्रे

जितेंद्र कालेकरलोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाणे ग्रामीण भागातील अवैध धंदे आणि कुख्यात गुन्हेगारांचा बीमोड केला जाईल. कामात कुचराई करणाऱ्या पोलिसांवर प्रसंगी कारवाई केली जाईल. पोलीस-जनता यांच्यात सुसंवाद निर्माण करून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही ठाणे ग्रामीणचे नवे पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांनी शुक्रवारी दिली. ठाण्याची सूत्रे घेतल्यानंतर ‘लोकमत’शी मनमोकळेपणाने बातचीत करताना त्यांनी हा मनोदय व्यक्त केला.डॉ. राठोड हे यापूर्वीही २००९ ते २०११ या कालावधीमध्ये ठाणे मुख्यालयात होते. २०११ ते २०१४ या काळात उल्हासनगरच्या उपायुक्तपदी त्यांनी आपली कारकीर्द गाजवली. त्यावेळी पप्पू कलानी यांना त्यांनी निवडणूक काळात अटकही केली होती. वेळ आणि शिस्तीचा लातूरमध्ये अधीक्षकपदी दबदबा निर्माण केलेल्या डॉ. राठोड यांनी मराठा मोर्चा आंदोलनासह अनेक प्रकरणे कौशल्याने हाताळली. अविनाश चव्हाण या खासगी क्लासचालकाच्या खून प्रकरणाचा २४ तासांतच छडा लावून आठ जणांना अटक केली. ‘मनोमिलन’ या अनोख्या उपक्रमांतर्गत भांडणामुळे विभक्त होण्याच्या वाटेवर असलेल्या सुमारे एक हजारांपेक्षा अधिक दाम्पत्यांचा संसार त्यांनी गेल्या तीन वर्षांत नव्याने फुलवला. स्वत: गायक असल्यामुळे महंमद रफी यांच्या आवाजातील ‘बहारों फुल बरसाओ...’ हे गाणे ते ‘मनोमिलना’च्या उपक्रमात गाऊन अशा जोडप्यांना त्यांच्या विवाहाच्या प्रसंगाची आठवण करून देत असल्याचेही त्यांनी सांगितले. गायनाच्या आवडीमुळे पोलीस आणि त्यांच्या कुटुंबीयांनाही त्यांनी एक सांस्कृतिक व्यासपीठ तयार केले. पोलीस स्रेहमेळाव्यातून स्वत: गाणी गात असल्यामुळे पोलीस अधिकारी, कर्मचारी यांचा कामावरील ताणतणाव आपोआपच दूर होत असल्याचे ते विश्वासाने सांगतात.चुकून घडलेल्या गुन्ह्यांमुळे एखाद्याला शिक्षा झाल्यानंतर शिक्षा भोगून आलेल्या व्यक्तीचे ‘परिवर्तन’ या कार्यक्रमात मनोगत ठेवून इतरांनी अशा गुन्ह्यांकडे न वळण्यासाठी प्रेरित केले जाते. बळीराजा सबलीकरण या मोहिमेंतर्गत लग्न किंवा इतर कार्यक्रमात डॉल्बी वाजवण्याला बंदी आणून तोच खर्च शेतकºयांच्या मदतीसाठी दिला. लातूरमध्ये अशी २५ लाखांची मदत लोकांनी करण्यासाठी त्यांचे मन वळवल्याची आठवणही त्यांनी सांगितली.ठाण्यातील अवैध धंदे आणि गावठी दारूविरुद्धची मोहीम यापुढेही अशाच प्रकारे व्यापकपणे चालू ठेवणार आहे. कुख्यात गुन्हेगारांवर मकोका आणि हद्दपारीची कारवाई करणार आहे. आरोपी दत्तक योजनेंतर्गत एक पोलीस एका आरोपीच्या हालचालींवर नजर ठेवेल. पोलीस आणि जनता संबंध दृढ करण्यावर भर देणार असून पोलीस ठाण्यात येणाºया प्रत्येकाचे समाधान करण्याच्या सूचनाही देण्यात येतील. त्यातून पोलिसांचीही प्रतिमा सुधारण्यास मदत होईल. शून्य पेंडन्सीद्वारे गुन्हे आणि अर्ज निकाली काढण्यावरही भर देणार असून गैरकृत्य आणि कामात कुचराई करणाºया पोलिसांवर तसेच अवैध धंद्यांवर कारवाईचा बडगा उगारणार असल्याचा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.....................रोज १० किलोमीटर चालणेगायनाची आवड असलेल्या डॉ. राठोड यांना चालण्याचीही आवड असून ते रोज १० किलोमीटर नियमित चालत असल्याचे सांगतात. गेल्या आठ वर्षांमध्ये यात खंड झालेला नसून चालण्यामुळे शरीरही तंदुरुस्त राहते. त्यामुळे ठाण्यातील पोलिसांमध्येही ही सवय आपण रुजवणार असल्याचे ते म्हणाले.............................दरम्यान, मावळते अधीक्षक डॉ. महेश पाटील यांनी ठाण्याची सूत्रे डॉ. राठोड यांच्याकडे सुपूर्द केल्यानंतर त्यांनी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची सूत्रे घेतली. ठाणे ग्रामीणच्या जनतेचे चांगले सहकार्य लाभले. ठाण्यात अवैध गावठी दारु बंदीबरोबरच अनेक क्लीष्ट गुन्हयांचा छडा लावल्याचे समधान असल्याचेही ते म्हणाले. 

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिसTransferबदली