शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

ठाणे ग्रामीणमधील अवैध धंद्यांसह गुन्हेगारांना वेसण घालणार- शिवाजी राठोड

By जितेंद्र कालेकर | Updated: August 3, 2018 23:30 IST

पोलीस-जनता यांच्यात सुसंवाद निर्माण करून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही ठाणे ग्रामीणचे नवे पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांनी शुक्रवारी दिली. ठाण्याची सूत्रे घेतल्यानंतर ‘लोकमत’शी मनमोकळेपणाने बातचीत करताना त्यांनी हा मानस व्यक्त केला.

ठळक मुद्देकौटुंबिक मेळाव्यात तणाव दूर करणारनागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणार ठाणे पोलीस अधीक्षकपदाची घेतली सूत्रे

जितेंद्र कालेकरलोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाणे ग्रामीण भागातील अवैध धंदे आणि कुख्यात गुन्हेगारांचा बीमोड केला जाईल. कामात कुचराई करणाऱ्या पोलिसांवर प्रसंगी कारवाई केली जाईल. पोलीस-जनता यांच्यात सुसंवाद निर्माण करून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही ठाणे ग्रामीणचे नवे पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांनी शुक्रवारी दिली. ठाण्याची सूत्रे घेतल्यानंतर ‘लोकमत’शी मनमोकळेपणाने बातचीत करताना त्यांनी हा मनोदय व्यक्त केला.डॉ. राठोड हे यापूर्वीही २००९ ते २०११ या कालावधीमध्ये ठाणे मुख्यालयात होते. २०११ ते २०१४ या काळात उल्हासनगरच्या उपायुक्तपदी त्यांनी आपली कारकीर्द गाजवली. त्यावेळी पप्पू कलानी यांना त्यांनी निवडणूक काळात अटकही केली होती. वेळ आणि शिस्तीचा लातूरमध्ये अधीक्षकपदी दबदबा निर्माण केलेल्या डॉ. राठोड यांनी मराठा मोर्चा आंदोलनासह अनेक प्रकरणे कौशल्याने हाताळली. अविनाश चव्हाण या खासगी क्लासचालकाच्या खून प्रकरणाचा २४ तासांतच छडा लावून आठ जणांना अटक केली. ‘मनोमिलन’ या अनोख्या उपक्रमांतर्गत भांडणामुळे विभक्त होण्याच्या वाटेवर असलेल्या सुमारे एक हजारांपेक्षा अधिक दाम्पत्यांचा संसार त्यांनी गेल्या तीन वर्षांत नव्याने फुलवला. स्वत: गायक असल्यामुळे महंमद रफी यांच्या आवाजातील ‘बहारों फुल बरसाओ...’ हे गाणे ते ‘मनोमिलना’च्या उपक्रमात गाऊन अशा जोडप्यांना त्यांच्या विवाहाच्या प्रसंगाची आठवण करून देत असल्याचेही त्यांनी सांगितले. गायनाच्या आवडीमुळे पोलीस आणि त्यांच्या कुटुंबीयांनाही त्यांनी एक सांस्कृतिक व्यासपीठ तयार केले. पोलीस स्रेहमेळाव्यातून स्वत: गाणी गात असल्यामुळे पोलीस अधिकारी, कर्मचारी यांचा कामावरील ताणतणाव आपोआपच दूर होत असल्याचे ते विश्वासाने सांगतात.चुकून घडलेल्या गुन्ह्यांमुळे एखाद्याला शिक्षा झाल्यानंतर शिक्षा भोगून आलेल्या व्यक्तीचे ‘परिवर्तन’ या कार्यक्रमात मनोगत ठेवून इतरांनी अशा गुन्ह्यांकडे न वळण्यासाठी प्रेरित केले जाते. बळीराजा सबलीकरण या मोहिमेंतर्गत लग्न किंवा इतर कार्यक्रमात डॉल्बी वाजवण्याला बंदी आणून तोच खर्च शेतकºयांच्या मदतीसाठी दिला. लातूरमध्ये अशी २५ लाखांची मदत लोकांनी करण्यासाठी त्यांचे मन वळवल्याची आठवणही त्यांनी सांगितली.ठाण्यातील अवैध धंदे आणि गावठी दारूविरुद्धची मोहीम यापुढेही अशाच प्रकारे व्यापकपणे चालू ठेवणार आहे. कुख्यात गुन्हेगारांवर मकोका आणि हद्दपारीची कारवाई करणार आहे. आरोपी दत्तक योजनेंतर्गत एक पोलीस एका आरोपीच्या हालचालींवर नजर ठेवेल. पोलीस आणि जनता संबंध दृढ करण्यावर भर देणार असून पोलीस ठाण्यात येणाºया प्रत्येकाचे समाधान करण्याच्या सूचनाही देण्यात येतील. त्यातून पोलिसांचीही प्रतिमा सुधारण्यास मदत होईल. शून्य पेंडन्सीद्वारे गुन्हे आणि अर्ज निकाली काढण्यावरही भर देणार असून गैरकृत्य आणि कामात कुचराई करणाºया पोलिसांवर तसेच अवैध धंद्यांवर कारवाईचा बडगा उगारणार असल्याचा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.....................रोज १० किलोमीटर चालणेगायनाची आवड असलेल्या डॉ. राठोड यांना चालण्याचीही आवड असून ते रोज १० किलोमीटर नियमित चालत असल्याचे सांगतात. गेल्या आठ वर्षांमध्ये यात खंड झालेला नसून चालण्यामुळे शरीरही तंदुरुस्त राहते. त्यामुळे ठाण्यातील पोलिसांमध्येही ही सवय आपण रुजवणार असल्याचे ते म्हणाले.............................दरम्यान, मावळते अधीक्षक डॉ. महेश पाटील यांनी ठाण्याची सूत्रे डॉ. राठोड यांच्याकडे सुपूर्द केल्यानंतर त्यांनी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची सूत्रे घेतली. ठाणे ग्रामीणच्या जनतेचे चांगले सहकार्य लाभले. ठाण्यात अवैध गावठी दारु बंदीबरोबरच अनेक क्लीष्ट गुन्हयांचा छडा लावल्याचे समधान असल्याचेही ते म्हणाले. 

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिसTransferबदली