शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

Maharashtra Election 2019: कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2019 05:35 IST

राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल । प्रत्येक वेळी आग लावतो, हा आक्षेप चुकीचा

भिवंडी/कल्याण : मागील निवडणुकीवेळी भाजपची घोषणा होती, कुठे नऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? आज तोच प्रश्न आम्ही त्यांना विचारतोय. मुलभूत सुविधाही तुम्ही पुरवू शकलेला नाहीत. खासगीच नव्हे, तर ३० टक्के सरकारी नोकºयाही जाण्याची वेळ आली आहे. सरकारच्या कामगिरीबद्दल लोकांच्या मनात चीड आहे. ती बाहेर काढण्यासाठी आम्हाला संधी द्या. आम्ही तुमच्या वतीने विरोधक म्हणून सरकारला जाब विचारू, अशी भूमिका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी भिवंडी आणि कल्याणच्या सभेत मांडली. पावसामुळे दोन्ही सभांत व्यत्यय आला असला, तरी नंतर त्या व्यवस्थित पार पडल्या.

दोन्ही शहरांतील खड्डे, वाहतूक कोंडी यांचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी स्मार्ट सिटी योजनेतील अपयशावर बोट ठेवले. कल्याण-डोंबिवलीसाठी घोषित केलेले ६,५०० कोटींचे पॅकेज कुठे गेले, अशी विचारणा त्यांनी केली. सध्या शहरांची दैना उडाली असली, तरी नागरिकांना चीड कशी येत नाही, मेक्सिकोत ज्या पद्धतीने मंत्र्याला फरपटत नेले, तसे तुम्ही पेटून उठणार की नाही, असा सवाल त्यांनी उपस्थितांना केला.मी परप्रांतीयाबद्दल आंदोलने केली, तर त्याला भंपक प्रसिद्धी दिली जाते, पण गुजरातमधून मराठी माणसांना पिटाळून लावणाºया कल्पेश ठाकूरला मात्र भाजपमध्ये मानाने प्रवेश दिला जातो. तेथील परप्रांतीयांविरोधातील आंदोलने दाबली जातात, असा आरोप ठाकरे यांनी केला.

सभेच्या ठिकाणी सुरक्षिततेसाठी उभ्या असलेल्या अग्निशमन दलाच्या गाड्या पाहून प्रत्येक वेळी मी आग लावतो, असे नाही असा टोलाही त्यांनी लगावला.काही पत्रकार खोचकपणे माझ्यावर आंदोलने अर्धवट सोडल्याची टीका करतात. पण असे एकतरी आंदोलन दाखवून द्यावे, असा प्रश्न करत राज ठाकरे यांनी मनसेमुळेच टोलमुक्ती झाल्याचा दाखला दिला.ज्या भाजप-शिवसेनेने टोलमुक्तीचे आश्वासन मागील निवडणुकीत दिले होते, ते पाळले नसल्याचा ठपका त्यांनी ठेवला. उलट त्या सरकारमधील मंत्री नितीन गडकरी टोलमुक्ती कशी शक्य आहे, असा प्रश्न विचारत असल्याकडे राज यांनी लक्ष वेधले.'राज्याच्या प्रश्नावर निवडणूक लढवा'बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या, नागरी समस्या आदी राज्याच्या समस्यांवर निवडणूक लढवा, असे आव्हान राज ठाकरे यांनी या सभांतही सत्ताधाऱ्यांना दिले. ३७० कलमासारखे मुद्दे उपस्थित करायचे, देशभक्तीच्या नावे भावना घरंगळत न्यायच्या हा यांचा अजेंडा आहे. त्यापेक्षा राज्याच्या प्रश्नावर निवडणूक लढवायला हवी. सत्ताधारी तसे करत नसतील, तर मतदारांनी त्यांना जाब विचारायला हवा, असे आवाहन त्यांनी केले.

टॅग्स :kalyan-east-acकल्याण पूर्वRaj Thackerayराज ठाकरेMNSमनसे