शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदारला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
5
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
6
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
7
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
8
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
9
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
10
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
11
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
12
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
13
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
14
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
15
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
16
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
17
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
18
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
19
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
20
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 

Maharashtra Election 2019: कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2019 05:35 IST

राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल । प्रत्येक वेळी आग लावतो, हा आक्षेप चुकीचा

भिवंडी/कल्याण : मागील निवडणुकीवेळी भाजपची घोषणा होती, कुठे नऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? आज तोच प्रश्न आम्ही त्यांना विचारतोय. मुलभूत सुविधाही तुम्ही पुरवू शकलेला नाहीत. खासगीच नव्हे, तर ३० टक्के सरकारी नोकºयाही जाण्याची वेळ आली आहे. सरकारच्या कामगिरीबद्दल लोकांच्या मनात चीड आहे. ती बाहेर काढण्यासाठी आम्हाला संधी द्या. आम्ही तुमच्या वतीने विरोधक म्हणून सरकारला जाब विचारू, अशी भूमिका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी भिवंडी आणि कल्याणच्या सभेत मांडली. पावसामुळे दोन्ही सभांत व्यत्यय आला असला, तरी नंतर त्या व्यवस्थित पार पडल्या.

दोन्ही शहरांतील खड्डे, वाहतूक कोंडी यांचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी स्मार्ट सिटी योजनेतील अपयशावर बोट ठेवले. कल्याण-डोंबिवलीसाठी घोषित केलेले ६,५०० कोटींचे पॅकेज कुठे गेले, अशी विचारणा त्यांनी केली. सध्या शहरांची दैना उडाली असली, तरी नागरिकांना चीड कशी येत नाही, मेक्सिकोत ज्या पद्धतीने मंत्र्याला फरपटत नेले, तसे तुम्ही पेटून उठणार की नाही, असा सवाल त्यांनी उपस्थितांना केला.मी परप्रांतीयाबद्दल आंदोलने केली, तर त्याला भंपक प्रसिद्धी दिली जाते, पण गुजरातमधून मराठी माणसांना पिटाळून लावणाºया कल्पेश ठाकूरला मात्र भाजपमध्ये मानाने प्रवेश दिला जातो. तेथील परप्रांतीयांविरोधातील आंदोलने दाबली जातात, असा आरोप ठाकरे यांनी केला.

सभेच्या ठिकाणी सुरक्षिततेसाठी उभ्या असलेल्या अग्निशमन दलाच्या गाड्या पाहून प्रत्येक वेळी मी आग लावतो, असे नाही असा टोलाही त्यांनी लगावला.काही पत्रकार खोचकपणे माझ्यावर आंदोलने अर्धवट सोडल्याची टीका करतात. पण असे एकतरी आंदोलन दाखवून द्यावे, असा प्रश्न करत राज ठाकरे यांनी मनसेमुळेच टोलमुक्ती झाल्याचा दाखला दिला.ज्या भाजप-शिवसेनेने टोलमुक्तीचे आश्वासन मागील निवडणुकीत दिले होते, ते पाळले नसल्याचा ठपका त्यांनी ठेवला. उलट त्या सरकारमधील मंत्री नितीन गडकरी टोलमुक्ती कशी शक्य आहे, असा प्रश्न विचारत असल्याकडे राज यांनी लक्ष वेधले.'राज्याच्या प्रश्नावर निवडणूक लढवा'बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या, नागरी समस्या आदी राज्याच्या समस्यांवर निवडणूक लढवा, असे आव्हान राज ठाकरे यांनी या सभांतही सत्ताधाऱ्यांना दिले. ३७० कलमासारखे मुद्दे उपस्थित करायचे, देशभक्तीच्या नावे भावना घरंगळत न्यायच्या हा यांचा अजेंडा आहे. त्यापेक्षा राज्याच्या प्रश्नावर निवडणूक लढवायला हवी. सत्ताधारी तसे करत नसतील, तर मतदारांनी त्यांना जाब विचारायला हवा, असे आवाहन त्यांनी केले.

टॅग्स :kalyan-east-acकल्याण पूर्वRaj Thackerayराज ठाकरेMNSमनसे