शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
2
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
5
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
6
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
7
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
8
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
9
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
10
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
11
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
12
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
13
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
14
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
15
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
16
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
17
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
18
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
19
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
20
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश

कर्जमाफीचा लाभ कधी मिळणार? पालघरच्या ३१ हजारपैकी अवघ्या २० शेतक-यांना लाभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2017 19:14 IST

राज्यातील बहुतांशी शेतक-यांना कर्जमाफीचा लाभ झाला आहे. मात्र, मुंबईच्या वेशीवर असलेल्या ठाणे जिल्ह्यातील ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (टीडीसीसी) ३३ हजार ८८३ खातेदार शेतक-यांना कर्जमाफीचा लाभ झालेला नाही.

सुरेश लोखंडेठाणे : राज्यातील बहुतांशी शेतक-यांना कर्जमाफीचा लाभ झाला आहे. मात्र, मुंबईच्या वेशीवर असलेल्या ठाणे जिल्ह्यातील ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (टीडीसीसी) ३३ हजार ८८३ खातेदार शेतक-यांना कर्जमाफीचा लाभ झालेला नाही. यामुळे ठाणे जिल्ह्यात जिल्हा परिषद - पंचायत समित्यांच्या निवडणुकीच्या वेळी शेतकरी सत्ताधारी पक्षांच्या उमेदवाराना जाब विचारत असून यावरून चांगलेच वातावरण तापले आहे.

कर्जमाफीची घोषणा होऊन आणि त्यावरील श्रेय घेऊन काही महिने उलटले आहेत. मात्र, या रकमेपैकी देखील लाभ ठाणे जिल्ह्यातील शेतकºयांना झालेला नाही. दोन्ही जिल्ह्यात सत्ताधारी पक्षांचे तीन मंत्री आणि १६ आमदार व ४ खासदार असतानाही शेतकºयांना त्याच्या या हक्काच्या लाभापासून वंचित राहावे लागले आहे. याची मोठी किंमत आता ठाणे जिल्ह्यात जि.प. पंचायत समिती निवडणुकीत दोन्ही पक्षांना मोजावी लागू शकते.

टीडीसीसी बँकेच्या १०१ शाखांपैकी ५९ शाखांमध्ये ३३ हजार ८८३ शेतकरी खातेदार आहेत. या शेतक-यांना दीड लाखांपर्यंत कर्जमाफीची सवलत असतानाही त्यांना आजपर्यंतही या रकमेचा लाभ मिळाला नसल्याचे वास्तव समोर आले आहे. याशिवाय पालघर जिल्ह्यातही ३१ हजार २९ शेतकरी टीडीसीसीचे खातेदार आहेत. या खातेदारांपैकी आतापर्यंत केवळ २० शेतक-यांना कर्जमाफीचा लाभ झाला आहे. सुमारे आठ लाख ५७ हजार ९३५ रूपये रूपयांची रक्कम या शेतक-यांना वाटप करण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्यासाठी मात्र अद्याप रक्कम आलेली नाही. पण आता लवकरच या रकमा बँकेत जमा होणार असून त्या त्त्वरीत शेतक-यांच्या खात्यावर वर्ग केल्या जातील. यासाठी शासनाकडून सुमारे दोन - दोन हजार शेतक-यांच्या नावांची यादी मिळणार आहे. त्यातील योग्य लाभार्थ्यांची खात्री करून कर्जमाफीची रक्कम शासनाकडून मिळणार असल्याची टीडीसीसीचे उपाध्यक्ष भाऊ कु-हाडे व सीईओ भागीरथ भोईर यांनी लोकमतला सांगितले.

टॅग्स :Farmerशेतकरी