शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

कर्जमाफीचा लाभ कधी मिळणार? पालघरच्या ३१ हजारपैकी अवघ्या २० शेतक-यांना लाभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2017 19:14 IST

राज्यातील बहुतांशी शेतक-यांना कर्जमाफीचा लाभ झाला आहे. मात्र, मुंबईच्या वेशीवर असलेल्या ठाणे जिल्ह्यातील ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (टीडीसीसी) ३३ हजार ८८३ खातेदार शेतक-यांना कर्जमाफीचा लाभ झालेला नाही.

सुरेश लोखंडेठाणे : राज्यातील बहुतांशी शेतक-यांना कर्जमाफीचा लाभ झाला आहे. मात्र, मुंबईच्या वेशीवर असलेल्या ठाणे जिल्ह्यातील ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (टीडीसीसी) ३३ हजार ८८३ खातेदार शेतक-यांना कर्जमाफीचा लाभ झालेला नाही. यामुळे ठाणे जिल्ह्यात जिल्हा परिषद - पंचायत समित्यांच्या निवडणुकीच्या वेळी शेतकरी सत्ताधारी पक्षांच्या उमेदवाराना जाब विचारत असून यावरून चांगलेच वातावरण तापले आहे.

कर्जमाफीची घोषणा होऊन आणि त्यावरील श्रेय घेऊन काही महिने उलटले आहेत. मात्र, या रकमेपैकी देखील लाभ ठाणे जिल्ह्यातील शेतकºयांना झालेला नाही. दोन्ही जिल्ह्यात सत्ताधारी पक्षांचे तीन मंत्री आणि १६ आमदार व ४ खासदार असतानाही शेतकºयांना त्याच्या या हक्काच्या लाभापासून वंचित राहावे लागले आहे. याची मोठी किंमत आता ठाणे जिल्ह्यात जि.प. पंचायत समिती निवडणुकीत दोन्ही पक्षांना मोजावी लागू शकते.

टीडीसीसी बँकेच्या १०१ शाखांपैकी ५९ शाखांमध्ये ३३ हजार ८८३ शेतकरी खातेदार आहेत. या शेतक-यांना दीड लाखांपर्यंत कर्जमाफीची सवलत असतानाही त्यांना आजपर्यंतही या रकमेचा लाभ मिळाला नसल्याचे वास्तव समोर आले आहे. याशिवाय पालघर जिल्ह्यातही ३१ हजार २९ शेतकरी टीडीसीसीचे खातेदार आहेत. या खातेदारांपैकी आतापर्यंत केवळ २० शेतक-यांना कर्जमाफीचा लाभ झाला आहे. सुमारे आठ लाख ५७ हजार ९३५ रूपये रूपयांची रक्कम या शेतक-यांना वाटप करण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्यासाठी मात्र अद्याप रक्कम आलेली नाही. पण आता लवकरच या रकमा बँकेत जमा होणार असून त्या त्त्वरीत शेतक-यांच्या खात्यावर वर्ग केल्या जातील. यासाठी शासनाकडून सुमारे दोन - दोन हजार शेतक-यांच्या नावांची यादी मिळणार आहे. त्यातील योग्य लाभार्थ्यांची खात्री करून कर्जमाफीची रक्कम शासनाकडून मिळणार असल्याची टीडीसीसीचे उपाध्यक्ष भाऊ कु-हाडे व सीईओ भागीरथ भोईर यांनी लोकमतला सांगितले.

टॅग्स :Farmerशेतकरी