शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

शैक्षणिक साहित्य केव्हा? आरटीई विद्याथी, पालकांचा आंदोलनाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2019 01:15 IST

भिवंडीतील अनेक शाळांमध्ये आरटीई अंतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना आॅगस्ट महिना उलटून गेला तरी अद्यापही शैक्षणिक साहित्य दिले नसल्याची बाब समोर आली आहे .

भिवंडी : भिवंडीतील अनेक शाळांमध्ये आरटीई अंतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना आॅगस्ट महिना उलटून गेला तरी अद्यापही शैक्षणिक साहित्य दिले नसल्याची बाब समोर आली आहे . त्यामुळे तालुक्यातील अनेक आरटीई विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे. पंचायत समिती शिक्षण विभाग फक्त कागदी घोडे नाचवून आरटीई अंतर्गत संबंधित शाळांवर नोटीस व कारवाई केल्याची बतावणी करत आहे. शैक्षणिक साहित्य पुरवले नसल्याने पालकांमध्ये संताप पसरला असून ते आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.भिवंडीतील आॅल सेंट हायस्कूल, प्रेसिडेन्सी स्कूल, संस्कार इंग्लिश मिडियम स्कूल, बेनिझर इंग्लिश स्कूल यांच्यासह आणखी इतरही शाळांमध्ये तालुक्यातील अनेक विद्यार्थ्यांनी आरटीई कायद्याअंतर्गत प्रवेश घेतला असून या विद्यार्थ्यांना शाळेने शैक्षणिक साहित्यापासून अजूनही वंचित ठेवले आहे. आधी फी भरा मगच साहित्य मिळेल असा फतवा या शाळांनी काढला असल्याने पालकांनी संताप व्यक्त केला आहे . तर संबंधित शाळांना व पंचायत समितीच्या शिक्षण अधिकाऱ्यांकडे वारंवार निवेदन सादर करून व चकरा मारूनही आरटीई प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना अजूनही न्याय मिळालेला नाही. आपल्याला न्याय मिळावा यासाठी पालकांनी थेट आंदोलनाचा इशारा दिला आहे.मात्र या आंदोलनानंतरही आरटीई विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मिळणार की नाही याकडे पालकांचे लक्ष लागले आहे. प्रशासनाच्या या भोंगळ कारभारामुळे पालकांनी संताप व्यक्त केला आहे. यात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.आम्ही अनेकवेळा निवेदन व विनंती अर्ज पंचायत समितीच्या गट शिक्षण अधिकाऱ्यांकडे केली आहे. मात्र गट शिक्षणाधिकारी त्याकडे दुर्लक्ष करत असून केवळ नोटीस पाठवली असल्याची माहिती देतात. मात्र शिक्षण विभागाच्या नोटीस नंतरही आरटीई शाळा अजूनही शैक्षणिक साहित्य का पुरवत नाही.- श्रीकांत भोईर, कार्यकर्तेआमच्याकडे आलेल्या तक्र ारीनुसार संबंधित शाळांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. मात्र तरीही संबंधित शाळांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरवले नसेल तर जिल्हा शिक्षण अधिकाºयांकडे त्यासंदर्भात कारवाई करण्यासाठीचा अहवाल पाठवण्यात येईल.- माधव पाटील, गट शिक्षणाधिकारीआरटीई अंतर्गत प्रवेश घेतल्यानंतर ज्युनियर आणि सिनियर केजीपर्यंत शाळेने सर्व शैक्षणिक साहित्य दिले होते. मात्र आता पहिलीसाठी शाळेने फक्त पुस्तके दिली आहेत. मात्र गणवेश व इतर आवश्यक साहित्य दिले नाही.- गजानन देवकाते, पालक

टॅग्स :Right To Educationशिक्षण हक्क कायदाEducationशिक्षण