शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
ईशनंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटंबाचा धक्कादायक खुलासा
3
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
4
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
5
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
6
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
7
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
8
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
9
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
10
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
11
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
12
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
13
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
14
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
15
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
16
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
17
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
18
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
19
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
20
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

जीएसटीचा दिलासा, तर नोटाबंदीचा जाच, व्यापाऱ्यांच्या मनात दडलंय काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2019 05:25 IST

चार व्यापारी, चार प्रश्न : कोणत्या मुद्द्यांवर भर, कोणता निर्णय ठरतो भारी, वाढलाय का कर?

व्यापाऱ्यांच्या मनात दडलंय काय?प्रश्न । सध्याच्या वातावरणात व्यवसाय, व्यापार करणे सोपे आहे की अवघड? का?

सध्या व्यापार करणे सोपे नाही. आधी जे काम सरळ व्हायचे, ते आता किचकट झाले आहे. कॅशलेस व्यवहारांमुळे व्यवहार मंदावले असून ते पूर्ण होण्यास दोन-तीन दिवस वाट बघावी लागते.चिन्मय कुलकर्णी,हॉटेल व्यावसायिकसध्याच्या वातावरणात व्यापाऱ्यांचे कंबरडे साफ मोडले आहे. आर्थिक मंदीमुळे प्रचंड तणाव आहे. त्यामुळे आर्थिक कुचंबणा होत असल्याचे चित्र आहे.प्रफुल्ल वाघाडकर,सराफ व्यापारीशहाण्याने व्यापार करू नये. सगळे व्यवहार व्हाइट झाल्याने मुख्य समस्या उद्भवली आहे. खेळते भागभांडवल उरले नाही. त्यामुळे सहज होणारी खरेदीविक्रीठप्प झाल्याचे चित्र आहे.अमित पिंगळे,कापड व्यावसायिकव्यवसाय करणे प्रचंड क्लिष्ट झाले आहे. नियमावलीची हळूहळू अंमलबजावणी हवी. त्यामुळे बाजारात मंदी आहे. व्यवहारांची कागदपत्रे, अटींची पूर्तता करतानाच वेळ जातो.संजय पाटील,बांधकाम व्यावसायिक

प्रश्न । नोटाबंदीनंतर फटका बसला होता का? त्याचा मत देण्यावर परिणाम होईल काय?

नोटाबंदीचा फटका बसला होता. पण, त्याचा परिणाम थेट मतदानावर होईल, असे काही वाटत नाही. सगळे व्यवसाय पारदर्शी झाल्याने उत्पन्नकर वेळेत भरावा लागत असून हा सकारात्मक भाग आहे.नोटाबंदीचा फटका निश्चितच बसला. काम करणाºया नोकरदारांसह छोटे व्यावसायिक, कारागिरांची अवस्था न सांगण्यासारखी आहे. सराफ व्यवसायाला मोठा फटका बसला.नोटाबंदीनंतरच तर खºया अर्थाने व्यापार-उद्योगाला फटका बसला. चांगल्या गोष्टींची अंमलबजावणी व्हायला वेळ लागतो. ६० वर्षांमध्ये जे झाले नाही, ते पाच वर्षांत कसे होणार? थोडा वेळ तर जाणारच.नोटाबंदीनंतर बाजारात खेळणारा पैसा कमी झाला. त्यात धंदे कमी झाले. नोकरीची हमी, सुरक्षा नाही. त्यामुळे बांधकाम व्यवसायात गुंतवणूक होणे गरजेचे होते, ते झालेले नाही.

प्रश्न । जीएसटीमुळे व्यवसायात सुसूत्रता आली का? की करांची कटकट वाढली आहे?

वस्तू आणि सेवाकरामुळे (जीएसटी) व्यवसायात सुसूत्रता आली. आधी करांमुळे खूप गोंधळ उडत होता. जीएसटीमुळे ती कटकट राहिलेली नाही. सगळ्यांसाठी एकच कर लागू झाला आहे.जीएसटीमुळे सुसूत्रता आली. करांची कटकट कमी झालेली आहे. कारण, एकाच ठिकाणी सगळे कर आलेत. त्यामुळे करभरणा प्रक्रियेत गतिमानता आली आहे.जीएसटीमुळे मोठ्या प्रमाणात सुसूत्रता आली. व्यवहार चांगले, पारदर्शी होतात. पण, जो व्यापारी असतो, त्याचा कर वाढतो. कॅशलेस व्यवहार होत असल्याने कराचा भार जाणवत आहे.जीएसटीमुळे नियमितता आली आहे, हे नक्की. नव्या व्यवस्थेला काही काळ लागतो. जीएसटी हळूहळू स्थिरस्थावर होत आहे. ही करप्रणाली व्यवसायासाठी पूरक ठरत आहे.

प्रश्न । निवडून येणाºया सरकार आणि स्थानिक खासदाराकडून तुमच्या अपेक्षा काय?

निवडून येणाºया सरकारने युवकांना व्यवसायासाठी संधी द्याव्यात. तसेच डोंबिवलीसंदर्भात या ठिकाणची प्रवेशद्वारे मोठी करावीत. रस्ते रुंद करावेत. त्यामुळे या ठिकाणी आलेली वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटेल.नव्या सरकारने मध्यमवर्गीयांचा व उच्चमध्यमवर्गीयांचा प्रामुख्याने विचार करावा. त्यांना सुरक्षा हवी आहे, ती देणे अत्यावश्यक आहे. त्यांच्या खिशावर डोळा ठेवून स्वप्न रचू नयेत.रस्ते चांगले असावेत. वाहतूककोंडी नसावी. पावसाळ्यात खड्ड्यांत रस्ते की रस्त्यांत खड्डे अशी स्थिती होते. त्यावर कायमचा तोडगा काढावा. तसेच सरकारी योजनांची सर्वसामान्यांपर्यंत जनजागृती व्हावी.भ्रष्टाचार कमी व्हायलाच हवा. ७/१२ काढण्यापासून सगळ्याच बाबींना प्रचंड पैसा द्यावा लागत आहे. व्यवसाय, उद्योग वाढायला हवेत. त्या अडचणी कमी व्हाव्यात, असे वाटते.

टॅग्स :Electionनिवडणूकlok sabhaलोकसभाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक