शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

जीएसटीचा दिलासा, तर नोटाबंदीचा जाच, व्यापाऱ्यांच्या मनात दडलंय काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2019 05:25 IST

चार व्यापारी, चार प्रश्न : कोणत्या मुद्द्यांवर भर, कोणता निर्णय ठरतो भारी, वाढलाय का कर?

व्यापाऱ्यांच्या मनात दडलंय काय?प्रश्न । सध्याच्या वातावरणात व्यवसाय, व्यापार करणे सोपे आहे की अवघड? का?

सध्या व्यापार करणे सोपे नाही. आधी जे काम सरळ व्हायचे, ते आता किचकट झाले आहे. कॅशलेस व्यवहारांमुळे व्यवहार मंदावले असून ते पूर्ण होण्यास दोन-तीन दिवस वाट बघावी लागते.चिन्मय कुलकर्णी,हॉटेल व्यावसायिकसध्याच्या वातावरणात व्यापाऱ्यांचे कंबरडे साफ मोडले आहे. आर्थिक मंदीमुळे प्रचंड तणाव आहे. त्यामुळे आर्थिक कुचंबणा होत असल्याचे चित्र आहे.प्रफुल्ल वाघाडकर,सराफ व्यापारीशहाण्याने व्यापार करू नये. सगळे व्यवहार व्हाइट झाल्याने मुख्य समस्या उद्भवली आहे. खेळते भागभांडवल उरले नाही. त्यामुळे सहज होणारी खरेदीविक्रीठप्प झाल्याचे चित्र आहे.अमित पिंगळे,कापड व्यावसायिकव्यवसाय करणे प्रचंड क्लिष्ट झाले आहे. नियमावलीची हळूहळू अंमलबजावणी हवी. त्यामुळे बाजारात मंदी आहे. व्यवहारांची कागदपत्रे, अटींची पूर्तता करतानाच वेळ जातो.संजय पाटील,बांधकाम व्यावसायिक

प्रश्न । नोटाबंदीनंतर फटका बसला होता का? त्याचा मत देण्यावर परिणाम होईल काय?

नोटाबंदीचा फटका बसला होता. पण, त्याचा परिणाम थेट मतदानावर होईल, असे काही वाटत नाही. सगळे व्यवसाय पारदर्शी झाल्याने उत्पन्नकर वेळेत भरावा लागत असून हा सकारात्मक भाग आहे.नोटाबंदीचा फटका निश्चितच बसला. काम करणाºया नोकरदारांसह छोटे व्यावसायिक, कारागिरांची अवस्था न सांगण्यासारखी आहे. सराफ व्यवसायाला मोठा फटका बसला.नोटाबंदीनंतरच तर खºया अर्थाने व्यापार-उद्योगाला फटका बसला. चांगल्या गोष्टींची अंमलबजावणी व्हायला वेळ लागतो. ६० वर्षांमध्ये जे झाले नाही, ते पाच वर्षांत कसे होणार? थोडा वेळ तर जाणारच.नोटाबंदीनंतर बाजारात खेळणारा पैसा कमी झाला. त्यात धंदे कमी झाले. नोकरीची हमी, सुरक्षा नाही. त्यामुळे बांधकाम व्यवसायात गुंतवणूक होणे गरजेचे होते, ते झालेले नाही.

प्रश्न । जीएसटीमुळे व्यवसायात सुसूत्रता आली का? की करांची कटकट वाढली आहे?

वस्तू आणि सेवाकरामुळे (जीएसटी) व्यवसायात सुसूत्रता आली. आधी करांमुळे खूप गोंधळ उडत होता. जीएसटीमुळे ती कटकट राहिलेली नाही. सगळ्यांसाठी एकच कर लागू झाला आहे.जीएसटीमुळे सुसूत्रता आली. करांची कटकट कमी झालेली आहे. कारण, एकाच ठिकाणी सगळे कर आलेत. त्यामुळे करभरणा प्रक्रियेत गतिमानता आली आहे.जीएसटीमुळे मोठ्या प्रमाणात सुसूत्रता आली. व्यवहार चांगले, पारदर्शी होतात. पण, जो व्यापारी असतो, त्याचा कर वाढतो. कॅशलेस व्यवहार होत असल्याने कराचा भार जाणवत आहे.जीएसटीमुळे नियमितता आली आहे, हे नक्की. नव्या व्यवस्थेला काही काळ लागतो. जीएसटी हळूहळू स्थिरस्थावर होत आहे. ही करप्रणाली व्यवसायासाठी पूरक ठरत आहे.

प्रश्न । निवडून येणाºया सरकार आणि स्थानिक खासदाराकडून तुमच्या अपेक्षा काय?

निवडून येणाºया सरकारने युवकांना व्यवसायासाठी संधी द्याव्यात. तसेच डोंबिवलीसंदर्भात या ठिकाणची प्रवेशद्वारे मोठी करावीत. रस्ते रुंद करावेत. त्यामुळे या ठिकाणी आलेली वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटेल.नव्या सरकारने मध्यमवर्गीयांचा व उच्चमध्यमवर्गीयांचा प्रामुख्याने विचार करावा. त्यांना सुरक्षा हवी आहे, ती देणे अत्यावश्यक आहे. त्यांच्या खिशावर डोळा ठेवून स्वप्न रचू नयेत.रस्ते चांगले असावेत. वाहतूककोंडी नसावी. पावसाळ्यात खड्ड्यांत रस्ते की रस्त्यांत खड्डे अशी स्थिती होते. त्यावर कायमचा तोडगा काढावा. तसेच सरकारी योजनांची सर्वसामान्यांपर्यंत जनजागृती व्हावी.भ्रष्टाचार कमी व्हायलाच हवा. ७/१२ काढण्यापासून सगळ्याच बाबींना प्रचंड पैसा द्यावा लागत आहे. व्यवसाय, उद्योग वाढायला हवेत. त्या अडचणी कमी व्हाव्यात, असे वाटते.

टॅग्स :Electionनिवडणूकlok sabhaलोकसभाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक