शहरं
Join us  
Trending Stories
1
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
4
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
5
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
6
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
7
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
8
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
9
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
10
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
11
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
12
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
13
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
14
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
15
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
16
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
17
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
18
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
19
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
20
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले

जीएसटीचा दिलासा, तर नोटाबंदीचा जाच, व्यापाऱ्यांच्या मनात दडलंय काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2019 05:25 IST

चार व्यापारी, चार प्रश्न : कोणत्या मुद्द्यांवर भर, कोणता निर्णय ठरतो भारी, वाढलाय का कर?

व्यापाऱ्यांच्या मनात दडलंय काय?प्रश्न । सध्याच्या वातावरणात व्यवसाय, व्यापार करणे सोपे आहे की अवघड? का?

सध्या व्यापार करणे सोपे नाही. आधी जे काम सरळ व्हायचे, ते आता किचकट झाले आहे. कॅशलेस व्यवहारांमुळे व्यवहार मंदावले असून ते पूर्ण होण्यास दोन-तीन दिवस वाट बघावी लागते.चिन्मय कुलकर्णी,हॉटेल व्यावसायिकसध्याच्या वातावरणात व्यापाऱ्यांचे कंबरडे साफ मोडले आहे. आर्थिक मंदीमुळे प्रचंड तणाव आहे. त्यामुळे आर्थिक कुचंबणा होत असल्याचे चित्र आहे.प्रफुल्ल वाघाडकर,सराफ व्यापारीशहाण्याने व्यापार करू नये. सगळे व्यवहार व्हाइट झाल्याने मुख्य समस्या उद्भवली आहे. खेळते भागभांडवल उरले नाही. त्यामुळे सहज होणारी खरेदीविक्रीठप्प झाल्याचे चित्र आहे.अमित पिंगळे,कापड व्यावसायिकव्यवसाय करणे प्रचंड क्लिष्ट झाले आहे. नियमावलीची हळूहळू अंमलबजावणी हवी. त्यामुळे बाजारात मंदी आहे. व्यवहारांची कागदपत्रे, अटींची पूर्तता करतानाच वेळ जातो.संजय पाटील,बांधकाम व्यावसायिक

प्रश्न । नोटाबंदीनंतर फटका बसला होता का? त्याचा मत देण्यावर परिणाम होईल काय?

नोटाबंदीचा फटका बसला होता. पण, त्याचा परिणाम थेट मतदानावर होईल, असे काही वाटत नाही. सगळे व्यवसाय पारदर्शी झाल्याने उत्पन्नकर वेळेत भरावा लागत असून हा सकारात्मक भाग आहे.नोटाबंदीचा फटका निश्चितच बसला. काम करणाºया नोकरदारांसह छोटे व्यावसायिक, कारागिरांची अवस्था न सांगण्यासारखी आहे. सराफ व्यवसायाला मोठा फटका बसला.नोटाबंदीनंतरच तर खºया अर्थाने व्यापार-उद्योगाला फटका बसला. चांगल्या गोष्टींची अंमलबजावणी व्हायला वेळ लागतो. ६० वर्षांमध्ये जे झाले नाही, ते पाच वर्षांत कसे होणार? थोडा वेळ तर जाणारच.नोटाबंदीनंतर बाजारात खेळणारा पैसा कमी झाला. त्यात धंदे कमी झाले. नोकरीची हमी, सुरक्षा नाही. त्यामुळे बांधकाम व्यवसायात गुंतवणूक होणे गरजेचे होते, ते झालेले नाही.

प्रश्न । जीएसटीमुळे व्यवसायात सुसूत्रता आली का? की करांची कटकट वाढली आहे?

वस्तू आणि सेवाकरामुळे (जीएसटी) व्यवसायात सुसूत्रता आली. आधी करांमुळे खूप गोंधळ उडत होता. जीएसटीमुळे ती कटकट राहिलेली नाही. सगळ्यांसाठी एकच कर लागू झाला आहे.जीएसटीमुळे सुसूत्रता आली. करांची कटकट कमी झालेली आहे. कारण, एकाच ठिकाणी सगळे कर आलेत. त्यामुळे करभरणा प्रक्रियेत गतिमानता आली आहे.जीएसटीमुळे मोठ्या प्रमाणात सुसूत्रता आली. व्यवहार चांगले, पारदर्शी होतात. पण, जो व्यापारी असतो, त्याचा कर वाढतो. कॅशलेस व्यवहार होत असल्याने कराचा भार जाणवत आहे.जीएसटीमुळे नियमितता आली आहे, हे नक्की. नव्या व्यवस्थेला काही काळ लागतो. जीएसटी हळूहळू स्थिरस्थावर होत आहे. ही करप्रणाली व्यवसायासाठी पूरक ठरत आहे.

प्रश्न । निवडून येणाºया सरकार आणि स्थानिक खासदाराकडून तुमच्या अपेक्षा काय?

निवडून येणाºया सरकारने युवकांना व्यवसायासाठी संधी द्याव्यात. तसेच डोंबिवलीसंदर्भात या ठिकाणची प्रवेशद्वारे मोठी करावीत. रस्ते रुंद करावेत. त्यामुळे या ठिकाणी आलेली वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटेल.नव्या सरकारने मध्यमवर्गीयांचा व उच्चमध्यमवर्गीयांचा प्रामुख्याने विचार करावा. त्यांना सुरक्षा हवी आहे, ती देणे अत्यावश्यक आहे. त्यांच्या खिशावर डोळा ठेवून स्वप्न रचू नयेत.रस्ते चांगले असावेत. वाहतूककोंडी नसावी. पावसाळ्यात खड्ड्यांत रस्ते की रस्त्यांत खड्डे अशी स्थिती होते. त्यावर कायमचा तोडगा काढावा. तसेच सरकारी योजनांची सर्वसामान्यांपर्यंत जनजागृती व्हावी.भ्रष्टाचार कमी व्हायलाच हवा. ७/१२ काढण्यापासून सगळ्याच बाबींना प्रचंड पैसा द्यावा लागत आहे. व्यवसाय, उद्योग वाढायला हवेत. त्या अडचणी कमी व्हाव्यात, असे वाटते.

टॅग्स :Electionनिवडणूकlok sabhaलोकसभाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक