शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

तुमचा खासदार करतो काय?, त्यांची कामे आम्हाला का विचारता? - राज ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2018 18:16 IST

राज ठाकरे यांना रेल्वे प्रवासी महासंघाने केला असता ते म्हणाले की, तुमचा खासदार करतो काय? जी कामे त्यांनी करायची ती आम्हाला का विचारता? निवडून देतांना ते आणि समस्यांसाठी आम्ही हे सूत्र जमणार नाही. निवडणुकांच्या वेळी मतदारांनी विचार करायला हवा असेही ते म्हणाले.

डोंबिवली : रेल्वे प्रवाशांच्या समस्या दिवसेंदिवस वाढत असून त्या कमी करण्यासाठी कोणतीही ठोस उपाययोजना केली जात नाही, त्या बद्दल मनसेने पुन्हा एकदा आवाज उठवावा असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना रेल्वे प्रवासी महासंघाने केला असता ते म्हणाले की, तुमचा खासदार करतो काय? जी कामे त्यांनी करायची ती आम्हाला का विचारता? निवडून देतांना ते आणि समस्यांसाठी आम्ही हे सूत्र जमणार नाही. निवडणुकांच्या वेळी मतदारांनी विचार करायला हवा असेही ते म्हणाले.शनिवारी डोंबिवलीत शनिवारी युवा पदाधिकारी सागर जेधे, नगरसेवक मंदार हळबे यांच्या नुतन कार्यालयाच्या शुभारंभासाठी ते आले असतांना त्यांनी उपनगरिय रेल्वे प्रवासी एकता संस्थेच्या पदाधिका-यांसमवेत चर्चा केली. २०१२ पासून आतापर्यंत महिला विशेष लोकल नाही, गर्दीच्या वेळेत विशेष लोकल सुविधा नाही. त्यामुळे प्रवासी हैराण असून अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे हे गंभीर आहे. त्यावर प्रवासी संघटनेने कटाक्ष टाकला असता ते म्हणाले की, समस्या आहेत, त्या सोडवण्यासाठी मनसे पक्ष प्रयत्न करतच आहे. फेरीवाला प्रश्न हा दादरपासून डोंबिवलीपर्यंत बहुतांशी रेल्वे स्थानक परिसरात तरी कमी झाला असून यासह अनेक समस्यांना मार्गी लावण्यासाठी ठाकरेंनी पुढे यावे, सातत्याने बैठका करण्यासंदर्भात आश्वासन दिले होते, परंतू ते पूर्ण झाले नाही, असे म्हंटल्यावर ठाकरे यांनी प्रवासी संघटनांनी यावे निश्चितच चर्चा केली जाईल असे स्पष्ट केले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गतवर्षी ५ आॅक्टोबर रोजी प्रवासी संघटनांच्या शिष्ठ मंडळासोबत मध्य, पश्चिम रेल्वेच्या महाव्यवस्थापकांसमवेत चर्चा केली होती. तशी भेट पुन्हा एकदा होणे आवश्यक आहे असा आग्रह केल्यावर मात्र ते म्हणाले की, जी काम खासदाराने करायची ती त्यांनीच केली पाहिजेत. ५/६व्या रेल्वे मार्गासंदर्भात सातत्याने डेडलाईन पुढे ढकलली जात आहे हे कितपत योग्य आहे? यावर ते म्हणाले की, निवडून ज्यांना दिलेत त्यांना हे प्रश्न विचारणे आवश्यक आहे. तसेच लवकरच प्रवासी संघटनांसमवेत चर्चा करून समस्या मांडण्यात येतील.

दरम्यान जेधे यांच्या डिएनसी महाविद्यालयानजीकच्या सुनिल नगर येथील, आणि मंदार हळबेंच्या राजाजीपथ येथील स्वामी नारायण मंदिरासमोरील इमारतीमधील पक्षाच्या नुतन कार्यालयाच्या शुभारंभ राज ठाकरे यांनी केला. सकाळी ते मनसे नेते राजू पाटील यांच्या निवासस्थानी आणि कार्यालयात गेले होते. तेथे त्यांनी पाटील यांच्या घरामध्ये असलेल्या श्वानांसमवेत वेळ घालवला. तसेच पाटील यांच्याशी काही चर्चा केली. त्यावेळी मनसे नेते राजू पाटील, अभिजीत पानसे, मनसेचे नगरसेवक, महिला, पुरूष, युवा कार्यकर्ते आदींसह नागरिक उपस्थित होते.

 मनसे नेते राजू पाटील यांच्या शांतीरत्न कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी उत्साहाने फोटो सोशल मिडीयावर व्हायरल केले. पण त्यामुळे आगामी निवडणुकांच्या काळात मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्ष मिळून वेगळे सूत्र, समीकरण मतदारांसमोर येणार का याची सर्वत्र चर्चा सुरू होती. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेdombivaliडोंबिवली