शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पालिका आयुक्त संजीव जयस्वालांबद्दल ठाण्याचे पोलीस आयुक्त सिंग काय म्हणाले?

By जितेंद्र कालेकर | Updated: June 28, 2018 21:13 IST

गेल्या तीन वर्षात ठाणे शहरातील गुन्हेगारी पाच टक्क्यांपर्यत घटल्याचा दावा ठाण्याचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी गुरूवारी केला. पूर्वी आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात महिन्याला ७० ते ८० सोनसाखळी जबरी चोरीचे गुन्हे दाखल होत होते. हे प्रमाण आता अगदी नगण्य झाले आहे.

ठळक मुद्देमुंबई सीपी होणार की नाही हे सांगणे अनिश्चिततीन वर्षात गुन्हेगारी पाच टक्क्यांपर्यत घटल्याचा दावाठाण्याच्या कारकिर्दीबद्दल समाधानी

जितेंद्र कालेकरठाणे : ठाण्याच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातील बाळ चोरीचे प्रकरण असो की, बिल्डर सूरज परमार आत्महत्या प्रकरण प्रत्येक वेळी ठाणे पोलिसांनी कारवाई करून चोख भूमीका बजावली. त्यामुळेच गेल्या तीन वर्षात गुन्हेगारी वाढण्याऐवजी पाच टक्क्यांपर्यत घटल्याचा दावा ठाण्याचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी गुरूवारी केला. गेल्या तीन वर्षातील आपल्या कारकिर्दीबद्दल समाधान व्यक्त करतांना ठाणेकरांचे चांगले सहकार्य लाभल्याचेही ते म्हणाले.मार्च २०१५ मध्ये पोलीस आयुक्तपदाची सूत्रे घेतल्यापासून ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि वागळे इस्टेट या पाचही परिमंडळातील पोलीस ठाणे आणि गुन्हे अन्वेषण विभागाच्या सर्व पथकांनी चांगली कामगिरी बजावल्याचेही सिंग म्हणाले. ठाण्यातील कार्यकाळ पूर्ण झाल्याने बदलीची शक्यता असल्यामुळे पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारण्यासाठी पोलीस आयुक्तालयात गुरूवारी सायंकाळी विशेष चहापानाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी त्यांनी आपल्या कारकिर्दीबद्दल थोडक्यात आढावा घेतला. बऱ्याचदा दरवर्षी १० ते १५ टक्क्यांनी गुन्हेगारी वाढल्याचे चित्र असते. परंतु, ठाण्यात तीत पाच टक्के घट आली आहे. कुख्यात इराणी सोनसाखळी चोरट्यांचा मुसक्या आवळल्या. यात ८० हून अधिक चोरटे जेरबंद केले. तर ३८ जणांवर मोकंतर्गत कारवाई केली. अनेक सोनसाखळ्या जप्तही केल्या. पूर्वी आयुक्तालयात महिन्याला ७० ते ८० सोनसाखळी जबरी चोरीचे गुन्हे दाखल होत होते. हे प्रमाण आता अगदी १० ते १५ वर आले आहे.इफेड्रिन या अमली पदार्थाची विक्री करणा-यांना ठाण्यातून पकडल्यानंतर त्याची निर्मिती करणा-या सोलापुरातील एव्हॉन लाईफ सायन्सेस या कंपनीवरच धाड टाकून दोन हजार कोटींचे इफेड्रिन जप्त केले. यात कंपनीच्या मालकासह १५ जणांना अटक केली. या प्रकरणामुळे देश विदेशात ठाणे पोलिसांचे कौतुक झाले.कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इकबाल कासकरला खंडणी प्रकरणात केलेली अटक, जिल्हा रुग्णालयातून अपहरण झालेल्या बाळाचा लावलेला छडा, परमार आत्महत्या प्रकरणात चार नगरसेवकांना केलेली अटक, सीडीआर प्रकरणाचा छडा लावून रजनी पंडित या खासगी गुप्तहेर महिलेसह १६ जणांना अटक, सोनू जालान या बुकीला अटक, मीरारोडमधून आंतरराष्टÑीय कॉल सेंटरचा छडा लावून ७४ जणांना केलेली अटक आणि ‘चेकमेट’ या खासगी वित्तीय संस्थेतील ११ कोटींच्या दरोड्याचा यशस्वी तपास परमवीर सिंग यांच्या कार्यकाळात झाला. पत्रकारांशी वार्तालाप करतांना त्यांनी याचा आवर्जून उल्लेख केला. ‘चेकमेट’ दरोड्यात तर ९ कोटी १६ लाखांची लूट झाल्याचे कंपनीने तक्रारीत म्हटले होते. प्रत्यक्षात पोलिसांनी १५ जणांना अटक करून ११ कोटींची वसूली केल्यानंतर तक्रारदाराने यात तशी पुरवणी तक्रार दाखल केल्याचेही ते म्हणाले...................

संजीव जयस्वाल लहान भावासारखे..ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांचेही अनेक कामांमध्ये सहकार्य लाभले. टीडीआरचा उपयोग करून खासगी विकासकांच्या मदतीने कासारवडवली, कळवा, डायघर आणि चितळसर या पोलीस ठाण्यांच्या इमारतींच्या वास्तूंचे बांधकाम असो की पोलिसांना दुचाकी देण्यासाठी पालिकेने घेतलेला पुढाकार असो. या सर्वच वेळी त्यांची चांगली मदत झाली. ते आपल्याला धाकट्या भावासारखे असल्याचा उल्लेखही त्यांनी केला. ठाण्यातील नागरिक, लोकप्रतिनिधी, पत्रकार यांचेही चांगलेच सहकार्य मिळाले...................मुंबई सीपी होणार की नाही?गेल्या अनेक दिवसांपासून परमवीर सिंग यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी वर्णी लागणार अशी चर्चा होत असतांना गुरुवारी अचानक सिंग यांनीच यात नक्की काहीच नसल्याचे सांगून पोलीस महासंचालक कार्यालयात कायदा सुव्यवस्था किंवा अन्यत्रही बदली होण्याची शक्यता असल्याचे सांगितले. मुंबईच्या आयुक्तपदी बदली होईल की नाही? याबद्दल आपण काहीच सांगू शकत नसल्याचे त्यांनी ‘लोकमत’शी बोलतांना स्पष्ट केले........................

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिसcommissionerआयुक्त