शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
4
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
5
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
6
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
7
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
8
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
9
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
10
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
11
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
12
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
13
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
14
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
15
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
16
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
17
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
18
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
19
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
20
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं

भारनियमनाचा भडका ; शाळा, रूग्णालये, उद्योग, नेटवर्कला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 02:04 IST

कोळशाच्या कमतरतेमुळे राज्यात उद््भवलेल्या भीषण वीजटंचाईचा फटका ठाणे जिल्ह्याला बसला असून सर्वत्र तीन ते आठ तासांचे भारनियमन सुरू झाले आहे.

ठाणे : कोळशाच्या कमतरतेमुळे राज्यात उद््भवलेल्या भीषण वीजटंचाईचा फटका ठाणे जिल्ह्याला बसला असून सर्वत्र तीन ते आठ तासांचे भारनियमन सुरू झाले आहे. त्याची अंमलबजावणी गुरूवारी सुरू झाली. त्याचा फटका सहामाही परीक्षांना बसला असून विद्यार्थ्यांना व-हांड्यात बसवण्याची वेळ आली आहे. रूग्णालये, बँका, एटीएम यांनाही त्याचे चटके बसू लागले आहेत. वीजपुरवठा बंद असल्याने अनेक भागातील नेटवर्क डाऊन झाले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्याच आठवड्यात ‘हर घर मे बिजली’ची घोषणा केली होती. ती विरते न विरते तोच वीज उत्पादन घटल्याने नागरिकांना भारनियमनाचे चटके बसू लागले आहेत. आॅक्टोबर हिटचा तडाखा बसल्याने विजेची मागणी वाढली आहे. पण भारनियमनामुळे नागरिक त्रासून गेले आहेत. जोवर उत्पादन पूर्ववत होत नाही, तोवर भारनियमन सुरू राहील, असे महावितरणच्या अधिका-यांनी सांगितले.लघुउद्योगांना फटका : या भारनियमनाच्या झळा लघू उद्योगांना बसल्या आहेत. दिवाळीचा फराळ तयार करणारे बचत गही हवालदिल झाले आहेत. शिवाय दुकानांनाही त्याचा फटका बसला आहे. रुग्णांसह नातेवाइकांचे हालठाणे जिल्हा शासकीय (सिव्हील) रुग्णालयात विजेचा लपंडाव सुरु झाला आहे. तेथील जनरेटरचा उपयोग महत्त्वाच्या विभागासाठी होत असून इतर विभागात वीज नसल्याने रुग्णांचे आणि त्यांच्या नातेवाईकांचे हाल सुरू झाले आहेत. रुग्णालयातील विविध विभागात भरदुपारी अंधार पसरल्याचे पाहायला मिळते आहे. डोंबिवलीकरांत रोष : डोंबिवली शहरात सकाळी, दुपारी आणि सायंकाळी कमीत कमी दीड तास ते चार तास असे दोन टप्प्यातील भारनियमन सुरू झाले. त्यामुळे नागरिकांत रोष आहे. परीक्षांचा कालावधी सुरू असल्याने त्याचा त्रास विद्यार्थ्यांनाही होतो आहे. सकाळच्या वेळेतील भारनियमनाची वेळ बदलण्याची मागणी भाजपाचे नगरसेवक महेश पाटील यांनी महावितरणच्या अधिकाºयांकडे केली. शिवसेनेचे कल्याण उपजिल्हाप्रमुख सदानंद थरवळ यांनीही निवेदन देऊन भारनियमनाचा निषेध केला. डोंबिवलीत १०० टक्केवीजबिलाची वसुली होत असून, चोरीचे प्रमाणही अत्यल्प असल्याने भारनियमन रद्द करावे. ते शक्य नसेल तर सकाळची वेळ बदलावी, अशी मागणी त्यांनी केली.अंबरनाथ, बदलापूरला चटकेअंबरनाथ/बदलापूर : अंबरनाथमध्ये चार ते पाच तासांचे भारनियमन लागू झाले आहे. त्याचा फटका नागरी पट्ट्यासह उद्योगांना, शेतीला बसला आहे. बदलापूरमध्ये दोन टप्प्यांत साडेतीन ते चार तासांचे भारनियमन सुरू झाले आहे.भिवंडीत यंत्रमागाला फटकाभिवंडी : भिवंडीत आठ तासांचे भारनियमन जाहीर झाले. ते दोन टप्प्यात लागू होईल, असे ठरले होते. मात्र सलग सहा ते आठ तास वीजपुरवठा बंद राहतो आहे. त्याचा फटका यंत्रमाग उद्योगाला, रूग्णालयांना बसला आहे.भार्इंदरचा काजूपाडा घामाघूममीरा रोड : मीरा रोड-भार्इंदरला रिलायन्स, टाटाचा वीजपुरवठा होत असल्याने शहरात भारनियमन नाही. पण घोडबंदर रोडवरील काजूपाडा, चेणा गावात दोन टप्प्यात सहा तासांचे भारनियमन सुरू आहे. तेथे एरव्हीही एक ते तीन तास वीजपुरवठा बंद असतो.सहा तासउल्हासनगर : दिवाळीच्या खरेदीच्या पार्श्वभूमीवर उल्हासनगरमध्ये सहा तास भारनियमन सुरू झाल्याने व्यापाºयांसह नागरिकांनी संताप केला. बिलाची वसुली जादा-चोरी कमी तेथे साडेतीन तास, तर जेथे चोरी जास्त व वसुली कमी आहे तेथे सहा तास भारनियमन आहे.

टॅग्स :thaneठाणेSchoolशाळा