शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

भारनियमनाचा भडका ; शाळा, रूग्णालये, उद्योग, नेटवर्कला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 02:04 IST

कोळशाच्या कमतरतेमुळे राज्यात उद््भवलेल्या भीषण वीजटंचाईचा फटका ठाणे जिल्ह्याला बसला असून सर्वत्र तीन ते आठ तासांचे भारनियमन सुरू झाले आहे.

ठाणे : कोळशाच्या कमतरतेमुळे राज्यात उद््भवलेल्या भीषण वीजटंचाईचा फटका ठाणे जिल्ह्याला बसला असून सर्वत्र तीन ते आठ तासांचे भारनियमन सुरू झाले आहे. त्याची अंमलबजावणी गुरूवारी सुरू झाली. त्याचा फटका सहामाही परीक्षांना बसला असून विद्यार्थ्यांना व-हांड्यात बसवण्याची वेळ आली आहे. रूग्णालये, बँका, एटीएम यांनाही त्याचे चटके बसू लागले आहेत. वीजपुरवठा बंद असल्याने अनेक भागातील नेटवर्क डाऊन झाले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्याच आठवड्यात ‘हर घर मे बिजली’ची घोषणा केली होती. ती विरते न विरते तोच वीज उत्पादन घटल्याने नागरिकांना भारनियमनाचे चटके बसू लागले आहेत. आॅक्टोबर हिटचा तडाखा बसल्याने विजेची मागणी वाढली आहे. पण भारनियमनामुळे नागरिक त्रासून गेले आहेत. जोवर उत्पादन पूर्ववत होत नाही, तोवर भारनियमन सुरू राहील, असे महावितरणच्या अधिका-यांनी सांगितले.लघुउद्योगांना फटका : या भारनियमनाच्या झळा लघू उद्योगांना बसल्या आहेत. दिवाळीचा फराळ तयार करणारे बचत गही हवालदिल झाले आहेत. शिवाय दुकानांनाही त्याचा फटका बसला आहे. रुग्णांसह नातेवाइकांचे हालठाणे जिल्हा शासकीय (सिव्हील) रुग्णालयात विजेचा लपंडाव सुरु झाला आहे. तेथील जनरेटरचा उपयोग महत्त्वाच्या विभागासाठी होत असून इतर विभागात वीज नसल्याने रुग्णांचे आणि त्यांच्या नातेवाईकांचे हाल सुरू झाले आहेत. रुग्णालयातील विविध विभागात भरदुपारी अंधार पसरल्याचे पाहायला मिळते आहे. डोंबिवलीकरांत रोष : डोंबिवली शहरात सकाळी, दुपारी आणि सायंकाळी कमीत कमी दीड तास ते चार तास असे दोन टप्प्यातील भारनियमन सुरू झाले. त्यामुळे नागरिकांत रोष आहे. परीक्षांचा कालावधी सुरू असल्याने त्याचा त्रास विद्यार्थ्यांनाही होतो आहे. सकाळच्या वेळेतील भारनियमनाची वेळ बदलण्याची मागणी भाजपाचे नगरसेवक महेश पाटील यांनी महावितरणच्या अधिकाºयांकडे केली. शिवसेनेचे कल्याण उपजिल्हाप्रमुख सदानंद थरवळ यांनीही निवेदन देऊन भारनियमनाचा निषेध केला. डोंबिवलीत १०० टक्केवीजबिलाची वसुली होत असून, चोरीचे प्रमाणही अत्यल्प असल्याने भारनियमन रद्द करावे. ते शक्य नसेल तर सकाळची वेळ बदलावी, अशी मागणी त्यांनी केली.अंबरनाथ, बदलापूरला चटकेअंबरनाथ/बदलापूर : अंबरनाथमध्ये चार ते पाच तासांचे भारनियमन लागू झाले आहे. त्याचा फटका नागरी पट्ट्यासह उद्योगांना, शेतीला बसला आहे. बदलापूरमध्ये दोन टप्प्यांत साडेतीन ते चार तासांचे भारनियमन सुरू झाले आहे.भिवंडीत यंत्रमागाला फटकाभिवंडी : भिवंडीत आठ तासांचे भारनियमन जाहीर झाले. ते दोन टप्प्यात लागू होईल, असे ठरले होते. मात्र सलग सहा ते आठ तास वीजपुरवठा बंद राहतो आहे. त्याचा फटका यंत्रमाग उद्योगाला, रूग्णालयांना बसला आहे.भार्इंदरचा काजूपाडा घामाघूममीरा रोड : मीरा रोड-भार्इंदरला रिलायन्स, टाटाचा वीजपुरवठा होत असल्याने शहरात भारनियमन नाही. पण घोडबंदर रोडवरील काजूपाडा, चेणा गावात दोन टप्प्यात सहा तासांचे भारनियमन सुरू आहे. तेथे एरव्हीही एक ते तीन तास वीजपुरवठा बंद असतो.सहा तासउल्हासनगर : दिवाळीच्या खरेदीच्या पार्श्वभूमीवर उल्हासनगरमध्ये सहा तास भारनियमन सुरू झाल्याने व्यापाºयांसह नागरिकांनी संताप केला. बिलाची वसुली जादा-चोरी कमी तेथे साडेतीन तास, तर जेथे चोरी जास्त व वसुली कमी आहे तेथे सहा तास भारनियमन आहे.

टॅग्स :thaneठाणेSchoolशाळा