शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूवर सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
2
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
3
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
4
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
5
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
6
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
7
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
8
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
9
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
10
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
11
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
12
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
13
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
14
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
15
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
16
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
17
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
18
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
19
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
20
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?

भारनियमनाचा भडका ; शाळा, रूग्णालये, उद्योग, नेटवर्कला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 02:04 IST

कोळशाच्या कमतरतेमुळे राज्यात उद््भवलेल्या भीषण वीजटंचाईचा फटका ठाणे जिल्ह्याला बसला असून सर्वत्र तीन ते आठ तासांचे भारनियमन सुरू झाले आहे.

ठाणे : कोळशाच्या कमतरतेमुळे राज्यात उद््भवलेल्या भीषण वीजटंचाईचा फटका ठाणे जिल्ह्याला बसला असून सर्वत्र तीन ते आठ तासांचे भारनियमन सुरू झाले आहे. त्याची अंमलबजावणी गुरूवारी सुरू झाली. त्याचा फटका सहामाही परीक्षांना बसला असून विद्यार्थ्यांना व-हांड्यात बसवण्याची वेळ आली आहे. रूग्णालये, बँका, एटीएम यांनाही त्याचे चटके बसू लागले आहेत. वीजपुरवठा बंद असल्याने अनेक भागातील नेटवर्क डाऊन झाले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्याच आठवड्यात ‘हर घर मे बिजली’ची घोषणा केली होती. ती विरते न विरते तोच वीज उत्पादन घटल्याने नागरिकांना भारनियमनाचे चटके बसू लागले आहेत. आॅक्टोबर हिटचा तडाखा बसल्याने विजेची मागणी वाढली आहे. पण भारनियमनामुळे नागरिक त्रासून गेले आहेत. जोवर उत्पादन पूर्ववत होत नाही, तोवर भारनियमन सुरू राहील, असे महावितरणच्या अधिका-यांनी सांगितले.लघुउद्योगांना फटका : या भारनियमनाच्या झळा लघू उद्योगांना बसल्या आहेत. दिवाळीचा फराळ तयार करणारे बचत गही हवालदिल झाले आहेत. शिवाय दुकानांनाही त्याचा फटका बसला आहे. रुग्णांसह नातेवाइकांचे हालठाणे जिल्हा शासकीय (सिव्हील) रुग्णालयात विजेचा लपंडाव सुरु झाला आहे. तेथील जनरेटरचा उपयोग महत्त्वाच्या विभागासाठी होत असून इतर विभागात वीज नसल्याने रुग्णांचे आणि त्यांच्या नातेवाईकांचे हाल सुरू झाले आहेत. रुग्णालयातील विविध विभागात भरदुपारी अंधार पसरल्याचे पाहायला मिळते आहे. डोंबिवलीकरांत रोष : डोंबिवली शहरात सकाळी, दुपारी आणि सायंकाळी कमीत कमी दीड तास ते चार तास असे दोन टप्प्यातील भारनियमन सुरू झाले. त्यामुळे नागरिकांत रोष आहे. परीक्षांचा कालावधी सुरू असल्याने त्याचा त्रास विद्यार्थ्यांनाही होतो आहे. सकाळच्या वेळेतील भारनियमनाची वेळ बदलण्याची मागणी भाजपाचे नगरसेवक महेश पाटील यांनी महावितरणच्या अधिकाºयांकडे केली. शिवसेनेचे कल्याण उपजिल्हाप्रमुख सदानंद थरवळ यांनीही निवेदन देऊन भारनियमनाचा निषेध केला. डोंबिवलीत १०० टक्केवीजबिलाची वसुली होत असून, चोरीचे प्रमाणही अत्यल्प असल्याने भारनियमन रद्द करावे. ते शक्य नसेल तर सकाळची वेळ बदलावी, अशी मागणी त्यांनी केली.अंबरनाथ, बदलापूरला चटकेअंबरनाथ/बदलापूर : अंबरनाथमध्ये चार ते पाच तासांचे भारनियमन लागू झाले आहे. त्याचा फटका नागरी पट्ट्यासह उद्योगांना, शेतीला बसला आहे. बदलापूरमध्ये दोन टप्प्यांत साडेतीन ते चार तासांचे भारनियमन सुरू झाले आहे.भिवंडीत यंत्रमागाला फटकाभिवंडी : भिवंडीत आठ तासांचे भारनियमन जाहीर झाले. ते दोन टप्प्यात लागू होईल, असे ठरले होते. मात्र सलग सहा ते आठ तास वीजपुरवठा बंद राहतो आहे. त्याचा फटका यंत्रमाग उद्योगाला, रूग्णालयांना बसला आहे.भार्इंदरचा काजूपाडा घामाघूममीरा रोड : मीरा रोड-भार्इंदरला रिलायन्स, टाटाचा वीजपुरवठा होत असल्याने शहरात भारनियमन नाही. पण घोडबंदर रोडवरील काजूपाडा, चेणा गावात दोन टप्प्यात सहा तासांचे भारनियमन सुरू आहे. तेथे एरव्हीही एक ते तीन तास वीजपुरवठा बंद असतो.सहा तासउल्हासनगर : दिवाळीच्या खरेदीच्या पार्श्वभूमीवर उल्हासनगरमध्ये सहा तास भारनियमन सुरू झाल्याने व्यापाºयांसह नागरिकांनी संताप केला. बिलाची वसुली जादा-चोरी कमी तेथे साडेतीन तास, तर जेथे चोरी जास्त व वसुली कमी आहे तेथे सहा तास भारनियमन आहे.

टॅग्स :thaneठाणेSchoolशाळा