शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
5
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
6
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
7
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
8
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
9
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
10
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
11
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
12
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
13
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
14
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
15
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
16
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
17
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
18
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
19
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
20
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
Daily Top 2Weekly Top 5

'पारदर्शक कारभार देणारे अन् जनतेसोबत संवाद साधणारे पंतप्रधान मिळाले'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2022 00:25 IST

मोदींचे कार्य रुचल्यानेच भाजपला यश

ठाणे : पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी यांच्या २०१४ मधील विजयानंतर देशभरातील वातावरण बदलले. देशाला वेगळा विचार आणि पारदर्शक कारभार देण्याबरोबरच जनतेला संवाद साधणारा पंतप्रधान मिळाला. त्यांचे कार्य जनतेमध्ये रुचल्यामुळेच भाजपाला यश मिळत असल्याचे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री व राज्यसभा सदस्य प्रकाश जावडेकर यांनी रविवारी येथे केले.

पंतप्रधान मोदी यांच्या बारा वर्ष गुजरातचे मुख्यमंत्री व आठ वर्ष पंतप्रधान या २० वर्षांच्या कारकिदीर्तील प्रमुख वैशिष्ट्ये, सामान्य जनतेविषयी घेतलेले विविध कल्याणकारी निर्णय आदींचा लेखाजोखा खासदार जावडेकर यांनी ठाण्यात घेतला. सहयोग मंदिरात झालेल्या कार्यक्रमाला आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर, माधवी नाईक, संदिप लेले, बुद्धिजिवी प्रकोष्ठच्या प्रदेशाध्यक्षा जयश्री चित्रे आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.

गेल्या २० वर्षात मोदी एकदाही आजारी न पडता, ते सातत्याने कार्य करीत आहेत. मोदींकडून वेगवेगळे कार्यक्रम, उपक्रम आणि योजना हाती घेतल्या जात आहेत. हर घर तिरंगाच्या माध्यमातून देशभरात देशभक्तीमय वातावरण निर्माण झाले. व्हीआयपी कल्चर, कागदपत्रे अ‍ॅटेस्टेड आदी ब्रिटीश काळापासून सुरू असलेली संस्कृती एका दिवसात रद्द केली. गेल्या आठ वर्षात रेल्वे गेटवर अपघात झाला नाही. निवृत्तांना जीवन प्रमाण देण्याची पद्धत डीजीटल झाल्यामुळे, लाखो निवृत्तांना दिलासा मिळाला, असे प्रतिपादन जावडेकर यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे भाजपाचे ११ कोटी सदस्य झाले असून, तो जगातील सर्वात मोठा पक्ष झाला. कल्याणकारी निर्णयांमुळे गरजू कुटुंबांना घर, पाणी, अन्न-धान्य, गॅस, घरात स्वच्छतागृहे आणि मोफत उपचार केले गेले. त्यामुळे अनेक गृहिणी भाजपाच्या कार्यकर्त्या झाल्याचेही ते म्हणाले. विरोधकांनी २०२४ च्या निवडणुकीची चिंता न करता २०२९ च्या निवडणुकीची चर्चा करावी, असा टोला प्रकाश जावडेकर यांनी मारला. मोदी यांच्या कारकिर्दीवरील मोदी २० पुस्तक हे अभ्यासपूर्ण आहे. देशातील प्रत्येक व्यक्तीने ते वाचावे, असे आवाहनही त्यांनी केले.

पाकिस्तानातून प्रथमच वैमानिक जिवंत परतलायापूर्वी भारतातून पाकिस्तानच्या सीमेत गेलेला सैनिक पुन्हा जिवंत परत येत नसे. मात्र, वैमानिक अभिनंदन वर्धमान यांना अवघ्या २४ तासांत पुन्हा भारतीय भूमीत आणण्यात भारताला यश आले. पुलवामाच्या हल्ल्यानंतर ैसर्जिकल स्ट्राईक' करून धडा शिकविला गेला. त्यामुळे दहशतवाद्यांनाही आळा बसला. गेल्या आठ वर्षांत भारतात कोठेही बॉम्बस्फोट झाले नाहीत, याकडे जावडेकर यांनी लक्ष वेधले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीPrakash Javadekarप्रकाश जावडेकरBJPभाजपा