शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाला एवढ्या जागा, केंद्रात सत्ताबदल होण्याची दाट शक्यता; पृथ्वीराज चव्हाणांचा महाराष्ट्रावर काय अंदाज...
2
लोकसभेनंतर कर्नाटकात ऑपरेशन नाथ, काँग्रेस सरकार कोसळणार? एकनाथ शिंदेंचा दावा, सिद्धरामय्यांची प्रतिक्रिया
3
'घोटाळ्याच्या चौकशीसाठी भुजबळांनी...';राऊतांचे मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप, थेट मोदींना लिहीलं पत्र
4
पेट्रोल भरायला आला अन् काळाने घात केला; घाटकोपर दुर्घटनेत युवकाचा दुर्दैवी अंत
5
EPFO ची कोट्यवधी लोकांसाठी गूड न्यूज! घर, लग्न, आजार, शिक्षणासाठी ऑटो क्लेम सोल्युशन लाँच; पाहा
6
पीओकेमधील गोंधळामुळे पाकिस्तान सरकारने गुडघे टेकले! २३ अब्ज रुपयांचा निधी जाहीर
7
LICची लखपती स्कीम! केवळ रोज ₹४५ रुपये जमा करून मिळवू शकता ₹२५ लाख; पाहा संपूर्ण डिटेल
8
काशी-वाराणसीतील मराठी समाज मोदींच्या पाठिशी; रोड शोमध्ये पंतप्रधानांचं मराठमोळं स्वागत
9
कोणताही मूर्ख माणूस असा उघडपणे बॅगा घेऊन पैसे वाटप करू शकतो का? राऊतांच्या दाव्यांवर शिंदे गटाचे प्रत्युत्तर
10
ईशा गुप्ताने केले आहेत Eggs Freeze, म्हणाली- "मी आज ३ मुलांची आई असते, पण..."
11
'कदम, दरेकर भाजपामध्ये गेल्यावर तोंडात दात नव्हते का?, सुषमा अंधारेंचा राज ठाकरेंवर पलटवार
12
बेपर्वाईचे १४ बळी,७८ जखमी; घाटकोपरला पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळले, अवकाळी पावसाचा तडाखा
13
आजचे राशीभविष्य १४ मे २०२४; सूर्य वृषभेत, दलाली, व्याज, कमिशनमधून मोठ्या धनलाभाची शक्यता
14
महामुंबईला अवकाळीचा तडाखा; मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, रायगड, पालघरला पावसाने झोडपले
15
राज्यभरातील होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा: CM एकनाथ शिंदे, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
16
“मुझे बचाव, मैं शेड के नीचे फस गया हूँ”; होर्डिंगखाली दबलेल्या जखमीची सुटका
17
...तर पाकला हातात बांगड्या घालायला लावू! अणुशक्तीवरुन इंडिया आघाडीवर PM मोदींचा घणाघात
18
महाराष्ट्रात टक्का वाढेना; देशातील ९६ मतदारसंघात सरासरी ६६ टक्के मतदान
19
खिचडी सरकारकडून १२ लाख कोटींचा घोटाळा; अमित शाह यांचा महाआघाडीवर आरोप
20
प्रश्न: विवाह कधी करणार? राहुल गांधी म्हणाले, आता लवकरच करावा लागेल...

जलपर्णी अडकली गाळात

By admin | Published: June 26, 2017 1:28 AM

कामवारी नदीतील जलपर्णी गाळात रूतली आहे. या वनस्पतींना पुढे मार्ग न मिळाल्यास परिसरात पाणी साचण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कभिवंडी : कामवारी नदीतील जलपर्णी गाळात रूतली आहे. या वनस्पतींना पुढे मार्ग न मिळाल्यास परिसरात पाणी साचण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत.कामवारी नदीतील गाळ काढण्याकडे महसूल विभाग, लोकप्रतिनिधी,जिल्हा परिषदेचा पाटबंधारे विभाग व पालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले. तीन महिन्यांपासून ही नदी कोरडी होती.यामुळे विसर्जन केलेल्या गणपतीच्या मूर्तींचे अवशेषही बाहेर आले होते. तर काही ठिकाणी नदीतील साचलेल्या पाण्यात जलपर्णी पसरल्या होत्या. नदीवर बांधलेल्या धरणाच्या पलिकडेही साचलेल्या पाण्यात जलपर्णी होत्या. रात्रभर झालेल्या मुसळधार पावसाने नदीतील प्रवाह वाढून या सर्व जलपर्णी भिवंडी-वाडा मार्गावरील पुलाखाली अडकल्या. पुलाच्या पलिकडे म्हाडा कॉलनीच्या रहिवाशांनी मोठ्या प्रमाणात सुकलेल्या नदीपात्रात कचरा टाकल्याने या जलपर्णीस पुढे जाण्यास मार्ग न मिळाल्याने ते एकाच जागी साचलेल्या आहेत. तालुक्यातील दहापेक्षा जास्त गावांमधील पाणी नदीतून वाहते. कामवारी नदीच्या एका बाजूला शेलार गाव असून दुसऱ्या बाजूला रहिवाशांनी बांधकाम करून नदीच्या प्रवाहास अडथळा निर्माण केला आहे.त् यामुळे नदीचा प्रवाह वेगवान होऊन जलपर्णीव्दारे ते पाणी अडले तर ते पाणी शेलार भागात शिरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पश्चिमेकडून वाहत येणाऱ्या खाडीला रविवारी पहाटेच्यावेळेस भरती आल्याने मुसळधार पडणाऱ्या पावसाच्या काही भागातील पाण्याचा निचरा झाला नाही. परंतु पुन्हा भरती आणि मुसळधार पाऊस झाला तर पूरपरिस्थिती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.