शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाची ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
2
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
3
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
4
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
5
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
6
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
7
बापरे बाप! बंजी जंपिंग करताना आला हार्ट अटॅक, हवेतच मुलीचा मृत्यू? Video पाहून भरेल धडकी
8
WTC Final Scenario : टीम इंडियाचं गणित पुन्हा बिघडणार? फायनल खेळण्यासाठी जिंकावे लागतील एवढे सामने
9
नवऱ्यासोबत घटस्फोटाच्या चर्चा, सततच्या ट्रोलिंगवर भडकली ऐश्वर्या; म्हणाली, "साखरपुड्यापासूनच..."
10
Hyundai Creta चं टेन्शन वाढणार, येतायेत दोन 'धाकड' SUV; जाणून घ्या फीचर्स, काय असेल खास?
11
शेख हसीना यांना शिक्षा सुनावल्यानंतर ढाक्यामध्ये हिंसाचार उसळला, युनूस सरकार 'अ‍ॅक्शन'मोडवर; परिस्थिती बिघडली
12
आता तरी घ्या रे! ऋतुराज गायकवाडचा मोठा पराक्रम; पुजाराला मागे टाकत ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा
13
गौतम गंभीरने पिचशी छेडछाड थांबवावी अन् मी सांगतोय ते ऐकावं...; सौरव गांगुलीचा थेट सल्ला
14
त्याने आरडाओरड केली, पण तिला जराही दया आली नाही! नवऱ्याला घरात कोंडून बायकोने लावली आग
15
धनंजय मुंडेंच्या पापांमध्ये फडणवीस का सहभागी होताहेत? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
16
आबा-काका गटामधील उमेदवारीचा सस्पेन्स आज अखेरच्या दिवशी संपणार;'बी' फॉर्म ठरवणार नगराध्यक्ष पदाचा उमेदवार, काका गट रिंगणात
17
अपघात, रोग आणि चिंता होईल दूर! फक्त करा प्रेमानंद महाराजांनी सांगितलेले ५ 'रामबाण' उपाय
18
ओला ईलेक्ट्रीक गटांगळ्या खाऊ लागली? पुण्यातील सर्व्हिस सेंटर तोडले, अख्ख्या मुंबईत तेही ठाण्यात एकच सर्व्हिस सेंटर...
19
Sheikh Hasina Net Worth: शेख हसीना यांच्या नोकराकडेच होते २८४ कोटी; 'मॅडम'कडील प्रॉपर्टीचा आकडा वाचून तर बघा...
20
'या' एका चुकीमुळे लीक होऊ शकते तुमचे व्हॉट्सअ‍ॅपचे प्रायव्हेट चॅट; तुम्हाला माहीत आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

बदलापुरात उल्हास नदीतून पाणीचोरी सुरुच, चिखलोली धरणातूनही पाणी चोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2019 00:34 IST

अंबरनाथ आणि बदलापूर शहरात पाणीटंचाई असताना ज्या नदी तसेच धरणातून शहराला पाणीपुरवठा केला जातो, त्याच धरणातून आणि नदीतून पाणी चोरीचे प्रकार घडत आहेत.

- पंकज पाटीलअंबरनाथ/बदलापूर - अंबरनाथ आणि बदलापूर शहरात पाणीटंचाई असताना ज्या नदी तसेच धरणातून शहराला पाणीपुरवठा केला जातो, त्याच धरणातून आणि नदीतून पाणी चोरीचे प्रकार घडत आहेत. उल्हास नदीतून पाणी चोरी करणाऱ्या टँकरची संख्या दिवसागणिक वाढते आहे. तर चिखलोली धरणाच्या पात्रात जाऊन काही टँकर चालक पाणीचोरी करत आहेत. या दोन्ही पाणी चोरीकडे लघुपाटबंधारे विभाग दुर्लक्ष करीत आहे.अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही शहरांना उल्हास नदी आणि चिखलोली धरणातून पाणी पुरवठा होतो. चिखलोली धरणाने तळ गाठल्याने ते पाणी न वापरता त्याच्या मोबदल्यात एमआयडीसीकडून पाणी घेतले जात आहे. तरीही या चिखलोली धरणातील पाण्यावर डल्ला मारण्याचे काम काही टँकर मालक करताना दिसत आहेत. चिखलोली धरणाच्या पायथ्याशी वाहून येणारे पाणी एका डबक्यात साठवून ते पाणी काही टँकर चालक उचलत आहेत.तर काही टँकर चालकांनी थेट चिखलोली धरणाच्या पात्रातच टँकर उभे करून दिवसाढवळ्या पाणी चोरी सुरू केली आहे. धरणाच्या पात्रात जाण्यास बंदी असतानाही थेट टँकरच या पात्रात जात आहेत. टँकर मालकांची ही दादागिरी असल्याने त्यांना या ठिकाणी कोणीच रोखत नाहीत. एमआयडीसीमार्गे हे टँकर चालक थेट धरण पात्रात उतरतात. तेथे पंप लावून पाणी उचलण्याचे काम करत आहेत. दिवसाला ६० ते ७० टँकर भरुन शहरात नेले जात आहे. त्या पाण्याची विक्री १००० ते २००० रुपयांपर्यंत केले जात आहे. दररोज टँकर चालक पाण्याची चोरी करत असतानाही त्यांना रोखण्यासाठी कोणीच पुढे येत नाहीत.दुसरीकडे उल्हास नदीतही हीच परिस्थिती निर्माण झाली आहे. उल्हास नदीच्या पात्रात बदलापूर गावाजवळील पुलाखाली अनेक टँकर दररोज १०० हुन अधिक टँकर भरुन नेत आहेत. काही भागात पाणी टंचाई असल्याने हे टँकर त्या ठिकाणी पुरविण्यात येत आहेत. एकावेळी १० ते १२ टँकर उल्हास नदीत पाणी भरत असतात. दिवसा हा प्रकार घडत असतांनाही त्यांना रोखण्याचे काम केले जात नाही. गेल्या आठवड्याभरात नदीतुन पाणी भरणाºया टँकरची संख्या वाढल्याने टँकर लॉबी ही मोठ्या प्रमाणात सक्रिय झाल्याचे चित्र दिसत आहे.लघुपाटबंधारे विभागाकडे मनुष्यबळ कमी असल्याने सुरक्षेची पूर्ण जबाबदारी घेणे शक्य होत नाही. या संदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार केल्याचे लघुबाटबंधारे विभागाकडुन स्पष्ट करण्यात आले आहे.

टॅग्स :Waterपाणीbadlapurबदलापूर