शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
3
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
4
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
5
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
6
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
7
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
8
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
9
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
10
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
11
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
12
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
13
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
14
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
15
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
16
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
17
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप
18
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!
19
दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा, बंदुकीच्या धाकावर हिसकावू लागला पैसे, पण कर्मचाऱ्यांनी हिंमत दाखवली आणि...  
20
राहुल गांधींविरोधात वक्तव्य भोवले; काँग्रेसच्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, नेमकं काय म्हणाले?

बदलापुरात उल्हास नदीतून पाणीचोरी सुरुच, चिखलोली धरणातूनही पाणी चोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2019 00:34 IST

अंबरनाथ आणि बदलापूर शहरात पाणीटंचाई असताना ज्या नदी तसेच धरणातून शहराला पाणीपुरवठा केला जातो, त्याच धरणातून आणि नदीतून पाणी चोरीचे प्रकार घडत आहेत.

- पंकज पाटीलअंबरनाथ/बदलापूर - अंबरनाथ आणि बदलापूर शहरात पाणीटंचाई असताना ज्या नदी तसेच धरणातून शहराला पाणीपुरवठा केला जातो, त्याच धरणातून आणि नदीतून पाणी चोरीचे प्रकार घडत आहेत. उल्हास नदीतून पाणी चोरी करणाऱ्या टँकरची संख्या दिवसागणिक वाढते आहे. तर चिखलोली धरणाच्या पात्रात जाऊन काही टँकर चालक पाणीचोरी करत आहेत. या दोन्ही पाणी चोरीकडे लघुपाटबंधारे विभाग दुर्लक्ष करीत आहे.अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही शहरांना उल्हास नदी आणि चिखलोली धरणातून पाणी पुरवठा होतो. चिखलोली धरणाने तळ गाठल्याने ते पाणी न वापरता त्याच्या मोबदल्यात एमआयडीसीकडून पाणी घेतले जात आहे. तरीही या चिखलोली धरणातील पाण्यावर डल्ला मारण्याचे काम काही टँकर मालक करताना दिसत आहेत. चिखलोली धरणाच्या पायथ्याशी वाहून येणारे पाणी एका डबक्यात साठवून ते पाणी काही टँकर चालक उचलत आहेत.तर काही टँकर चालकांनी थेट चिखलोली धरणाच्या पात्रातच टँकर उभे करून दिवसाढवळ्या पाणी चोरी सुरू केली आहे. धरणाच्या पात्रात जाण्यास बंदी असतानाही थेट टँकरच या पात्रात जात आहेत. टँकर मालकांची ही दादागिरी असल्याने त्यांना या ठिकाणी कोणीच रोखत नाहीत. एमआयडीसीमार्गे हे टँकर चालक थेट धरण पात्रात उतरतात. तेथे पंप लावून पाणी उचलण्याचे काम करत आहेत. दिवसाला ६० ते ७० टँकर भरुन शहरात नेले जात आहे. त्या पाण्याची विक्री १००० ते २००० रुपयांपर्यंत केले जात आहे. दररोज टँकर चालक पाण्याची चोरी करत असतानाही त्यांना रोखण्यासाठी कोणीच पुढे येत नाहीत.दुसरीकडे उल्हास नदीतही हीच परिस्थिती निर्माण झाली आहे. उल्हास नदीच्या पात्रात बदलापूर गावाजवळील पुलाखाली अनेक टँकर दररोज १०० हुन अधिक टँकर भरुन नेत आहेत. काही भागात पाणी टंचाई असल्याने हे टँकर त्या ठिकाणी पुरविण्यात येत आहेत. एकावेळी १० ते १२ टँकर उल्हास नदीत पाणी भरत असतात. दिवसा हा प्रकार घडत असतांनाही त्यांना रोखण्याचे काम केले जात नाही. गेल्या आठवड्याभरात नदीतुन पाणी भरणाºया टँकरची संख्या वाढल्याने टँकर लॉबी ही मोठ्या प्रमाणात सक्रिय झाल्याचे चित्र दिसत आहे.लघुपाटबंधारे विभागाकडे मनुष्यबळ कमी असल्याने सुरक्षेची पूर्ण जबाबदारी घेणे शक्य होत नाही. या संदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार केल्याचे लघुबाटबंधारे विभागाकडुन स्पष्ट करण्यात आले आहे.

टॅग्स :Waterपाणीbadlapurबदलापूर