शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
4
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
5
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
6
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
7
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
8
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
9
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
10
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
11
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
12
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
13
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
14
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
15
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
16
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
17
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
18
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
19
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

बदलापुरात उल्हास नदीतून पाणीचोरी सुरुच, चिखलोली धरणातूनही पाणी चोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2019 00:34 IST

अंबरनाथ आणि बदलापूर शहरात पाणीटंचाई असताना ज्या नदी तसेच धरणातून शहराला पाणीपुरवठा केला जातो, त्याच धरणातून आणि नदीतून पाणी चोरीचे प्रकार घडत आहेत.

- पंकज पाटीलअंबरनाथ/बदलापूर - अंबरनाथ आणि बदलापूर शहरात पाणीटंचाई असताना ज्या नदी तसेच धरणातून शहराला पाणीपुरवठा केला जातो, त्याच धरणातून आणि नदीतून पाणी चोरीचे प्रकार घडत आहेत. उल्हास नदीतून पाणी चोरी करणाऱ्या टँकरची संख्या दिवसागणिक वाढते आहे. तर चिखलोली धरणाच्या पात्रात जाऊन काही टँकर चालक पाणीचोरी करत आहेत. या दोन्ही पाणी चोरीकडे लघुपाटबंधारे विभाग दुर्लक्ष करीत आहे.अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही शहरांना उल्हास नदी आणि चिखलोली धरणातून पाणी पुरवठा होतो. चिखलोली धरणाने तळ गाठल्याने ते पाणी न वापरता त्याच्या मोबदल्यात एमआयडीसीकडून पाणी घेतले जात आहे. तरीही या चिखलोली धरणातील पाण्यावर डल्ला मारण्याचे काम काही टँकर मालक करताना दिसत आहेत. चिखलोली धरणाच्या पायथ्याशी वाहून येणारे पाणी एका डबक्यात साठवून ते पाणी काही टँकर चालक उचलत आहेत.तर काही टँकर चालकांनी थेट चिखलोली धरणाच्या पात्रातच टँकर उभे करून दिवसाढवळ्या पाणी चोरी सुरू केली आहे. धरणाच्या पात्रात जाण्यास बंदी असतानाही थेट टँकरच या पात्रात जात आहेत. टँकर मालकांची ही दादागिरी असल्याने त्यांना या ठिकाणी कोणीच रोखत नाहीत. एमआयडीसीमार्गे हे टँकर चालक थेट धरण पात्रात उतरतात. तेथे पंप लावून पाणी उचलण्याचे काम करत आहेत. दिवसाला ६० ते ७० टँकर भरुन शहरात नेले जात आहे. त्या पाण्याची विक्री १००० ते २००० रुपयांपर्यंत केले जात आहे. दररोज टँकर चालक पाण्याची चोरी करत असतानाही त्यांना रोखण्यासाठी कोणीच पुढे येत नाहीत.दुसरीकडे उल्हास नदीतही हीच परिस्थिती निर्माण झाली आहे. उल्हास नदीच्या पात्रात बदलापूर गावाजवळील पुलाखाली अनेक टँकर दररोज १०० हुन अधिक टँकर भरुन नेत आहेत. काही भागात पाणी टंचाई असल्याने हे टँकर त्या ठिकाणी पुरविण्यात येत आहेत. एकावेळी १० ते १२ टँकर उल्हास नदीत पाणी भरत असतात. दिवसा हा प्रकार घडत असतांनाही त्यांना रोखण्याचे काम केले जात नाही. गेल्या आठवड्याभरात नदीतुन पाणी भरणाºया टँकरची संख्या वाढल्याने टँकर लॉबी ही मोठ्या प्रमाणात सक्रिय झाल्याचे चित्र दिसत आहे.लघुपाटबंधारे विभागाकडे मनुष्यबळ कमी असल्याने सुरक्षेची पूर्ण जबाबदारी घेणे शक्य होत नाही. या संदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार केल्याचे लघुबाटबंधारे विभागाकडुन स्पष्ट करण्यात आले आहे.

टॅग्स :Waterपाणीbadlapurबदलापूर