शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
3
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
4
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
5
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
6
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
7
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
8
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन
9
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
10
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
11
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
12
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
13
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
14
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
15
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
16
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
17
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
18
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
19
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
20
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!

२७ गावांचा पाणीपुरवठा अधांतरीच

By admin | Updated: December 9, 2015 00:41 IST

मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाल्यानंतर निवडणुकीच्या तोंडावर कल्याण-डोंबिवली महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या २७ गावांच्या पाणी पुरवठ्याचे

मुरलीधर भवार, कल्याण मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाल्यानंतर निवडणुकीच्या तोंडावर कल्याण-डोंबिवली महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या २७ गावांच्या पाणी पुरवठ्याचे व्यवस्थापन नक्की कोणाकडे असावे, याबाबत औद्योगिक विकास महामंडळ आणि महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात टोलवाटोलवी सुरू असल्याने गावांचा पाणीप्रश्न सुटलेला नाही. पाणीबिलाची थकबाकी, त्यासाठी आकारलेल्या दराचा वाद आणि अनिर्बंध बांधकामांमुळे पाणी पुरवठ्याच्या प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत असून त्यातून कोणते प्रश्न निर्माण होऊ शकतात, ते भोपरच्या दुर्घटनेन दाखवूनही यंत्रणा सुस्त असल्याचे दिसून येते. ही २७ गावे पालिकेत समाविष्ट नव्हती, तेव्हा औद्योगिक विकास महामंडळाकडून तेथे दररोज ३० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जात होता. त्यांना ५२ पाण्याच्या जोडण्या विभागून देण्यात आल्या होत्या. त्यावरून ग्रामपंचायतींनी नव्या जोडण्या दिल्या. गावातील एका नळ जोडणीमागे ग्रामपंचायत तीन हजार रुपये आकारत होती, तर इमारतीसाठी १५ लाख रुपये घेतले जात होते. पण त्याचा लेखाजोखा ग्रामपंचायतींकडे नव्हता. ही गावे १ जूनपासून पालिकेत आल्यावर ग्रामपंचायतीचे दप्तर पालिकेत जमा झाले. औद्योगिक विकास महामंडळ पाणीपुरवठा करत असले तरी त्याचे व्यवस्थापन पालिकेने ताब्यात घ्यावे. या गावांकडे ९१ कोटींची थकबाकी होती. ती भरूनच पालिकेने यंत्रणा ताब्यात घ्यावी, असे महामंडळाचे म्हणणे होती. ही थकबाकी सरकारने माफ करावी, अशी भूमिका पालिकेने घेतली होती.आम्ही पाणीपुरवठ्याची यंत्रणा पालिकेकडे हस्तांतरीत केली आहे. त्यामुळे गावांतील पाणी पुरवठ्याचे नियोजन पालिकेनेच केले पाहिजे. पालिकेने चालू महिन्याचे तीन कोटींचे पाणी बिल आणि थकबाकी अद्याप महामंडळाकडे भरलेली नाही. या गावांतील वस्ती वाढते आहेत. नव्या चाळी, इमारती उभारल्या जात आहेत. या वाढत्या वस्तीला पाणी कोण पुरविणार? त्याचे नियोजन पालिकेकडे नाही. आता नवे जलकुंभ उभारायला हवेत, असे महामंडळाच्या डोंबिवली कार्यालयातील कार्यकारी अभियंता सुरेश जगताप यांंनी सांगितले. महामंडळानेच यंत्रणा सांभाळावीमहामंडळाकडून रिजन्सी, लोढासारख्या मोठ्या गृहसंकुलाना पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे पाणी पुरवठयाची यंत्रणा महामंडळानेच संभाळावी, असे पत्र पालिकेचे आयुक्त-अतिरिक्त आयुक्तांनी महामंडळाच्या अभियंत्यांना पाठविले आहे, असे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता तरुण जुनेजा यांनी सांगितले. वाढीव दराचा वादमहामंडळ २७ गावांना आधी दर हजार लिटरला साडेचार रुपये दर आकारत होते. ही गावे पालिकेत आल्यावर तो महामंडळाने त्याा पाण्याचा हिशेब आठ रुपये दराने केला. सरकारी नियमाप्रमाणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या नवीन ग्रामीण भागाला लगेचच वाढीव दर लागू करता येत नाही. त्यामुले तीन कोटी रूपयांची थकबाकी पालिकेने भरलेली नाही.