शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

२७ गावांचा पाणीपुरवठा अधांतरीच

By admin | Updated: December 9, 2015 00:41 IST

मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाल्यानंतर निवडणुकीच्या तोंडावर कल्याण-डोंबिवली महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या २७ गावांच्या पाणी पुरवठ्याचे

मुरलीधर भवार, कल्याण मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाल्यानंतर निवडणुकीच्या तोंडावर कल्याण-डोंबिवली महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या २७ गावांच्या पाणी पुरवठ्याचे व्यवस्थापन नक्की कोणाकडे असावे, याबाबत औद्योगिक विकास महामंडळ आणि महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात टोलवाटोलवी सुरू असल्याने गावांचा पाणीप्रश्न सुटलेला नाही. पाणीबिलाची थकबाकी, त्यासाठी आकारलेल्या दराचा वाद आणि अनिर्बंध बांधकामांमुळे पाणी पुरवठ्याच्या प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत असून त्यातून कोणते प्रश्न निर्माण होऊ शकतात, ते भोपरच्या दुर्घटनेन दाखवूनही यंत्रणा सुस्त असल्याचे दिसून येते. ही २७ गावे पालिकेत समाविष्ट नव्हती, तेव्हा औद्योगिक विकास महामंडळाकडून तेथे दररोज ३० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जात होता. त्यांना ५२ पाण्याच्या जोडण्या विभागून देण्यात आल्या होत्या. त्यावरून ग्रामपंचायतींनी नव्या जोडण्या दिल्या. गावातील एका नळ जोडणीमागे ग्रामपंचायत तीन हजार रुपये आकारत होती, तर इमारतीसाठी १५ लाख रुपये घेतले जात होते. पण त्याचा लेखाजोखा ग्रामपंचायतींकडे नव्हता. ही गावे १ जूनपासून पालिकेत आल्यावर ग्रामपंचायतीचे दप्तर पालिकेत जमा झाले. औद्योगिक विकास महामंडळ पाणीपुरवठा करत असले तरी त्याचे व्यवस्थापन पालिकेने ताब्यात घ्यावे. या गावांकडे ९१ कोटींची थकबाकी होती. ती भरूनच पालिकेने यंत्रणा ताब्यात घ्यावी, असे महामंडळाचे म्हणणे होती. ही थकबाकी सरकारने माफ करावी, अशी भूमिका पालिकेने घेतली होती.आम्ही पाणीपुरवठ्याची यंत्रणा पालिकेकडे हस्तांतरीत केली आहे. त्यामुळे गावांतील पाणी पुरवठ्याचे नियोजन पालिकेनेच केले पाहिजे. पालिकेने चालू महिन्याचे तीन कोटींचे पाणी बिल आणि थकबाकी अद्याप महामंडळाकडे भरलेली नाही. या गावांतील वस्ती वाढते आहेत. नव्या चाळी, इमारती उभारल्या जात आहेत. या वाढत्या वस्तीला पाणी कोण पुरविणार? त्याचे नियोजन पालिकेकडे नाही. आता नवे जलकुंभ उभारायला हवेत, असे महामंडळाच्या डोंबिवली कार्यालयातील कार्यकारी अभियंता सुरेश जगताप यांंनी सांगितले. महामंडळानेच यंत्रणा सांभाळावीमहामंडळाकडून रिजन्सी, लोढासारख्या मोठ्या गृहसंकुलाना पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे पाणी पुरवठयाची यंत्रणा महामंडळानेच संभाळावी, असे पत्र पालिकेचे आयुक्त-अतिरिक्त आयुक्तांनी महामंडळाच्या अभियंत्यांना पाठविले आहे, असे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता तरुण जुनेजा यांनी सांगितले. वाढीव दराचा वादमहामंडळ २७ गावांना आधी दर हजार लिटरला साडेचार रुपये दर आकारत होते. ही गावे पालिकेत आल्यावर तो महामंडळाने त्याा पाण्याचा हिशेब आठ रुपये दराने केला. सरकारी नियमाप्रमाणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या नवीन ग्रामीण भागाला लगेचच वाढीव दर लागू करता येत नाही. त्यामुले तीन कोटी रूपयांची थकबाकी पालिकेने भरलेली नाही.