शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
2
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
3
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
4
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
5
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
6
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
7
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
8
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
9
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
10
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
11
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
12
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
13
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
14
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
15
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
16
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
17
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
18
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
19
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
20
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
Daily Top 2Weekly Top 5

ऐन पावसाळ्यात पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 21:36 IST

दरेगाव : चांदवड तालुक्यातील पूर्व भाग खरिपातील पोळ कांद्याचे आगार म्हणून ओळखला जातो. दरवर्षी जुलै महिन्यात पूर्व भागात मोठ्या प्रमाणावर कांदा लागवड केली जाते. यावर्षी मात्र पावसाळा सुरू होऊन दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी होऊनही पावसाने ओढ दिल्याने भर पावसाळ्यात परिपरात पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

ठळक मुद्दे श्रावणसरींची प्रतीक्षा : पाण्याअभावी शेतकरी चिंतित

दरेगाव : चांदवड तालुक्यातील पूर्व भाग खरिपातील पोळ कांद्याचे आगार म्हणून ओळखला जातो. दरवर्षी जुलै महिन्यात पूर्व भागात मोठ्या प्रमाणावर कांदा लागवड केली जाते. यावर्षी मात्र पावसाळा सुरू होऊन दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी होऊनही पावसाने ओढ दिल्याने भर पावसाळ्यात परिपरात पाणीटंचाई निर्माण झाली आहे.कमी पाण्यावर शेतकऱ्यांनी कांदा उळे टाकून रोपे तयार करून ठेवली आहेत; मात्र लागवडीसाठी पाऊस पडत नसल्याने शेतकरी चिंतित आहे. याआधीच खरिपातील अन्य पिके पावसाअभावी सुकली असून, उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट होण्याची शक्यता आहे. हा आर्थिक फटका सहन करत असतानाच येथील उत्पन्नाचा प्रमुख स्रोत असणाºया कांदा पिकाचे भवितव्य श्रावण महिन्याच्या सरींवर अवलंबून आहे. परिसरात तुरळक ठिकाणी रिमझिम पावसाच्या भरवशावर काही शेतकºयांनी कांदा लागवड सुरू केली आहे. या भागातील शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे. येत्या काही दिवसांत चांगला पाऊस झाला तर मोठ्या प्रमाणात कांदा लागवडीस सुरु वात होईल, अशी आशा आहे.पिके सुकेल्याने व फुलोºयात झटका बसून अपेक्षित उत्पादन न होता घट येणार आहे. या परिसरात दरवर्षी जिल्ह्यात सुरुवातीला लवकरच कांदा लागवड करतात. यावेळी पाऊस पाणीच नसल्याने लागवड उशिरा होणार आहे. मात्र त्याकरिता पुढे होणाºया पावसावर गणित अवलंबून राहणार आहेच. परिसरात अद्याप चांगला पाऊस झाला नसल्याने विहिरींना पाणी नाही. नदी, नाले, बंधारे, शेततळे, कूपनलिका कोरड्याठाक आहेत. काही शेतकºयांना आपल्याकडे साठवणूक केलेल्या पाण्यावर तर काहींनी निसर्गभरोसे रोपे जगविली आहेत. पंचेचाळीस दिवसांपूर्वी टाकलेली रोपे लागवड योग्य तयार झाली आहे. काहींना थोडेसुद्धा पाणी नसल्याने ती जळाली. आज न उद्या पाऊस येईल या आशेने शेतकºयांनी कांदा लागवडीसाठी शेत मशागत करून पाळे पाडून वाफे तयार करून ठेवली आहेत. श्रावणात रिमझिम पाहळे स्वरूपात जरी पाऊस पडत राहिला तरी मोठ्या प्रमाणावर कांदा लागवड कोरडवाहू स्वरुपात होईल आणि त्यानंतर शेतकºयांचे डोळे परतीच्या पावसावर राहतील.