शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

सततच्या शटडाऊनमुळे मीरा भाईंदर मध्ये पाणीबाणी

By धीरज परब | Updated: September 29, 2024 23:57 IST

Mira Bhayander News: मीरा भाईंदर शहराचा पाणी पुरवठा सलग दुसऱ्या आठवड्यात देखील शटडाऊन मुळे विस्कळीत झाला आहे . त्यामुळे शहरात पाणीबाणी ओढवली असून पाणी पुरवठा ६० ते ७० तासांवर गेला आहे . दुसरीकडे निवडणुकीच्या तोंडावर उशिराने का होईना काही राजकारण्यांना पाणी टंचाई वरून जाग आली आहे. 

मीरारोड - मीरा भाईंदर शहराचा पाणी पुरवठा सलग दुसऱ्या आठवड्यात देखील शटडाऊन मुळे विस्कळीत झाला आहे . त्यामुळे शहरात पाणीबाणी ओढवली असून पाणी पुरवठा ६० ते ७० तासांवर गेला आहे . दुसरीकडे निवडणुकीच्या तोंडावर उशिराने का होईना काही राजकारण्यांना पाणी टंचाई वरून जाग आली आहे.

मीरा भाईंदर शहराला एमआयडीसी व स्टेम प्राधिकरणा कडून पाणी पुरवठा केला जातो . तर दोन्ही प्राधिकरण हे आलटून पालटून बहुतांश दर आठवड्याला विविध कारणांनी २४ तासांचा शट डाऊन घेतला जातो . जलवाहिन्या , यंत्र व उपकरणांची दुरुस्ती आदी विविध कारणां सह पाणी कपात म्हणून पण शट डाऊन घेतला जातो . पाणी पुरवठ्याच्या ठिकाणा पासून मीरा भाईंदर हे शेवटच्या टोकाला असल्याने आधीच पाणी येण्यास विलंब लागतो . त्यातच शटडाऊन असल्यास पाणी पुरवठा २४ तासां करीत बंद राहिल्याने तो सुरळीत होण्यासाठीच ४८ लागतात.

एमआयडीसी ने २० सप्टेंबर रोजी २४ तसंच शटडाऊन घेतल्याने शहरातील पाणी सुरळीत होण्यासाठी तीन ते चार दिवस गेले . पाणी काहीसे सुरळीत होत नाही तोच २७ सप्टेंबर रोजी स्टेम प्राधिकरणाने २४ तासांचा शटडाऊन घेतला . त्यामुळे शहरातील अनेक भागात पाणी पुरवठा तब्बल ६० ते ७० तासांवर गेला होता . सोमवार पासून पाणी पुरवठ्याचे तास आता साधारण ४० ते ४८ तासांवर येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. 

परंतु शटडाऊन मुळे शहरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात पाणी समस्येचा सामना करावा लागला . अनेकांना बाहेरून खाजगी टँकर मागवावे लागले . काहींना तर पिण्याचे पाणी देखील विकत घ्यावे लागले . नागरिकांना होणाऱ्या पाणी समस्ये बद्दल काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत सह माजी नगरसेवक राजीव मेहरा , जुबेर इनामदार आदींनी पालिकेत पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता शरद नानेगावकर यांची भेट घेऊन पाणी  टंचाईचा निषेध केला . 

मनसेचे शहर अध्यक्ष संदीप राणे यांच्या नेतृत्वाखाली मनसेने पालिकेत हांडा मोर्चा काढून निषेध केला . यावेळी पोलिसांच्या समक्षच राणे यांनी नानेगावकर यांना शाहीची बाटली काढून ती टाकण्याची धमकी दिली . शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक दिनेश नलावडे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त संजय काटकर यांना निवेदन दिले .  नागरिकांना दोन - दोन दिवस पाणी मिळत नसल्याचा संताप व्यक्त करत आयुक्तांनी ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली . 

पाणी टंचाईला बहुतांश राजकारणी , तत्कालीन नगरसेवक आणि महापालिका जबाबदार कायद्याने रेन वॉटर हार्वेस्टिंग बंधनकारक असून पावसाचे पाणी जमिनीत मुरवून ते पाणी वापरल्यास शहरात पाणी टंचाई भेडसावणार नाही असे लोकमतने वेळोवेळी वृत्त दिले आहे . यंदा देखील मुसळधार पाऊस पडला पाणी रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणाच कार्यंवाहीत नसल्याने व ती योजना प्रभावी राबवली जात नसल्याने पावसाचे पाणी वाया गेले . रेन वॉटर मुळे भूगर्भातील पाण्याची पातळी वाढून नागरिकांना शौचालयासह , धुणीभांडी आदि कामांसाठी पाणी सहज उपलब्ध होऊ शकते . परंतु त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते . सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी सुद्धा वापरात आणणे बंधनकारक असताना त्याकडे देखील महापालिका ,व बहुतांश राजकारणी , टंकटलाईन नगरसेवक हे दुर्लक्ष करत आहेत . 

टॅग्स :Waterपाणीwater shortageपाणीकपातMira Bhayanderमीरा-भाईंदर