शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

मोखाड्यात ५ धरणे असूनही पाणीटंचाई; जलयुक्त शिवार योजना फसली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 12:47 AM

; लोकप्रतिनिधी उदासीन

मोखाडा : तालुक्यातील आदिवासी गाव पाड्यांना टँकर मुक्ती मिळावी यासाठी गेल्या अनेक वर्षापासून स्थानिक प्रशासन व लोकप्रतिनीधी कडून तोकडे प्रयत्न होत असल्याने आदिवासींची घोटभर पाण्यासाठी होणारी पायपीट अजूनही थांबलेली नाही नियोजनाचा अभाव, अपयशी ठरलेल्या नळ पाणी पुरवठा योजना, फसलेली जलयुक्त शिवार योजना आदी मुळे टँकरयुक्त गावाची संख्या दरवर्षी कमी होण्या ऐवजी वाढत चालली असून हंडाभर पाण्यासाठी मैलोन्मैल पायपीट करावी लागत आहे. तर लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असल्याने उमेदवार मागतात मते मतदार मागतात पाणी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.लोकप्रतिनिधी व प्रशासन यांचे कायम दुर्लक्ष असल्याने मोखाडा वासीयांच्या पदरी पाणी टंचाईचे संकट कायम असून पाच मोठी धरणे उशाला असूनही लोकप्रतिनिधी व येथील प्रशासन मूग गिळून गप्प बसल्याने येथील आदिवासींना घोटभर पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे.

तसेच गाव पाड्यांना पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरी पासून टंचाईग्रस्त गाव पाड्े २०-२५ किलो मिटर अंतरावर विखुरलेले असल्याने टँकर चालकांनाही चांगलीच कसरत करावी लागत आहे. महत्त्वाचे म्हणजे टंचाई ग्रस्त नागरिकांना हातातली कामे सोडून घोटभर पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे तर टँकर चालु असलेल्या गाव पाड्यांतील जनतेला चातक पक्षा प्रमाणे टँकरची दिवसभर वाट बघावी लागत असून मोलमजूरी करुन पोटाची खळगी भरणाºया आदिवासी बांधवाची मोठी अडचण झाली आहे.दरवर्षीच डिसेंबर महिन्यापासूनच पाणी टंचाईची समस्या तोंड वासून एप्रिल- मे मध्ये पाणी टंचाईचा प्रश्न अधिकच तीव्र होतो आज घडीला तालुक्यातील ७४ गावपाड्यात पाणीबाणी निर्माण झाली असून २१ टँकरने गावपाड्यांची तहान भागवली जात आहे दरवर्षी टँकरच्या नावाखाली करोडोचा खर्च केला जात असतांना निवडणुकीच्या काळात टँकर मुक्तीच्या आश्वासनांचा पाऊस पाडणाºया राजकीय पुढाऱ्यांना पाणी प्रश्न सोडवण्याचा कायमचा विसर पडला असल्याने स्वातंत्र्याच्या ६७ वर्षानंतरही घोटभर पाण्यासाठी होणारी पायपीट थांबलेली नाही.
लाखाच्या आसपास तालुक्याची लोकसंख्या पोहचली असून तालुक्यात खोच, पळसपाडा, मारुतीची वाडी, कारेगाव, मोरहंडा, अशी मोठी मोठी पाच धरणे उशाला असून कोरड मात्र घशाला अशी परिस्थिती प्रशासन लोकप्रतिनिधी यांच्या नाकर्तेपणामुळे कायम आहे या धरणावर करोडोंचा खर्च होऊन देखील याचा काहीच फायदा येथील आदिवासी बांधवाना झालेला नाही दरवर्षी या ठिकाणी प्रचंड पाऊस होऊन देखील शून्य नियोजनामुळे पाणी टंचाई उग्र होत असते यामुळे फक्त टँकर लॉबीला जगवण्याचे काम केले जात असल्याचे दिसून येते कोचाळे येथील मध्य वैतरणा प्रकल्पातून १२० कि मी अंतरावर शासनाने पाणी पोहचवले आहे परंतु धरणा लगतच्या ४ ते ५ किमी अंतरावरच्या गावांना उन्हाळ्यात हंडाभर पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. येथील धरणांचे पाणी मुंबईला नेणाºया सरकारला धरणांच्या जवळपास असलेल्या या तालुक्यातील गावांना का पुरवता येत नाही असा जनतेचा सवाल आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई