शहरं
Join us  
Trending Stories
1
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
2
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
3
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
4
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
5
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
6
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
7
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
8
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
9
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
10
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
11
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
12
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
13
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
14
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
15
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
16
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
17
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
18
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
20
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष

मोखाड्यात ५ धरणे असूनही पाणीटंचाई; जलयुक्त शिवार योजना फसली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 06:48 IST

; लोकप्रतिनिधी उदासीन

मोखाडा : तालुक्यातील आदिवासी गाव पाड्यांना टँकर मुक्ती मिळावी यासाठी गेल्या अनेक वर्षापासून स्थानिक प्रशासन व लोकप्रतिनीधी कडून तोकडे प्रयत्न होत असल्याने आदिवासींची घोटभर पाण्यासाठी होणारी पायपीट अजूनही थांबलेली नाही नियोजनाचा अभाव, अपयशी ठरलेल्या नळ पाणी पुरवठा योजना, फसलेली जलयुक्त शिवार योजना आदी मुळे टँकरयुक्त गावाची संख्या दरवर्षी कमी होण्या ऐवजी वाढत चालली असून हंडाभर पाण्यासाठी मैलोन्मैल पायपीट करावी लागत आहे. तर लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असल्याने उमेदवार मागतात मते मतदार मागतात पाणी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.लोकप्रतिनिधी व प्रशासन यांचे कायम दुर्लक्ष असल्याने मोखाडा वासीयांच्या पदरी पाणी टंचाईचे संकट कायम असून पाच मोठी धरणे उशाला असूनही लोकप्रतिनिधी व येथील प्रशासन मूग गिळून गप्प बसल्याने येथील आदिवासींना घोटभर पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे.

तसेच गाव पाड्यांना पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरी पासून टंचाईग्रस्त गाव पाड्े २०-२५ किलो मिटर अंतरावर विखुरलेले असल्याने टँकर चालकांनाही चांगलीच कसरत करावी लागत आहे. महत्त्वाचे म्हणजे टंचाई ग्रस्त नागरिकांना हातातली कामे सोडून घोटभर पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे तर टँकर चालु असलेल्या गाव पाड्यांतील जनतेला चातक पक्षा प्रमाणे टँकरची दिवसभर वाट बघावी लागत असून मोलमजूरी करुन पोटाची खळगी भरणाºया आदिवासी बांधवाची मोठी अडचण झाली आहे.दरवर्षीच डिसेंबर महिन्यापासूनच पाणी टंचाईची समस्या तोंड वासून एप्रिल- मे मध्ये पाणी टंचाईचा प्रश्न अधिकच तीव्र होतो आज घडीला तालुक्यातील ७४ गावपाड्यात पाणीबाणी निर्माण झाली असून २१ टँकरने गावपाड्यांची तहान भागवली जात आहे दरवर्षी टँकरच्या नावाखाली करोडोचा खर्च केला जात असतांना निवडणुकीच्या काळात टँकर मुक्तीच्या आश्वासनांचा पाऊस पाडणाºया राजकीय पुढाऱ्यांना पाणी प्रश्न सोडवण्याचा कायमचा विसर पडला असल्याने स्वातंत्र्याच्या ६७ वर्षानंतरही घोटभर पाण्यासाठी होणारी पायपीट थांबलेली नाही.
लाखाच्या आसपास तालुक्याची लोकसंख्या पोहचली असून तालुक्यात खोच, पळसपाडा, मारुतीची वाडी, कारेगाव, मोरहंडा, अशी मोठी मोठी पाच धरणे उशाला असून कोरड मात्र घशाला अशी परिस्थिती प्रशासन लोकप्रतिनिधी यांच्या नाकर्तेपणामुळे कायम आहे या धरणावर करोडोंचा खर्च होऊन देखील याचा काहीच फायदा येथील आदिवासी बांधवाना झालेला नाही दरवर्षी या ठिकाणी प्रचंड पाऊस होऊन देखील शून्य नियोजनामुळे पाणी टंचाई उग्र होत असते यामुळे फक्त टँकर लॉबीला जगवण्याचे काम केले जात असल्याचे दिसून येते कोचाळे येथील मध्य वैतरणा प्रकल्पातून १२० कि मी अंतरावर शासनाने पाणी पोहचवले आहे परंतु धरणा लगतच्या ४ ते ५ किमी अंतरावरच्या गावांना उन्हाळ्यात हंडाभर पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. येथील धरणांचे पाणी मुंबईला नेणाºया सरकारला धरणांच्या जवळपास असलेल्या या तालुक्यातील गावांना का पुरवता येत नाही असा जनतेचा सवाल आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई