शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
8
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
9
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
10
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
11
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
12
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
13
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
14
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
15
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
16
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
17
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
18
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
19
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
20
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा

मोखाड्यात ५ धरणे असूनही पाणीटंचाई; जलयुक्त शिवार योजना फसली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 06:48 IST

; लोकप्रतिनिधी उदासीन

मोखाडा : तालुक्यातील आदिवासी गाव पाड्यांना टँकर मुक्ती मिळावी यासाठी गेल्या अनेक वर्षापासून स्थानिक प्रशासन व लोकप्रतिनीधी कडून तोकडे प्रयत्न होत असल्याने आदिवासींची घोटभर पाण्यासाठी होणारी पायपीट अजूनही थांबलेली नाही नियोजनाचा अभाव, अपयशी ठरलेल्या नळ पाणी पुरवठा योजना, फसलेली जलयुक्त शिवार योजना आदी मुळे टँकरयुक्त गावाची संख्या दरवर्षी कमी होण्या ऐवजी वाढत चालली असून हंडाभर पाण्यासाठी मैलोन्मैल पायपीट करावी लागत आहे. तर लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असल्याने उमेदवार मागतात मते मतदार मागतात पाणी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.लोकप्रतिनिधी व प्रशासन यांचे कायम दुर्लक्ष असल्याने मोखाडा वासीयांच्या पदरी पाणी टंचाईचे संकट कायम असून पाच मोठी धरणे उशाला असूनही लोकप्रतिनिधी व येथील प्रशासन मूग गिळून गप्प बसल्याने येथील आदिवासींना घोटभर पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे.

तसेच गाव पाड्यांना पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरी पासून टंचाईग्रस्त गाव पाड्े २०-२५ किलो मिटर अंतरावर विखुरलेले असल्याने टँकर चालकांनाही चांगलीच कसरत करावी लागत आहे. महत्त्वाचे म्हणजे टंचाई ग्रस्त नागरिकांना हातातली कामे सोडून घोटभर पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे तर टँकर चालु असलेल्या गाव पाड्यांतील जनतेला चातक पक्षा प्रमाणे टँकरची दिवसभर वाट बघावी लागत असून मोलमजूरी करुन पोटाची खळगी भरणाºया आदिवासी बांधवाची मोठी अडचण झाली आहे.दरवर्षीच डिसेंबर महिन्यापासूनच पाणी टंचाईची समस्या तोंड वासून एप्रिल- मे मध्ये पाणी टंचाईचा प्रश्न अधिकच तीव्र होतो आज घडीला तालुक्यातील ७४ गावपाड्यात पाणीबाणी निर्माण झाली असून २१ टँकरने गावपाड्यांची तहान भागवली जात आहे दरवर्षी टँकरच्या नावाखाली करोडोचा खर्च केला जात असतांना निवडणुकीच्या काळात टँकर मुक्तीच्या आश्वासनांचा पाऊस पाडणाºया राजकीय पुढाऱ्यांना पाणी प्रश्न सोडवण्याचा कायमचा विसर पडला असल्याने स्वातंत्र्याच्या ६७ वर्षानंतरही घोटभर पाण्यासाठी होणारी पायपीट थांबलेली नाही.
लाखाच्या आसपास तालुक्याची लोकसंख्या पोहचली असून तालुक्यात खोच, पळसपाडा, मारुतीची वाडी, कारेगाव, मोरहंडा, अशी मोठी मोठी पाच धरणे उशाला असून कोरड मात्र घशाला अशी परिस्थिती प्रशासन लोकप्रतिनिधी यांच्या नाकर्तेपणामुळे कायम आहे या धरणावर करोडोंचा खर्च होऊन देखील याचा काहीच फायदा येथील आदिवासी बांधवाना झालेला नाही दरवर्षी या ठिकाणी प्रचंड पाऊस होऊन देखील शून्य नियोजनामुळे पाणी टंचाई उग्र होत असते यामुळे फक्त टँकर लॉबीला जगवण्याचे काम केले जात असल्याचे दिसून येते कोचाळे येथील मध्य वैतरणा प्रकल्पातून १२० कि मी अंतरावर शासनाने पाणी पोहचवले आहे परंतु धरणा लगतच्या ४ ते ५ किमी अंतरावरच्या गावांना उन्हाळ्यात हंडाभर पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. येथील धरणांचे पाणी मुंबईला नेणाºया सरकारला धरणांच्या जवळपास असलेल्या या तालुक्यातील गावांना का पुरवता येत नाही असा जनतेचा सवाल आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई