शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
2
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
3
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
4
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
5
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
6
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
7
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
8
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
9
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
10
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
11
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
12
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
13
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
14
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
15
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
17
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
18
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
19
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
20
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
Daily Top 2Weekly Top 5

बदलापूरमधील शिरगावच्या सोसायट्या टँकरवर अवलंबून, शहराच्या पाणी वितरण व्यवस्थेत घोळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2019 01:42 IST

बदलापूर शहराला लागून उल्हास नदी असतानाही या शहरातील काही भागात तीव्र पाणी टंचाई आहे.

बदलापूर - बदलापूर शहराला लागून उल्हास नदी असतानाही या शहरातील काही भागात तीव्र पाणी टंचाई आहे. शिरगांव परिसरात सर्वाधिक पाणीटंचाई असून या भागातील बहुसंख्य गृहसंकुले ही आजही टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहेत. अशीच काहीशी परिस्थिती सोनिवली गांव परिसरात निर्माण झाली आहे.कुळगांव-बदलापूर नगरपरिषद हद्दीतील परिसराला जीवन प्राधिकरणाकडून पाणीपुरवठा केला जातो. बदलापुरात वाढीव पाणीपुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात आहे. मात्र, शहरातील काही भागात तीव्र पाणीटंचाई आहे. शहरातील पाणी वितरण व्यवस्थेत घोळ असल्याने ही टंचाई निर्माण झाली आहे.शिरगांव परिसरात मोठ्या प्रमाणात गृह प्रकल्प उभे राहिल्याने त्यांना गरजेनुसार पाणीपुरवठा करणे शक्य होत नाही. या परिसरात हजार ते दीड हजार घरांचे प्रकल्प उभे राहिले आहेत. ज्या प्रमाणात घरांची आणि इमारतींची उभारणी झाली आहे, त्या प्रमाणात जलवाहिन्या टाकण्यात आलेल्या नाहीत. कमी व्यासाच्या जलवाहिन्यांवर अनेक इमारतींना नळजोडणी दिल्याने प्रत्येक इमारतीला मुबलक पाणी देणे शक्य होत नाही. त्यामुळे काही भागात केवळ अर्धा तास पाणी सोडले जात असल्याने ते संपूर्ण इमारतीला पुरवणे शक्य होत नाही. त्यामुळे अनेक सोसायट्या पिण्यासाठी टँकरचे पाणी वापरत आहेत. ज्या इमारतींना पाणीपुरवठा करणे शक्य होत नाही अशा इमारतींना टँकरने पाणी देण्याची सोय केली आहे. मात्र, त्याचे योग्य ते दर संबंधित टँकर चालकांना द्यावे लागत आहेत. परिणामी, टँकरच्या महागड्या पाण्याकरिता बदलापूरकरांच्या खिशाला खार लागत आहे.शिरगावातील सॅफ्रॉन हिल्स, गुरू प्रेरणा, लाईफ स्टाईल या गृहसंकुलांना मुबलक पाणी मिळत नसल्याने त्यांना टँकरचे पाणी मागवण्याची वेळ आली आहे. या भागातील अनेक गृह प्रकल्पातील कूपनलिका बंद पडल्याने दररोज लागणारे पाणी टँकरच्याच माध्यमातून उपलब्ध करावे लागते.वाढीव पाणीपुरवठा योजनेतून शिरगांव परिसरात स्वतंत्र जलकुंभ आणि विस्तारीत जलवाहिन्या टाकण्याचे काम या आधीच केलेले आहे. मात्र, पाण्याची उपलब्धता कमी पडत असल्याने पाणी पुरवठा करण्यात अडचणी येत आहेत. बदलापूर शहराला बारवी धरणातून अतिरिक्त पाणी उपलब्ध होत नाही तोवर शहराच्या सीमेवर असलेल्या भागाला मुबलक पाणी उपलब्ध करुन देणे अशक्य आहे. ब्शहरातील बहुसंख्य टँकर हे शिरगांव परिसरातील सोसायटीमध्येच फेऱ्या मारतांना दिसत आहेत. सोसायटीमधील सुरक्षा रक्षकाला सुरक्षेपेक्षा टँकरचे पाणी पंपाद्वारे घरांना व्यवस्थित पुरवण्याचे काम करावे लागते.शिरगांव भागात पाणीटंचाई ही काही नवीन नाही. काही भागात पाणी येत असले तरी ते अर्धा तासापेक्षा जास्त मिळत नाही. एवढ्या कमी वेळेत इमारतीमधील घरांना पाणी पुरवणे शक्य नाही. त्यामुळे बाहेरून टँकर मागवण्याची वेळ येते. - अविनाश मोरे, रहिवासी, शिरगांव

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईbadlapurबदलापूर