शहरं
Join us  
Trending Stories
1
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
2
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
3
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
4
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड
5
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
6
भाजपा उत्तर भारतीय मोर्चानं राज ठाकरेंची केली पाठराखण; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सुनावलं
7
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
8
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
9
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
10
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
11
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
12
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
13
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
14
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
15
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
16
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
17
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
18
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
19
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
20
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव

लालफितशाहीमुळे पाणीटंचाई; पुरेसा पाऊस पडूनही शहरे तहानलेलीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 12:24 AM

पुरेसा पाऊस पडूनही शहरे तहानलेलीच : जनसामान्यांचे नाहक हाल

-पंकज पाटीलअंबरनाथ : अंबरनाथ शहराला पाणीपुरवठा करणारी धरणे भरून वाहत होती, तरीही शहरात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. जीवन प्राधिकरणाकडे शहराच्या पाणीपुरवठ्याची जबाबदारी आहे. प्राधिकरणाने एमआयडीसीची थकबाकी भरण्यात विलंब लावल्याने शहरात पाणीपुरवठा कमी होत असून, नाहक त्रास येथील करदात्यांना सहन करावा लागत आहे.

अंबरनाथ शहराला पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी ही जीवन प्राधिकरणावर आहे. प्राधिकरण उल्हास नदीतून ४७ दशलक्ष लीटर पाणी उचलते, तर एमआयसीडीकडून १० दशलक्ष लीटर पाणी घेते. सोबत चिखलोली धरणातून सहा दशलक्ष लीटर पाण्याची सोय करण्यात आली आहे. शहराला ६३ दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होत असतानाही तो कमी पडत आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे पाण्याची गळती. तब्बल ३५ टक्के पाणी गळती असल्याने मुबलक पाणी असतानाही प्राधिकरणाला शहरात योग्य दाबाने पाणीपुरवठा करता येत नाही.

त्यातच चिखलोली धरणातील पाणी दूषित झाल्याचे कारण पुढे करून प्राधिकरणाने पुरवठा बंद केला आहे. मात्र, त्याच्या मोबदल्यात वाढीव पाण्याची गरज भागविण्याची जबाबदारी एमआयडीसीकडे आहे. मात्र, चिखलोली धरणातील पाण्याची तूट भरून काढण्यासाठी एमआयडीसी तयार होत नसल्याने अडचणी वाढत आहेत. जीवन प्राधिकरणाच्या अंगावर पाणीबिलापोटी मोठी रक्कम शिल्लक आहे. त्यामुळे एमआयडीसी प्राधिकरणाला वाढीव पाणी देण्यास तयार नाही. या गोंधळामुळे शहरात महिन्याभरापासून पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

आता शहरात पाण्यासाठी आंदोलने होत असल्याने प्राधिकरणाने लागलीच थकीत बिलांपैकी सात कोटी ५० लाख रुपये एमआयडीसीकडे भरले आहेत. त्यामुळे आता वाढीव चार दशलक्ष लीटर पाणी उपलब्ध झाले आहे. असे असले, तरी अजूनही दोन दशलक्ष लीटर पाण्याची तूट कायम आहे. शहरातील टंचाई ही जीवन प्राधिकरण आणि एमआयडीसी यांच्या वादात अडकली आहे, तर दुसरीकडे एमआयडीसीच्या बारवी धरणातून वाढीव पाणी मिळण्यास विलंब होत असल्याने त्याचा दुहेरी फटका शहराला बसत आहे.

टॅग्स :ambernathअंबरनाथWaterपाणी