शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
6
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
7
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
8
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
9
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
10
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
11
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
12
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
13
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
14
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
15
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
16
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
17
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
18
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
19
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
20
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

लोढांची लाखमोलाची ‘पलावा’ बुडाली; स्मार्ट सिटीचे धिंडवडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2019 06:48 IST

देसाई खाडीत केलेल्या बांधकामांचा बसला फटका

डोंबिवली : मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी डोंबिवलीजवळ कल्याण-शीळ मार्गावर देसाई खाडी बुजवून उभी केलेली पलावा ही स्मार्ट सिटी गेले दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसात बुडाली. लक्षावधी रुपये खर्च करून येथे आलिशान फ्लॅट घेतलेल्यांची महागडी वाहने पुराच्या पाण्यात होडीसारखी तरंगत होती. त्यामुळे बिग बी अमिताभ बच्चन यांना ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसिडर करून प्रमोशन केलेल्या या प्रकल्पाची अब्रू चव्हाट्यावर आली.पलावा सिटीला लागून असलेली देसाई खाडी ही मलंगगड येथून मुंब्रा खाडीला मिळते. २६ जुलै २००५ रोजी आलेल्या पुराच्या वेळीही पलावा सिटी पाण्याखाली गेली होती. मात्र, त्यावेळी या ठिकाणी फ्लॅटची एवढी मोठी विक्री झाली नव्हती. मात्र, तब्बल १४ वर्षांनंतर पुन्हा देसाई खाडी कोपली आणि पलावा सिटीत पाणी घुसले. पूर नियंत्रणरेषेच्या पलीकडे बांधकामे न करता ती खाडीकिनारी केल्याचा फटका पलावातील रहिवाशांना बसला आहे. प्रस्तुत प्रतिनिधीने पलावा सिटीला भेट देऊन पुरामुळे नुकसान झालेल्या रहिवाशांसोबत बातचीत केली असता त्यांनी मात्र केवळ पाच सोसायट्यांमध्ये पाणी घुसले होते. इतरत्र फारसे काहीच नुकसान झाले नाही, असा दावा केला. सोमवारी येथील सोसायटींमधील पाणी पूर्णपणे ओसरले होते. परंतु, रस्त्यांवर मात्र काही प्रमाणात पाणी व चिखल अद्यापही साचल्याचे पाहायला मिळाले.शनिवार आणि रविवारी झालेल्या मुसळधार पावसाने कल्याण-डोंबिवली शहरांची दाणादाण उडवून दिली होती. सर्वाधिक फटका खाडीलगत असलेल्या भागाला बसला. दोन्ही शहरांतील सोसायट्या आणि चाळी तर पाण्याखाली गेल्याच, पण पलावासारखी सिटी आणि मोठी गृहसंकुले यांच्यातही पुराचे पाणी घुसले होते. तळ मजल्यावरील पार्किंगचा परिसर पाण्याखाली गेल्याचे चित्र पलावा सिटीत पाहावयास मिळाले. ‘कासारीओ पलावा’ आणि ‘कासाबेला गोल्ड’ या दोन भागांत पलावा सिटी विभागली आहे. ‘कासाबेला’ला फारसे पाणी भरले नव्हते. परंतु, ‘कासारीओ’ येथील परिसर संपूर्णपणे जलमय झाला होता. तेथील भीषण परिस्थितीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.रस्त्यावर अद्याप पाणीच पाणीरविवारी येथील सोसायट्यांमध्ये पुराचे पाणी घुसले होते. सोमवारी याठिकाणचे पाणी ओसरले होते. परिसराची स्वच्छता करण्यात येत असल्याचे दिसून आले. ‘कासारीओ’ या गृहसंकुलाकडे जाणाऱ्या रस्त्यावर काही ठिकाणी पुराचे पाणी, चिखल साठल्याचे दिसून आले. येथील चौकांमध्येही पाणी असल्याने दुचाकीस्वारांना पाण्यातूनच वाट काढावी लागत होती. स्मार्ट सिटीचे ओंगळवाणे चित्र तेथे पाहायला मिळाले.पलावातील काही परिसर जलमय होण्यास खाडी परिसरात सुरू असलेले पुलाचे बांधकाम जबाबदार आहे. त्यामुळेच सोसायटीमधील तळ मजला पूर्णपणे पाण्याखाली गेला होता. यात वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. परंतु, पलावा सिटी मॅनेजमेंटचे मोठे सहकार्य रहिवाशांना मिळाले.-ऐश्वर्य कोल्हटकर, रहिवासी, ‘मरिना’ सोसायटी

टॅग्स :Rainपाऊस