शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे, आशा आहे की..."; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियोंनी दिले टॅरिफ कमी करण्याचे संकेत
2
सोलापुरातील महापुराचा रेल्वे वाहतुकीला फटका; वंदे भारत, सिद्धेश्वर एक्सप्रेसला उशिरा, अनेक गाड्या सोलापूर विभागात थांबविल्या
3
ग्राहकांची झुंबड! वाहनांच्या विक्रीने नवा उच्चांक गाठला; कोणत्या क्षेत्रांना किती होणार फायदा?
4
रोज-रोज चटणी भात... पतीने केली चिकनची मागणी; पत्नीने नकार देताच उचलले टोकाचे पाऊल!
5
"अवामवर बॉम्बस्फोट करुन वेळ मिळाला तर...", भारताच्या क्षितिज त्यागी यांनी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत पाकिस्तानला सुनावले
6
UPI EMI: आता UPI पेमेंट करताना EMI चा पर्याय निवडता येणार; NPCI आणणार नवी सुविधा
7
Online Shopping Tips : ऑनलाइन खरेदीवर खरोखर सूट मिळते का, कसे ओळखायचे? ध्रुव राठीने सांगितली ट्रिक
8
बॅंक FD विसरुन जाल! Post Office ची ही स्कीम देईल १० वर्षात ४२ लाखांचा फंड, पटापट करा चेक
9
डोळ्यांसमोर पत्नीवर झाले ४५ वार, तरीही पती गप्प कसा बसला? पोलिसांना संशय आला; तपास करताच मोठा ट्विस्ट निघाला!
10
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
11
६ लाखांत झेडपी, १० लाखांत मनपा लढवायची तरी कशी?; खर्चाची मर्यादा वाढवण्याची मागणी
12
आर्यन खानने 'बॅड्स ऑफ बॉलिवूड' दिग्दर्शित केलीच नाही? या चर्चांवर मुख्य अभिनेत्री म्हणाली...
13
"H-1B व्हिसा धोरण अन्यायकारक, भारतीय-अमेरिकननी विरोध करावा", शशी थरूरांचे आवाहन
14
चढायला गेले एस्केलेटर बंद पडला, बोलायला गेले टेलीप्रॉम्प्टर बिघडला; UNमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत काय काय घडलं?
15
संतापजनक अन् ह्रदयद्रावक! आधी दगड कोंबला, फेविक्विकने चिटकवले तोंड; १५ दिवसांचं बाळ फेकले जंगलात
16
आजचे राशीभविष्य- २४ सप्टेंबर २०२५, अविवाहितांचे विवाह ठरतील; नोकरी- व्यवसायात उत्पन्न वाढेल
17
ICC Suspends USA Cricket :आयसीसीनं अमेरिकेच्या क्रिकेट संघाला केलं निलंबित; जाणून घ्या कारण
18
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी देणार २,२१५ काेटी; राज्य सरकारने घेतला नुकसानीचा आढावा
19
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
20
६ कोटींच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ अन् गर्भपात; माहीम पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल

गळतीचे प्रमाण वाढल्याने पाणी कपात; ठाण्यातील महत्वाच्या शहरातील नागरिकांना फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2022 10:40 IST

-पंकज पाटील अंबरनाथ / बदलापूर : अंबरनाथ आणि बदलापूर शहरात पाणी गळतीचे प्रमाण ३५ टक्क्यांपेक्षा जास्त असल्याने या दोन्ही ...

-पंकज पाटील

अंबरनाथ / बदलापूर : अंबरनाथ आणि बदलापूर शहरात पाणी गळतीचे प्रमाण ३५ टक्क्यांपेक्षा जास्त असल्याने या दोन्ही शहरांवर पाणी कपातीला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. मागील आठ ते १० वर्षांपासून पाणी गळतीचे प्रमाण कमी करण्यास जीवन प्राधिकरणाला अपयश आले आहे.

अंबरनाथ आणि बदलापूर शहराला मिळून ११० दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासत आहे. त्यातील ९५ दशलक्ष लिटर पाणी उल्हास नदीच्या बॅरेज धरणातून उचलण्यात येत आहे, तर उर्वरित १५ एमएलडी पाणी एमआयडीसीमार्फत अंबरनाथला पुरवण्यात येत आहे. दोन्ही शहरांना पाणी पुरविण्याची जबाबदारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे आहे. पाणीपुरवठ्याची योजना सुरळीत करण्यासाठी अमृत योजनेतून कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले आहे. मात्र, जुन्या जलवाहिन्या तसाच ठेवल्याने पाणी गळतीचे प्रमाण वाढले आहे.

मागील दोन ते तीन वर्षांत अंबरनाथची पाण्याची गरज वाढली असून, पुरेसे पाणी अद्यापही या दोन्ही शहरांना उपलब्ध झाले नाही. त्यामुळे वाढत्या लोकसंख्येची पाण्याची गरज भागविण्यासाठी जीवन प्राधिकरणाला पाण्याची गळती रोखणे गरजेचे आहे. मात्र, ते रोखण्यात अपयश आल्याने अंबरनाथ आणि बदलापूर शहरावर पाणी कपातीला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. शहरातील पाणीटंचाईला केवळ पाणी चोरीच जबाबदार नसून, जीवन प्राधिकरणाचे चुकलेले नियोजन हे देखील महत्त्वाचे कारण आहे. दुसरीकडे पालिका प्रशासनामार्फत टँकरची कोणतीही सोय उपलब्ध करून देण्यात आलेली नाही.

या भागांतील नागरिकांच्या तोंडचे पळाले पाणी

- अंबरनाथच्या महेंद्र नगर, फुले नगर, कमलाकर नगर, नालंदा नगर, बुवापाडा, मोरीवली पाडा आणि गांधी नगर या भागांत तीव्र पाणीटंचाईला सामोरे जाण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.

- बदलापूरमध्ये कात्रपगाव, शिरगाव, खरवाई, बदलापूर गाव या भागांमध्ये टंचाई आहे. या भागातील पाणीटंचाईमुळे खासगी टँकर मालक या टंचाईचा फायदा उचलताना दिसत आहेत.

टॅग्स :water shortageपाणीकपातthaneठाणेambernathअंबरनाथbadlapurबदलापूर