शहरं
Join us  
Trending Stories
1
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
2
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
3
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
4
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
5
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
6
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
7
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
8
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
9
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
10
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
11
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
12
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
आईचे दुसऱ्या महिलेशी समलैंगिक संबंध, प्रेमासाठी चिमुकल्याची हत्या; पतीच्या हाती लागला व्हिडिओ अन् मग...
14
कधीकाळी चालवायचे रिक्षा, आता मुलाच्या वाढदिवशी लग्झरी कार दिली भेट; VIP नंबरसाठी मोजले ३१ लाख
15
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
16
तुमच्या कारमधील परफ्यूम दरवळतोय पण ठरतोय 'सायलेंट किलर'! श्वास आणि मायग्रेनचा गंभीर धोका
17
Nuclear warfare: भविष्य स्फोटक आहे...
18
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
19
अर्धा तास तडफडला! फी न भरल्याने प्राध्यापकाने केला अपमान, विद्यार्थ्याने कॅम्पसमध्ये स्वतःला पेटवले
20
"तुमच्यातले शारीरिक संबंध कसे आहेत?", आंतरधर्मीय लग्न करताना मराठी गायिकेला आईने विचारलेला बोल्ड प्रश्न

गळतीचे प्रमाण वाढल्याने पाणी कपात; ठाण्यातील महत्वाच्या शहरातील नागरिकांना फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2022 10:40 IST

-पंकज पाटील अंबरनाथ / बदलापूर : अंबरनाथ आणि बदलापूर शहरात पाणी गळतीचे प्रमाण ३५ टक्क्यांपेक्षा जास्त असल्याने या दोन्ही ...

-पंकज पाटील

अंबरनाथ / बदलापूर : अंबरनाथ आणि बदलापूर शहरात पाणी गळतीचे प्रमाण ३५ टक्क्यांपेक्षा जास्त असल्याने या दोन्ही शहरांवर पाणी कपातीला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. मागील आठ ते १० वर्षांपासून पाणी गळतीचे प्रमाण कमी करण्यास जीवन प्राधिकरणाला अपयश आले आहे.

अंबरनाथ आणि बदलापूर शहराला मिळून ११० दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासत आहे. त्यातील ९५ दशलक्ष लिटर पाणी उल्हास नदीच्या बॅरेज धरणातून उचलण्यात येत आहे, तर उर्वरित १५ एमएलडी पाणी एमआयडीसीमार्फत अंबरनाथला पुरवण्यात येत आहे. दोन्ही शहरांना पाणी पुरविण्याची जबाबदारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे आहे. पाणीपुरवठ्याची योजना सुरळीत करण्यासाठी अमृत योजनेतून कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले आहे. मात्र, जुन्या जलवाहिन्या तसाच ठेवल्याने पाणी गळतीचे प्रमाण वाढले आहे.

मागील दोन ते तीन वर्षांत अंबरनाथची पाण्याची गरज वाढली असून, पुरेसे पाणी अद्यापही या दोन्ही शहरांना उपलब्ध झाले नाही. त्यामुळे वाढत्या लोकसंख्येची पाण्याची गरज भागविण्यासाठी जीवन प्राधिकरणाला पाण्याची गळती रोखणे गरजेचे आहे. मात्र, ते रोखण्यात अपयश आल्याने अंबरनाथ आणि बदलापूर शहरावर पाणी कपातीला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. शहरातील पाणीटंचाईला केवळ पाणी चोरीच जबाबदार नसून, जीवन प्राधिकरणाचे चुकलेले नियोजन हे देखील महत्त्वाचे कारण आहे. दुसरीकडे पालिका प्रशासनामार्फत टँकरची कोणतीही सोय उपलब्ध करून देण्यात आलेली नाही.

या भागांतील नागरिकांच्या तोंडचे पळाले पाणी

- अंबरनाथच्या महेंद्र नगर, फुले नगर, कमलाकर नगर, नालंदा नगर, बुवापाडा, मोरीवली पाडा आणि गांधी नगर या भागांत तीव्र पाणीटंचाईला सामोरे जाण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.

- बदलापूरमध्ये कात्रपगाव, शिरगाव, खरवाई, बदलापूर गाव या भागांमध्ये टंचाई आहे. या भागातील पाणीटंचाईमुळे खासगी टँकर मालक या टंचाईचा फायदा उचलताना दिसत आहेत.

टॅग्स :water shortageपाणीकपातthaneठाणेambernathअंबरनाथbadlapurबदलापूर