शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
4
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
5
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
6
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
7
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
8
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
9
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
10
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
11
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
12
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
13
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
14
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
15
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
16
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
17
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
18
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
19
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
20
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!

गळतीचे प्रमाण वाढल्याने पाणी कपात; ठाण्यातील महत्वाच्या शहरातील नागरिकांना फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2022 10:40 IST

-पंकज पाटील अंबरनाथ / बदलापूर : अंबरनाथ आणि बदलापूर शहरात पाणी गळतीचे प्रमाण ३५ टक्क्यांपेक्षा जास्त असल्याने या दोन्ही ...

-पंकज पाटील

अंबरनाथ / बदलापूर : अंबरनाथ आणि बदलापूर शहरात पाणी गळतीचे प्रमाण ३५ टक्क्यांपेक्षा जास्त असल्याने या दोन्ही शहरांवर पाणी कपातीला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. मागील आठ ते १० वर्षांपासून पाणी गळतीचे प्रमाण कमी करण्यास जीवन प्राधिकरणाला अपयश आले आहे.

अंबरनाथ आणि बदलापूर शहराला मिळून ११० दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासत आहे. त्यातील ९५ दशलक्ष लिटर पाणी उल्हास नदीच्या बॅरेज धरणातून उचलण्यात येत आहे, तर उर्वरित १५ एमएलडी पाणी एमआयडीसीमार्फत अंबरनाथला पुरवण्यात येत आहे. दोन्ही शहरांना पाणी पुरविण्याची जबाबदारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे आहे. पाणीपुरवठ्याची योजना सुरळीत करण्यासाठी अमृत योजनेतून कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले आहे. मात्र, जुन्या जलवाहिन्या तसाच ठेवल्याने पाणी गळतीचे प्रमाण वाढले आहे.

मागील दोन ते तीन वर्षांत अंबरनाथची पाण्याची गरज वाढली असून, पुरेसे पाणी अद्यापही या दोन्ही शहरांना उपलब्ध झाले नाही. त्यामुळे वाढत्या लोकसंख्येची पाण्याची गरज भागविण्यासाठी जीवन प्राधिकरणाला पाण्याची गळती रोखणे गरजेचे आहे. मात्र, ते रोखण्यात अपयश आल्याने अंबरनाथ आणि बदलापूर शहरावर पाणी कपातीला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. शहरातील पाणीटंचाईला केवळ पाणी चोरीच जबाबदार नसून, जीवन प्राधिकरणाचे चुकलेले नियोजन हे देखील महत्त्वाचे कारण आहे. दुसरीकडे पालिका प्रशासनामार्फत टँकरची कोणतीही सोय उपलब्ध करून देण्यात आलेली नाही.

या भागांतील नागरिकांच्या तोंडचे पळाले पाणी

- अंबरनाथच्या महेंद्र नगर, फुले नगर, कमलाकर नगर, नालंदा नगर, बुवापाडा, मोरीवली पाडा आणि गांधी नगर या भागांत तीव्र पाणीटंचाईला सामोरे जाण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.

- बदलापूरमध्ये कात्रपगाव, शिरगाव, खरवाई, बदलापूर गाव या भागांमध्ये टंचाई आहे. या भागातील पाणीटंचाईमुळे खासगी टँकर मालक या टंचाईचा फायदा उचलताना दिसत आहेत.

टॅग्स :water shortageपाणीकपातthaneठाणेambernathअंबरनाथbadlapurबदलापूर