शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
3
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
4
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
5
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
6
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
7
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
8
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
9
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
10
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
11
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
12
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
13
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
14
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
15
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
16
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
17
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
18
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
20
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...

सणासुदीच्या दिवसांत पाणीकपात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2018 5:41 AM

धरणांतील पाणीसाठा घटला : प्रशासनाच्या हालचाली सुरू; १४ ते १५ टक्के कपातीची शक्यता

सुरेश लोखंडे

ठाणे : गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पडलेला कमी पाऊस आणि धरणात कमी झालेला साठा, यामुळे ऐन नवरात्री आणि दिवाळीच्या दिवसांत जिल्ह्यातील सर्व महापालिका, नगरपालिकांना पाणीकपातीला तोंड द्यावे लागणार आहे. यासाठी प्रशासनाच्या जोरदार हालचाली सुरू असून पुढील आठवड्यात पाणीकपातीवर शिक्कामोर्तब होण्याचे संकेत आहेत.

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सुमारे १४ टक्के पाणीकपात लागू केली होती. फेब्रुवारीत ती कमी करून सात टक्के केली. त्यानंतर, एप्रिल-मेपासून कपात रद्द केली; पण उल्हासनगर महापालिकेने आताचा पावसाळा संपला, तरी एक दिवसाची पाणीकपात कायम ठेवून वेठीस धरले. उल्हासनगरच्या बहुतांश भागात शुक्रवारी दिवसभर पाणी सोडले जात नाही. महापालिकेच्या या मनमानीची झळ वर्षभरापासून नागरिकांना सोसावी लागत आहे. यावेळीही सक्तीच्या पाणीकपातीला त्यांना तोंड द्यावे लागणार आहे. जिल्हाभरात सुमारे १४ ते १५ टक्के सक्तीच्या पाणीकपातीला तोंड द्यावे लागणार आहे.यंदा सरासरी दोन हजार ५१७.९१ मिमी पाऊस पडला. मागील वर्षी तो सरासरी तीन हजार ३४३.३४ मिमी पडला होता. मागील वर्षी परतीचा पाऊस जोरदार होता. ओखी चक्रीवादळाच्या कालावधीत जिल्ह्यात सर्वत्र पाऊस पडला होता. यंदा मात्र परतीच्या पावसाकडूनही उपेक्षाच होत आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे आगामी तीन दिवसांत परतीचा पाऊस जोर धरणार असल्याचा अंदाज आहे. मात्र, त्यामुळे धरण भरण्याची शक्यता नसल्यामुळे पुढील आठवड्यापासून १४ ते १५ टक्के किंवा त्यापेक्षा जास्त पाणीकपात लागू करण्याच्या दृष्टीने चाचपणी सुरू आहे.धरणातील पाणीसाठाशंभर टक्के भरलेल्या बारवी धरणात आता २२६.७३ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. या धरणात मागील वर्षी १०० टक्के म्हणजे २३३.०७ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा होता. तरीदेखील १४ टक्के पाणीकपात लागू केली होती.त्यावेळी धरणाखालील पाणी उचलण्यात येत होते. आता मागील १५ दिवसांपासून धरणातील पाणीपुरवठा शहरांना करावा लागत आहे. यामुळेही साठा झपाट्याने कमी झाला आहे.उल्हास नदीच्या आंध्रा धरणातही ३२४.२२ दशलक्ष घनमीटर (९५.६० टक्के) साठा आहे. या तुलनेत मागील वर्षी तो ३३७.३८ दशलक्ष घनमीटर म्हणजे ९९.४८ टक्के पाणीसाठा असतानाही पाणीकपात लागू केली होती.आता सर्वच धरणांतील पाणीसाठा कमी झाला आहे. यामुळे यंदा लवकर कपात लागू करून १५ जुलैपर्यंत पाणीसाठा पुरवण्याची तजवीज जिल्हा प्रशासनाकडून केली जात आहे.च्मुंबईसह ठाणे महापालिकेलापाणीपुरवठाकरणाऱ्या भातसाधरणातम्हणजे८८५.८६दशलक्ष घनमीटरपाणीसाठा आहे. याधरणात मागील वर्षी ९३७.४० दशलक्ष घनमीटर (९९.५० टक्के) पाणीसाठा होता.च्यंदा या धरणात केवळ सरासरी २०६४ मिमी पाऊस पडला. मागील वर्षी तो सरासरी ३२०३ मिमी म्हणजे यंदाच्या तुलनेत सरासरी एक हजार १३९ मिमी जादा पाऊस पडला होता.च्याप्रमाणेच ठाणे शहराच्या काही भागांसह कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, मीरा-भार्इंदर या महापालिका आणि अंबरनाथ, कुळगाव-बदलापूर या नगरपालिकांना पाणीपुरवठा करणाºया बारवी धरण व उल्हास नदीला पाणीपुरवठा करणाºया आंध्रा धरणातही मागील वर्षाच्या तुलनेत कमी साठा आहे. 

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका