शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
4
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
5
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
6
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
7
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
8
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
9
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
10
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
11
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
12
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
13
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
14
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
15
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
16
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
17
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
18
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
19
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
20
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई

हंडाभर पाण्यासाठी डोळ्यात पाणी, बॅटरीच्या प्रकाशात आणावे लागते पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2019 03:39 IST

कसाऱ्यापासून १५ किमी. अंतरावरील अजनूप ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मध्य वैतरणा धरणाचे पात्र आहे.

- शाम धुमाळ कसारा - कसाऱ्यापासून १५ किमी. अंतरावरील अजनूप ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मध्य वैतरणा धरणाचे पात्र आहे. येथे मुबलक पाणी साठा असल्याने धरणाच्या पात्रालगत बॅक वॉटरही मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, दोन किमी अंतरावरील उठावा गावासह जवळपासच्या दहा गांव पाड्यांना काही याचा उपयोग होत नाही.या गावपाड्यातील गोरगरीब ग्रामस्थ हंडाभर पाण्यासाठी पहाटेच्या सुमारास दरीत उतरतात. एक तास उतरायला तर दरी चढायला दीड तास लागतो. उठावा गावातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण पहाटे पाचच्या सुमारास एक हंडा, कळशी घेऊन बॅटरीच्या प्रकाशात दरीत उतरतात आणि धरणाच्या बॅक वॉटरमधून पाणी भरु न परतीचा मार्ग स्वीकारतात. डोक्यावर हंडाकळशी घेतदरी चढताना या ग्रामस्थांना बराच त्रास सहन करावा लागतो. या गावासह वारली पाडा, बोंडारपाडा, मेंगाळ पाडा, भाकरेपाडा, भस्मेपाडा, काटीचापाडा, गायधरा, कोळीपाडा, अजनूप या गावांना देखील प्रचंड पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत असून काही गावात येणारे पाणी टँकर अर्धवट स्थितीत जवळपास खाली केले जातात. हाकेच्या अंतरावर पाणी असताना शासनस्तरावर काहीही उपाययोजना होत नसल्याने आजही शहापूर तालुक्यातील आदिवासी पाण्यासाठी वणवण करत आहेत.पाणीटंचाई दूर करण्यासाठी पर्यायअजनूप कार्यक्षेत्रातील उठावा गावापासून धरणाच्या बॅक वॉटर पाणीसाठ्यापर्यंत जाण्यासाठी पन्नास वर्षांपूर्वी बैलगाडी जाण्यासाठीचा ब्रिटीशकालीन रस्ता होता. तो रस्ता जर पूर्ववत केला तर या गावासह अन्य गावपाड्यांचा पाणी प्रश्न सुटण्यास मदत होईल.आम्हाला दरवर्षी माघ (फेब्रुवारी) पासून भीषण पाणी टंचाईला तोंड द्यावे लागते. हाकेच्या अंतरावर धरण आणि धरणाचे पाणी दिसत असताना ते आम्हाला मिळत नाही, हे आमचे दुर्दैव.- छाया दुभेले, ग्रामस्थ महिला, उठावाबैलगाडीसाठीचा जुना रस्ता पूर्ववत केल्यास बैलगाडीच्या माध्यमातून लोकांना पाणी पुरवठा करता येऊ शकतो. परिणामी, शासनाचा टँकरचा खर्चही वाचू शकतो.- कदम उघडे, सरपंच 

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईthaneठाणे