शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
2
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
3
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
4
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
5
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
6
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
7
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
8
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
9
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
10
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
11
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
12
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
13
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
14
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
15
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
16
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
17
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
18
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
19
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
20
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे

पाणीकपातीचे संकट गडद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2018 00:27 IST

एमआयडीसी, स्टेम यांनी १४ टक्के पाणीकपात लागू केल्यानंतर आता भातसावरून उचलण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्यातसुद्धा दरदिवशी १० टक्के कपात लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ठाणे : एमआयडीसी, स्टेम यांनी १४ टक्के पाणीकपात लागू केल्यानंतर आता भातसावरून उचलण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्यातसुद्धा दरदिवशी १० टक्के कपात लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे ठाणे शहराची पाणीकपात वाढणार आहे. मात्र, यावर उपाय म्हणून महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने लघुपाटबंधारे विभागाला पत्र लिहून दरदिवशी ही कपात करण्याऐवजी आठवड्यातून एकदाच २४ तासांचे शटडाउन करू,असे कळवले आहे. त्यानुसार, या विभागाने महापालिकेची ही मागणी तूर्तास मान्य केली आहे. त्यामुळे मध्यवर्ती ठाण्यातील नागरिकांना रोजच्या रोज पाणीकपातीचा सामना करावा लागणार नसून आठवड्यातून एकदा २४ तासांच्या कपातीचा सामना करावा लागणार आहे.ठाणे शहराला ४८० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा हा विविध स्रोतांच्या माध्यमातून केला जात आहे. त्यानुसार, एमआयडीसीकडून होणाºया पाणीपुरवठ्यात १४ टक्के कपात करण्यात आली आहे. यामुळे कळवा, मुंब्रा आणि दिवा भागांत आठवड्यातून एकदा म्हणजेच गुरुवारी रात्री ९ ते शुक्रवारी रात्री ९ वाजेपर्यंत पाणीकपात केली जात होती. तर, स्टेमकडून होणाºया पाणीपुरवठ्यातही १४ टक्के कपात केल्याने महापालिकेने याचेसुद्धा नियोजन दोन टप्प्यांत केले होते. त्यानुसार, शहरातील अर्ध्या भागाला १२ तास आणि उर्वरित भागाला १२ तास असे पाणीकपातीचे नियोजन केले होते.आता भातसानेसुद्धा रोज १० टक्के पाणीकपात करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्या आशयाचे पत्र पालिकेला प्राप्त झाले आहे. त्यामुळे मध्यवर्ती आणि उर्वरित ठाण्याला याचा फटका बसणार असल्याचे चित्र निर्माण झाले होते. महापालिका सध्या भातसावरून २०० दशलक्ष लीटर पाणी उचलत आहे. त्यामुळे रोज १० टक्के याप्रमाणे ठाणेकरांना २० दशलक्ष लीटर कमी पाणी मिळणार होते. भातसाने घेतलेल्या या निर्णयामुळे ठाणेकरांना रोज पाणीकपातीचा सामना करावा लागणार होता. त्यामुळे अनेक भागांना तिचा तीव्र सामना करावा लागण्याची शक्यताही होती. मात्र, पालिकेने यासंदर्भात लघुपाटबंधारे विभागाला पत्र लिहिले आहे.मंगळवारी यासंदर्भात पालिका आणि विभागाच्या अधिकाºयांमध्ये चर्चा झाली आहे. त्यानुसार रोजच्या रोज १० टक्के पाणीकपात न करता आठवड्यातून एकदा २४ तासांची कपात घेऊ, असे पालिकेने संबंधित विभागाला सांगितले आहे. त्यामुळे ठाणेकरांचे हाल कमी होणार असून आठवड्यातून एकदाच २४ तासांची कपात केली जाणार आहे. याशिवाय, २४ तासांची ही कपात करताना दुसरीकडे सध्या होणाºया २०० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा हा १० दशलक्ष लीटरने वाढवून मिळावा, अशी मागणीही केली आहे. त्यामुळे सहा दिवस ठाणेकरांना थोडा का होईना जास्तीचा पाणीपुरवठा होणार आहे. पालिकेने उचललेल्या या पावलामुळे पाणीटंचाईचे चटके कमी प्रमाणात सहन करावे लागणार आहे.>येथे नसणार आठवड्यातून २४ तास पाणीठाणे महापालिकेच्या स्वत:च्या पाणीपुरवठा योजनेतून ठाणे शहरात टप्प्याटप्प्याने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. यामध्ये बुधवारी सकाळी ९ पासून रात्री ९ पर्यंत शहरातील घोडबंदर रोड, पातलीपाडा, पवारनगर, कोठारी कम्पाउंड, आझादनगर, डोंगरीपाडा, वाघबीळ, गांधीनगर आदी परिसराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच समतानगर, ऋतुपार्क, सिद्धेश्वर, जेल, साकेत, उथळसर, रेतीबंदर, मुंब्रा-कोळीवाडा, शैलेशनगर, संजयनगर या परिसराचा पाणीपुरवठा बुधवारी रात्री ९ वाजल्यापासून गुरुवारी सकाळी ९ वाजेपर्यंत बंद राहणार होता. परंतु, आता पालिकेने घेतलेल्या निर्णयामुळे या दोनही भागांचा पाणीपुरवठा यापुढे बुधवारी सकाळी ९ ते गुरुवारी सकाळी ९ असा सलग २४ तास बंद राहणार आहे.>एमआयडीसीकडून होणाºया पाणीपुरवठ्यातही १४ टक्के कपात लागू करण्यात आल्याने गुरुवारी रात्री ९ ते शुक्रवारी रात्री ९ या कालावधीत २४ तास पुरवठा बंद ठेवण्यात येत आहे. या कालावधीत कळव्याचा काही भाग, विटावा, मुंब्रा कौसा, डायघर, देसाई इंदिरानगर, रूपादेवीपाडा, वागळे, फायर ब्रिगेड, बाळकुमपाडा क्र .१ आदी भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.