शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
4
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
5
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
6
सुशांत सिंह राजपूतच्या जीवाला होता धोका? बहिणीने केला मोठा खुलासा
7
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
8
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
9
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
10
"शिंदे सरकारच त्यांचा माज उतरवेल", मराठी सिनेमांना प्राइम शो न देणाऱ्या मल्टिप्लेक्सबाबत प्रसाद ओकचं मोठं वक्तव्य
11
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
12
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
13
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
14
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
15
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
16
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
17
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
18
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
19
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
20
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं

भाजपा नगरसेविकेच्या डोळ्यांत आले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 5:33 AM

विकासकामासाठी तीन वर्षे पाठपुरावा : आयुक्तांकडे मागितली दाद

कल्याण : पश्चिमेतील बेतूरकरपाडा प्रभागाच्या भाजपाच्या नगरसेविका वैशाली पाटील यांच्या प्रभागातील एका विकासकामाची फाइल मंजुरीसाठी स्थायी समितीकडे पाठवली जाणार आहे. विकासकाम मार्गी लागावे, यासाठी पाटील तीन वर्षांपासून पाठपुरावा करत आहेत. ती फाइल महापालिकेच्या अनेक टेबलांवर फिरते. मात्र, कामास मंजुरी मिळत नसल्याने त्यांनी गुरुवारी थेट आयुक्तांचे दालन गाठले. यावेळी पाटील यांच्या डोळ्यांत पाणी आले. त्यास पाटील यांनीही दुजोरा दिला आहे.

पाटील यांच्या प्रभागात एक कोटी ३० लाख रुपये खर्चाचे काम प्रस्तावित आहे. त्याकरिता, ५० लाखांच्या खर्चाची पहिल्या टप्प्यातील फाइल तयार करण्यात आली. उर्वरित निधीची तरतूद येत्या अर्थसंकल्पात करण्यास पाटील यांनी अनुमती दर्शवली आहे. त्यानुसार, त्यांच्या कामाची फाइल तयार असून ती अंतिम मंजुरीसाठी स्थायी समितीसमोर ठेवली जाणार आहे. मात्र, फाइलवर प्रशासनाने काही शेरा मारला असल्याने ती थांबवली आहे. या प्रकाराचा जाब विचारण्यासाठी पाटील यांनी थेट आयुक्तांचे दालन गाठले. सर्व कागदपत्रांची पूर्तता करूनही काम थांबवण्याचा शेरा मारण्याचे कारण काय, असा सवाल करताना पाटील यांच्या डोळ्यांत पाणी आले.एका नगरसेविकेला कामाचा पाठपुरावा करण्यासाठी महापालिकेत हेलपाटे मारावे लागत असल्याने त्या दु:खी झाल्या आहेत. पाटील यांनी महिला बालकल्याण समितीचे सभापतीपद भूषवले आहे. प्रशासनाकडून त्यांना अशी वागणूक दिली जात असेल, तर अन्य सदस्य आणि सर्वसामान्य नागरिकांचे काय, असा सवाल केला जात आहे.

यापूर्वी तत्कालीन आयुक्त पी. वेलरासू यांच्या कारकिर्दीत विकासकामे होत नसल्याने शिवसेनेच्या सदस्यांनी त्यांच्या दालनातील टेबलाला त्यांची खुर्ची उचलून आपटली होती. कामे केली जात नसल्याने शिवसेनेने त्यावेळी नाराजी व्यक्त केली होती. या आंदोलनात भाजपाचे सदस्य सहभागी झाले नव्हते. महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट असल्याने त्यावेळी विकासकामांच्या खर्चाला कात्री लावून आर्थिक स्थितीचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्यात आला होता. वेलरासू यांच्यानंतर आयुक्त बोडके यांनी पदभार स्वीकारला. त्यालाही आता १० महिने झाले आहेत. अजूनही प्रत्यक्षात नगरसेवकांची कामे होत नसल्याने आर्थिक स्थिती ‘जैसे थे’ आहे असेच म्हणावे लागेल.प्रशासनावर वचक ठेवण्यात सत्ताधारी अपयशीकेडीएमसीतील सत्ताधारी भाजपा व शिवसेनेच्या सदस्यांची कामे होत नसल्याची बाब यापूर्वीही उघड झाली होती. आताही पाटील यांच्या या घटनेवरून हीच बाब उघड झाली आहे. त्यामुळे पक्षाच्या श्रेष्ठींनी यात लक्ष देण्याची गरज आहे, अशी अपेक्षा सदस्यांनी व्यक्त केली आहे. सत्ताधारी पक्षाचा प्रशासनावर वचक नसल्याचे यातून स्पष्ट होत आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाthaneठाणेBJPभाजपा