शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

‘त्या’ १४ गावांचा पाणीप्रश्न पेटला, राष्ट्रवादीचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 05:42 IST

राष्ट्रवादीचे आंदोलन : जुना मुंबई-पुणे महामार्ग रोखला; प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा निषेध

डोंबिवली : कल्याण तालुक्यातील १४ गावांमध्ये पाणीप्रश्न बिकट असून त्याकडे प्रशासन आणि सत्ताधारी दुर्लक्ष करत असल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसने सोमवारी शीळफाट्याजवळील दहिसर गावात आंदोलन करत जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर रास्ता रोको केला.

कल्याण तालुक्याच्या सीमेवर असलेली १४ गावे नवी मुंबई महापालिकेतून वगळण्यात आली आहेत. या गावांत साधे पिण्याचे पाणीही पोहोचू शकलेले नाही. सत्ताधारी भाजपा-शिवसेना आणि प्रशासनाचे हे सपशेल अपयश आहे. त्यामुळे त्याच्या निषेधार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्याण दौऱ्याच्या आदल्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबई-पुणे जुना राष्ट्रीय महामार्ग रोखल्याचे पक्षाचे नेते वंडार पाटील यांनी सांगितले. या आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्गावरील दोन्ही बाजूंकडील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. हा प्रश्न न सुटल्यास आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असा इशाराही देण्यात आला. यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष रमेश हनुमंते, बाबाजी पाटील, आदी उपस्थित होते. 

टॅग्स :thaneठाणेdombivaliडोंबिवलीWaterपाणीNCPराष्ट्रवादी काँग्रेस