शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

सायबर लॅब ठेवणार सोशल मीडियावर वॉच ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 02:24 IST

सोशल मीडियावर पोलीस यंत्रणेचे नेहमीच लक्ष असते. परंतु आधुनिक तंत्रज्ञानाचा वाढता वापर आणि सायबर गुन्ह्यांचे वाढते प्रमाण विचारात घेता सोशल मीडियावर २४ तास करडी नजर ठेवण्यासाठी अत्याधुनिक सायबर लॅब प्रस्तावित आहे, अशी माहिती सायबर सुरक्षा जनजागृती अभियानानिमित्त मंगळवारी पार पडलेल्या कार्यशाळेमध्ये देण्यात आली.

ठाणे : सोशल मीडियावर पोलीस यंत्रणेचे नेहमीच लक्ष असते. परंतु आधुनिक तंत्रज्ञानाचा वाढता वापर आणि सायबर गुन्ह्यांचे वाढते प्रमाण विचारात घेता सोशल मीडियावर २४ तास करडी नजर ठेवण्यासाठी अत्याधुनिक सायबर लॅब प्रस्तावित आहे, अशी माहिती सायबर सुरक्षा जनजागृती अभियानानिमित्त मंगळवारी पार पडलेल्या कार्यशाळेमध्ये देण्यात आली.‘ट्रान्सफॉर्मिंग महाराष्ट्र’ या नावाने सुरू असलेल्या सायबर सुरक्षा जनजागृती अभियानानिमित्त पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये आयोजित कार्यशाळेमध्ये सहपोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय, सायबर सेलचे पोलीस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे, कोकण विभागीय माहिती उपसंचालक डॉ. गणेश मुळे, सायबर गुन्ह्यांचे तज्ज्ञ वकील राजस पिंगळे, सायबर सेलचे पोलीस निरीक्षक एस.बी. सावंत आणि ज्येष्ठ पत्रकार संजय पितळे उपस्थित होते. डॉ. भाजीभाकरे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते अ‍ॅड. पिंगळे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून होणारे गुन्हे आणि त्याविषयी घ्यावयाची खबरदारी याबाबत विस्तृत माहिती दिली. कुठेही गेलो की, फेसबुकवर ‘चेक इन’ करण्याची नेटकरींना हौस असते. मात्र याद्वारे घरी नसल्याची आपण माहिती जगभराला देतो. चोरांना हे आयतेच निमंत्रण असल्याचे अ‍ॅड. पिंगळे यांनी सांगितले. कोणतेही अ‍ॅप मोबाईल फोनमध्ये डाऊनलोड करताना आपण आपली खासगी माहिती वापरण्याची परवानगी त्रयस्थाला देत असतो. याचा दुरूपयोग होऊ शकतो, याची जाणीव प्रत्येकाने ठेवणे गरजेचे आहे. व्हॉटस्अ‍ॅपचे वेगवेगळे ग्रुप प्रत्येकाच्या मोबाईल फोनमध्ये असतात. या ग्रुपमधील सर्वच सदस्यांना आपण ओळखत नसतो. त्यामुळे कोणतीही पोस्ट ग्रुपमध्ये पाठवताना, ती कुणाचीही व्यक्तिगत किंवा जाती-धर्माची बदनामी करणारी तर नाही, याचा दहावेळा विचार करावा. अशा प्रकारची चूक फौजदारी कारवाईसाठी पुरेशी ठरू शकते. वधु-वर सुचक संकेतस्थळांच्या माध्यमातून फसवणुकीचे प्रकारही अलीकडच्या वाढले आहेत. त्यामुळे या संकेतस्थळांवर नोंदणी करण्यासाठी कोणती माहिती घेतली जावी, याबाबत सुधारित दिशानिर्देश तयार केले जात असल्याचे अ‍ॅड. पिंगळे यांनी सांगितले. यावेळी उपस्थितांनी विचारलेल्या सर्व शंकांचे डॉ. भाजीभाकरे आणि अ‍ॅड. पिंगळे यांनी निरसन केले.जागरूकता हाच उत्तम उपाय-सायबर गुन्ह्यांचे प्रकार वेगवेगळे आहेत. लोकांच्या अज्ञानाचा आणि गाफिलीचा ते पुरेपूर गैरफायदा घेतात. सुशिक्षित लोकांची फसवणूक झाल्याचे प्रकारही अनेकदा घडतात.हे प्रकार रोखण्यासाठी सायबर सेलमार्फत प्रयत्न सुरू असले तरी सोशल मीडियाचा वापर करताना नागरिकांनी जागरूकता बाळगल्यास हे प्रमाण बºयापैकी कमी होण्यास मदत होईल, असे पोलीस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनीयावेळी सांगितले.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाCrimeगुन्हाthaneठाणेPoliceपोलिस