शहरं
Join us  
Trending Stories
1
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
2
६ लाखांत झेडपी, १० लाखांत मनपा लढवायची तरी कशी?; खर्चाची मर्यादा वाढवण्याची मागणी
3
"H-1B व्हिसा धोरण अन्यायकारक, भारतीय-अमेरिकननी विरोध करावा", शशी थरूरांचे आवाहन
4
चढायला गेले एस्केलेटर बंद पडला, बोलायला गेले टेलीप्रॉम्प्टर बिघडला; UNमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत काय काय घडलं?
5
संतापजनक अन् ह्रदयद्रावक! आधी दगड कोंबला, फेविक्विकने चिटकवले तोंड; १५ दिवसांचं बाळ फेकले जंगलात
6
आजचे राशीभविष्य- २४ सप्टेंबर २०२५, अविवाहितांचे विवाह ठरतील; नोकरी- व्यवसायात उत्पन्न वाढेल
7
ICC Suspends USA Cricket :आयसीसीनं अमेरिकेच्या क्रिकेट संघाला केलं निलंबित; जाणून घ्या कारण
8
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी देणार २,२१५ काेटी; राज्य सरकारने घेतला नुकसानीचा आढावा
9
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
10
६ कोटींच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ अन् गर्भपात; माहीम पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल
11
सरकारमान्य दरांना ठेंगा! ओला, उबरकडून मनमानी; RTO लायसन्स रद्द करण्याचा इशारा हवेतच
12
नवी मुंबईतून डिसेंबरपासून देश-विदेशसाठी करा उड्डाण; नव्या विमानतळाची ९ कोटी प्रवासी क्षमता
13
कोकणात जाणारी रो-रो सेवा ऑक्टोबरपासून; साडे पाच तासांत सिंधुदुर्ग गाठता येणार, दर किती? पाहा
14
...अन्यथा नगरपरिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांवर कारवाई; कुळगाव बदलापूरप्रकरणी उच्च न्यायालयाचा इशारा
15
कुजबुज! जनता रस्त्यावर उतरताच मतावर डोळा ठेवून ठाण्यातील सर्वपक्षीय नेत्यांना जागा आली का?
16
हॉटेलमध्ये रंगला हत्येचा थरार! प्रियकरानं आधी प्रेयसीला संपवले, त्यानंतर स्वत:चाही घेतला जीव
17
‘लजावल इश्क’वरून पाकिस्तानात गदारोळ; यूझर्सनी हा शो ‘बायकॉट’ करण्याचं केलं आवाहन
18
दिल्लीत नवा आदेश! ‘दरवाजे उघडा, डोळे बंद ठेवा’; नोकरशाहीच्या वर्तुळाला थंडीत घाम फुटण्याची वेळ
19
व्हिसाचे संकट, संधीचा व्हिसा! भारत जगात नवे स्थान निर्माण करू शकतो, जर...
20
भारतीय विद्यार्थ्यांच्या अमेरिकन ड्रीमची नौका बुडणार की काय?

सायबर लॅब ठेवणार सोशल मीडियावर वॉच ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 02:24 IST

सोशल मीडियावर पोलीस यंत्रणेचे नेहमीच लक्ष असते. परंतु आधुनिक तंत्रज्ञानाचा वाढता वापर आणि सायबर गुन्ह्यांचे वाढते प्रमाण विचारात घेता सोशल मीडियावर २४ तास करडी नजर ठेवण्यासाठी अत्याधुनिक सायबर लॅब प्रस्तावित आहे, अशी माहिती सायबर सुरक्षा जनजागृती अभियानानिमित्त मंगळवारी पार पडलेल्या कार्यशाळेमध्ये देण्यात आली.

ठाणे : सोशल मीडियावर पोलीस यंत्रणेचे नेहमीच लक्ष असते. परंतु आधुनिक तंत्रज्ञानाचा वाढता वापर आणि सायबर गुन्ह्यांचे वाढते प्रमाण विचारात घेता सोशल मीडियावर २४ तास करडी नजर ठेवण्यासाठी अत्याधुनिक सायबर लॅब प्रस्तावित आहे, अशी माहिती सायबर सुरक्षा जनजागृती अभियानानिमित्त मंगळवारी पार पडलेल्या कार्यशाळेमध्ये देण्यात आली.‘ट्रान्सफॉर्मिंग महाराष्ट्र’ या नावाने सुरू असलेल्या सायबर सुरक्षा जनजागृती अभियानानिमित्त पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये आयोजित कार्यशाळेमध्ये सहपोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय, सायबर सेलचे पोलीस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे, कोकण विभागीय माहिती उपसंचालक डॉ. गणेश मुळे, सायबर गुन्ह्यांचे तज्ज्ञ वकील राजस पिंगळे, सायबर सेलचे पोलीस निरीक्षक एस.बी. सावंत आणि ज्येष्ठ पत्रकार संजय पितळे उपस्थित होते. डॉ. भाजीभाकरे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते अ‍ॅड. पिंगळे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून होणारे गुन्हे आणि त्याविषयी घ्यावयाची खबरदारी याबाबत विस्तृत माहिती दिली. कुठेही गेलो की, फेसबुकवर ‘चेक इन’ करण्याची नेटकरींना हौस असते. मात्र याद्वारे घरी नसल्याची आपण माहिती जगभराला देतो. चोरांना हे आयतेच निमंत्रण असल्याचे अ‍ॅड. पिंगळे यांनी सांगितले. कोणतेही अ‍ॅप मोबाईल फोनमध्ये डाऊनलोड करताना आपण आपली खासगी माहिती वापरण्याची परवानगी त्रयस्थाला देत असतो. याचा दुरूपयोग होऊ शकतो, याची जाणीव प्रत्येकाने ठेवणे गरजेचे आहे. व्हॉटस्अ‍ॅपचे वेगवेगळे ग्रुप प्रत्येकाच्या मोबाईल फोनमध्ये असतात. या ग्रुपमधील सर्वच सदस्यांना आपण ओळखत नसतो. त्यामुळे कोणतीही पोस्ट ग्रुपमध्ये पाठवताना, ती कुणाचीही व्यक्तिगत किंवा जाती-धर्माची बदनामी करणारी तर नाही, याचा दहावेळा विचार करावा. अशा प्रकारची चूक फौजदारी कारवाईसाठी पुरेशी ठरू शकते. वधु-वर सुचक संकेतस्थळांच्या माध्यमातून फसवणुकीचे प्रकारही अलीकडच्या वाढले आहेत. त्यामुळे या संकेतस्थळांवर नोंदणी करण्यासाठी कोणती माहिती घेतली जावी, याबाबत सुधारित दिशानिर्देश तयार केले जात असल्याचे अ‍ॅड. पिंगळे यांनी सांगितले. यावेळी उपस्थितांनी विचारलेल्या सर्व शंकांचे डॉ. भाजीभाकरे आणि अ‍ॅड. पिंगळे यांनी निरसन केले.जागरूकता हाच उत्तम उपाय-सायबर गुन्ह्यांचे प्रकार वेगवेगळे आहेत. लोकांच्या अज्ञानाचा आणि गाफिलीचा ते पुरेपूर गैरफायदा घेतात. सुशिक्षित लोकांची फसवणूक झाल्याचे प्रकारही अनेकदा घडतात.हे प्रकार रोखण्यासाठी सायबर सेलमार्फत प्रयत्न सुरू असले तरी सोशल मीडियाचा वापर करताना नागरिकांनी जागरूकता बाळगल्यास हे प्रमाण बºयापैकी कमी होण्यास मदत होईल, असे पोलीस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनीयावेळी सांगितले.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाCrimeगुन्हाthaneठाणेPoliceपोलिस