शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

सायबर लॅब ठेवणार सोशल मीडियावर वॉच ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 02:24 IST

सोशल मीडियावर पोलीस यंत्रणेचे नेहमीच लक्ष असते. परंतु आधुनिक तंत्रज्ञानाचा वाढता वापर आणि सायबर गुन्ह्यांचे वाढते प्रमाण विचारात घेता सोशल मीडियावर २४ तास करडी नजर ठेवण्यासाठी अत्याधुनिक सायबर लॅब प्रस्तावित आहे, अशी माहिती सायबर सुरक्षा जनजागृती अभियानानिमित्त मंगळवारी पार पडलेल्या कार्यशाळेमध्ये देण्यात आली.

ठाणे : सोशल मीडियावर पोलीस यंत्रणेचे नेहमीच लक्ष असते. परंतु आधुनिक तंत्रज्ञानाचा वाढता वापर आणि सायबर गुन्ह्यांचे वाढते प्रमाण विचारात घेता सोशल मीडियावर २४ तास करडी नजर ठेवण्यासाठी अत्याधुनिक सायबर लॅब प्रस्तावित आहे, अशी माहिती सायबर सुरक्षा जनजागृती अभियानानिमित्त मंगळवारी पार पडलेल्या कार्यशाळेमध्ये देण्यात आली.‘ट्रान्सफॉर्मिंग महाराष्ट्र’ या नावाने सुरू असलेल्या सायबर सुरक्षा जनजागृती अभियानानिमित्त पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये आयोजित कार्यशाळेमध्ये सहपोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय, सायबर सेलचे पोलीस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे, कोकण विभागीय माहिती उपसंचालक डॉ. गणेश मुळे, सायबर गुन्ह्यांचे तज्ज्ञ वकील राजस पिंगळे, सायबर सेलचे पोलीस निरीक्षक एस.बी. सावंत आणि ज्येष्ठ पत्रकार संजय पितळे उपस्थित होते. डॉ. भाजीभाकरे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते अ‍ॅड. पिंगळे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून होणारे गुन्हे आणि त्याविषयी घ्यावयाची खबरदारी याबाबत विस्तृत माहिती दिली. कुठेही गेलो की, फेसबुकवर ‘चेक इन’ करण्याची नेटकरींना हौस असते. मात्र याद्वारे घरी नसल्याची आपण माहिती जगभराला देतो. चोरांना हे आयतेच निमंत्रण असल्याचे अ‍ॅड. पिंगळे यांनी सांगितले. कोणतेही अ‍ॅप मोबाईल फोनमध्ये डाऊनलोड करताना आपण आपली खासगी माहिती वापरण्याची परवानगी त्रयस्थाला देत असतो. याचा दुरूपयोग होऊ शकतो, याची जाणीव प्रत्येकाने ठेवणे गरजेचे आहे. व्हॉटस्अ‍ॅपचे वेगवेगळे ग्रुप प्रत्येकाच्या मोबाईल फोनमध्ये असतात. या ग्रुपमधील सर्वच सदस्यांना आपण ओळखत नसतो. त्यामुळे कोणतीही पोस्ट ग्रुपमध्ये पाठवताना, ती कुणाचीही व्यक्तिगत किंवा जाती-धर्माची बदनामी करणारी तर नाही, याचा दहावेळा विचार करावा. अशा प्रकारची चूक फौजदारी कारवाईसाठी पुरेशी ठरू शकते. वधु-वर सुचक संकेतस्थळांच्या माध्यमातून फसवणुकीचे प्रकारही अलीकडच्या वाढले आहेत. त्यामुळे या संकेतस्थळांवर नोंदणी करण्यासाठी कोणती माहिती घेतली जावी, याबाबत सुधारित दिशानिर्देश तयार केले जात असल्याचे अ‍ॅड. पिंगळे यांनी सांगितले. यावेळी उपस्थितांनी विचारलेल्या सर्व शंकांचे डॉ. भाजीभाकरे आणि अ‍ॅड. पिंगळे यांनी निरसन केले.जागरूकता हाच उत्तम उपाय-सायबर गुन्ह्यांचे प्रकार वेगवेगळे आहेत. लोकांच्या अज्ञानाचा आणि गाफिलीचा ते पुरेपूर गैरफायदा घेतात. सुशिक्षित लोकांची फसवणूक झाल्याचे प्रकारही अनेकदा घडतात.हे प्रकार रोखण्यासाठी सायबर सेलमार्फत प्रयत्न सुरू असले तरी सोशल मीडियाचा वापर करताना नागरिकांनी जागरूकता बाळगल्यास हे प्रमाण बºयापैकी कमी होण्यास मदत होईल, असे पोलीस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनीयावेळी सांगितले.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाCrimeगुन्हाthaneठाणेPoliceपोलिस