शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
2
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
3
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
4
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
5
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
6
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
7
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
8
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
9
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
10
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
11
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
12
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
13
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
14
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
15
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
16
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
17
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
18
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
19
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
20
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."

कल्याण पालिकेचेच कचरा फेको आंदोलन

By admin | Updated: March 22, 2017 01:33 IST

मोहनेतील बंद असलेल्या एनआरसी कंपनीने ५५ कोटींचा मालमत्ता कर थकवल्याने त्यांना धडा शिकवण्यासाठी कंपनीच्या

कल्याण : मोहनेतील बंद असलेल्या एनआरसी कंपनीने ५५ कोटींचा मालमत्ता कर थकवल्याने त्यांना धडा शिकवण्यासाठी कंपनीच्या आवारात दहा गाड्या भरून कचरा फेकण्याचे ‘आंदोलन’ कल्याण-डोंबिवली महापालिकेने केले. त्यातून कंपनी व्यवस्थापनाला धडा शिकवणे राहिले दूर, उलट आपल्या आवारात डम्पिंग ग्राऊंड होते आहे, या समजातून नागरिकांनी तीव्र विरोध करत चार कचरा गाड्यांची तोडफोड केली. शेवटी हा प्रकार मिटविण्यासाठी पोलिसांना घटनास्थळी धाव घ्यावी लागली. यापढेही कर थकवणाऱ्यांच्या दारी कचरा टाकून त्यांना ‘समज’ दिली जाईल, अशा इशारा पालिकेने दिला आहे, तर करवसुलीची ही पद्धतच चुकीची असल्याची टीका लोकप्रतिनिधींनी केली आहे. महापालिकेचा २६२ कोटींचा मालमत्ता कर थकला आहे. तो येत्या दहा दिवसांत वसूल करण्याचे लक्ष्य आयुक्त ई. रवींद्रन यांनी ठेवले आहे. त्यासाठी त्यांनी महापालिकेच्या प्रत्येक प्रभाग कार्यालयाची झाडाझडती सुरु केली आहे. करवसूली कमी करणाऱ्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना निलंबित करणे, ‘कारणे दाखवा’ नोटिसा बजावण्याची कारवाई सुरू आहे. एका रुग्णालयाला, वाधवा हॉलला आणि वाहनतळाला सीलही ठोकण्यात आले आहे. एनआरसी कंपनी पालिकेच्या हद्दीत आहे. ती ९ नोव्हेंबर २००९ पासून बंद आहे. तिने कामगारांची देणी दिलेली नाही. देणी आणि जागाविक्रीचा वाद न्यायालयात आहे. कंपनी प्रशासनाने ५५ कोटींचा मालमत्ता कर भरलेला नाही. त्याच्या वसुलीसाठी पालिका प्रशासनाने कंपनी व्यवस्थापनाला वारंवार नोटिसा बजावून थकबाकी भरण्याची मागणी केली. पण या नोटिसांना प्रतिसाद मिळत नसल्याने मंगळवारी आयुक्तांनी ‘कंपनीच्या आवारात जाऊन कचरा टाका,’ असा आदेश दिला. महापालिकेच्या कचऱ्याने भरलेल्या दहा मोठ्या आणि चार लहान गाड्या कंपनीजवळ गेल्या. त्या पाहिल्यावर कंपनीच्या जागी डम्पिंगचा पालिकेचा डाव असल्याचा समज नागरिकांचा झाला आणि त्यांनी कचरा टाकण्यास विरोध केला आणि संतप्त नागरिकांनी चार कचरा गाड्यांची तोडफोड केली. एका कचरा गाडीचालकास मारहाण केली. त्यामुळे पालिकेचे अधिकारी सुनील पाटील यांनी पोलिसांना बोलावले. पोलिसांनी मध्यस्थी करुन नागरिकांना शांत केले आणि नेमका काय प्रकार आहे, याची माहिती दिली. तेव्हा नागरिकांचा राग शांत झाला. महापालिकेने कंपनीच्या गेटचे कुलूप तोडून आत दहा कचरागाड्या नेल्या. तेथे अधिकाऱ्यांसाठी असलेल्या कार पार्किंगच्या जागेवर कचरा ओतून पालिकेचे अधिकारी परतले. मालमत्ता कर थकविणाऱ्यांच्या जागेवर यापुढे अशाच प्रकारची कारवाई केली जाईल, असा इशारा पालिकेने या कृतीतून दिला आणि कारवाईपासून वाचण्यासाठी थकबाकीदारांनी लवकरात लवकर कर भरावा, असे स्पष्ट केले. (प्रतिनिधी)