शहरं
Join us  
Trending Stories
1
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
5
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
6
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
7
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
8
KL Sharma : स्मृती इराणींच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसने उतरवलेले केएल शर्मा कोण आहेत?
9
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
10
RBI ने निर्बंध हटवले; Bajaj Finance च्या शेअर्समध्ये मोठी तेजी, ब्रोकरेजचा विश्वास वाढला
11
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
12
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
13
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
14
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
15
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
16
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
17
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
18
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
19
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
20
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!

पादचारी पुलामुळे अपघाताला आळा, तुर्भेत रविवारी लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 3:02 AM

तुर्भेत रविवारी लोकार्पण : सहा कोटी ८४ लाख रुपये खर्च

नवी मुंबई : तुर्भे येथील रेल्वे रुळावर बांधण्यात आलेल्या पादचारी पुलाचे रविवारी लोकार्पण करण्यात आले. पालिकेच्या निधीतून रेल्वेप्रशासनाने हा पूल बांधला असून, त्यासाठी सहा कोटी ८४ लाख रुपये खर्च आला आहे. यामुळे त्या ठिकाणी पादचाऱ्यांकडून रूळ ओलांडण्याच्या होत असलेल्या प्रयत्नात होणारे अपघात थांबणार आहेत.

ट्रान्सहार्बर रेल्वेमार्ग व ठाणे-बेलापूर मार्ग झाल्यापासून जनता मार्केट व तुर्भे नाका परिसर विभागला गेला आहे. या दोन्ही विभागाला जोडण्यासाठी पादचारी पूल नसल्याने नागरिकांकडून रस्ता तसेच रूळ ओलांडला जात होता. यामुळे त्या ठिकाणी पादचाऱ्यांच्या अपघाताच्या घटना सातत्याने घडत होत्या. त्यावर पर्याय म्हणून पालिकेने ठाणे-बेलापूर मार्गावर पादचारी पूल उभारून रस्ता ओलांडणाºया प्रवाशांची गैरसोय दूर केली होती; परंतु रेल्वेरुळावर पूल नसल्याने त्या ठिकाणी नागरिकांचा मृत्यूच्या दाढेखालून प्रवास सुरूच होता.

ठाणे-बेलापूर मार्गावरील पादचारी पूल वाढवून तो रेल्वेरुळावरून जनता मार्केटला जोडावा, अशी नागरिकांची मागणी होती. त्यासाठी दहा वर्षांपूर्वी तत्कालीन नगरसेविका बेबी पाटील यांनी रेल्वे प्रशासनासह पालिकेकडे पाठपुरावा केला होता. त्यानंतर विद्यमान स्थानिक नगरसेविका शशिकला पाटील, शुभांगी पाटील यांनीही सदर मागणीवर जोर दिला होता. त्यानुसार खासदार राजन विचारे यांनीही रेल्वे प्रशासनाला तिथल्या परिस्थितीची जाणीव करून दिली होती; परंतु केवळ रेल्वे प्रवाशांसाठीच पादचारी पूल अथवा भुयारीमार्ग बांधण्याचे रेल्वे प्रशासनाचे धोरण असल्याने त्याकडे दुर्लक्ष होत होते, यामुळे त्या ठिकाणी नागरिकांना नाईलाजास्तव रेल्वेरूळ ओलांडावा लागत होता. याकरिता त्या ठिकाणी बांधण्यात आलेल्या भिंतीलाही भगदाड पाडण्यात आलेले आहे. अखेर पादचारी पुलासाठी लागणारा खर्च देण्याची पालिकेने तयारी दर्शवल्यानंतर रेल्वे प्रशासनाने हा पूल बांधण्यासाठी पुढाकार घेतला. तर आमदार संदीप नाईक यांनीही अधिवेशनात लक्ष्यवेधी मांडून त्या ठिकाणी पादचारी पूल आवश्यक असल्याची बाब मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली होती.जुलै २०१७ मध्ये पालिकेने रेल्वे प्रशासनाला सहा कोटी ८४ लाख रुपयांच्या निधी दिल्यानंतर निविदा प्रक्रिया पूर्ण करून रेल्वेने पूलाच्या कामाला सुरुवात केली. त्यातही अनेक अडथळे आल्यानंतर अखेर रविवारी त्याचे उद्घाटन महापौर जयवंत सुतार यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी खासदार राजन विचारे, आमदार संदीप नाईक, विरोधी पक्षनेते विजय चौगुले, उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे, स्थायी समिती सभापती नवीन गवते, प्रभाग समिती अध्यक्षा उषा भोईर, स्थानिक नगरसेविका शशिकला पाटील, नगरसेविका शुभांगी पाटील, पूजा मेढकर, शिवसेना पक्षप्रतोद द्वारकानाथ भोईर, नगरसेवक मनोहर मढवी, निशांत पाटील आदी उपस्थित होते.पालिकेने हटवले झेंडेपुलाच्या कामाच्या श्रेयवादात सुरू असलेल्या चढाओढीतून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण पुलावर शिवसेनेचे झेंडे लावले होते. यावरून परिसरात तणाव निर्माण झाला असता एपीएमसी पोलिसांनी परिसरात बंदोबस्त लावला होता. त्यानंतर पालिकेने सदर झेंडे हटवल्यानंतर पोलिसांच्या चोख बंदोबस्तामध्येच पुलाचे उद्घाटन उरकण्यात आले.खासदारांची उद्घाटनाची वेळ साधलीऐरोली येथील पालिकेच्या वास्तूच्या उद्घाटनावेळी शिवसेना व राष्टÑवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली होती. खासदार राजन विचारे यांना कार्यक्रमस्थळी पोहोचण्यास विलंब झाल्याने राष्टÑवादीने उद्घाटन उरकल्याने हा प्रकार घडला होता.तुर्भेतील पादचारी पुलाच्या उद्घाटनापूर्वीही श्रेयवादातून राष्टÑवादी विरुद्ध शिवसेना असे वातावरण रंगले होते. त्यामुळे या कार्यक्रमास खासदार विचारे वेळेवर पोहोचतील का? याकडे उपस्थितांचे लक्ष लागले होते.तर नियोजित वेळेनुसार महापौरांच्या हस्ते पुलाचे उद्घाटन करण्याच्या तयारीत प्रशासन व सत्ताधारी होते. नेमके त्याच वेळी वाहतूककोंडीत अडकलेली गाडी सोडून खासदार विचारे यांनी पायी चालत येऊन उद्घाटनाची वेळ साधली.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईMember of parliamentखासदार