शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
2
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
3
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
4
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
5
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
6
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
7
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
8
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
9
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
10
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
11
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
12
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
13
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
14
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
15
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
16
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
17
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
18
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 
19
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
20
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा ५० हजारांनी स्वस्त, कॅमेरा क्वालिटीत कुठलंही कॉम्प्रमाइज नाही!

भरपाईपोटी दोन कोटींची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 00:28 IST

चक्रीवादळामुळे ठाणे जिल्ह्यात नुकसान : पंचनामे पूर्ण, दीड ते दोनपट वाढ होण्याची शक्यता

सुरेश लोखंडे 

ठाणे : जनजीवन विस्कळीत करणाऱ्या निसर्ग चक्रीवादळामुळे गेल्या आठवड्यात जिल्ह्यातील घरांसह भाजीपाला, वीजपुरवठा, आरोग्य केंद्र, शाळा आदींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना, रहिवाशांना एक कोटी ८१ लाख ५९ हजार रुपयांच्या भरपाईसाठी शासनाच्या निकषांनुसार पंचनामे करण्यात आले. मात्र, त्यात दीड ते दोनपट वाढ होण्याचे संकेत असून, ही भरपाई दोन कोटी रुपयांपर्यंत मिळेल, अशी नागरिकांना आशा आहे.

चक्रीवादळाचा फटका अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत ठाणे जिल्ह्याला जास्त बसला. या वादळामुळे १६२ घरांचे अंशत: नुकसान, तर ३0७ झाडे, १५0 विजेचे खांब पडले. कल्याणला तीन बकºया विजेच्या धक्कयाने मृत्युमुखी पडल्याचा प्राथमिक अंदाज पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यावेळी व्यक्त केला होता. त्यावेळी त्यांनी भरपाई देण्याचे आदेशही जारी केले. १३ मे २0१५ रोजीच्या शासन आदेशानुसार जिल्ह्यातील नुकसानीचे पंचनामे करून तब्बल एक कोटी ८१ लाख ५९ हजार रुपयांचा भरपाईचा अहवाल जिल्हा प्रशासनाने सरकारकडे पाठवला आहे. मात्र, त्यात दीड ते दोनपट वाढ होण्याच्या चर्चेमुळे नुकसानग्रस्तांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.जिल्ह्यातील अन्य तालुक्यांच्या तुलनेत ठाणे परिसरातील सर्वाधिक एक कोटी चार लाख ३५ हजारांवरच्या नुकसानभरपाईचा अहवाल दिला आहे. यामध्ये सर्वाधिक एक कोटी तीन लाख ७0 हजार वीजपुरवठ्यासंबंधीच्या नुकसानीचा समावेश आहे. घरांचे नुकसान ६0 हजारांचे, तर शाळांच्या पाच हजारांच्या नुकसानीचा पंचनाम्यात समावेश आहे. या खालोखाल मुरबाड तालुक्यासाठी ३५ लाख ७५ हजार रुपयांच्या नुकसानभरपाईचा समावेश आहे.अंबरनाथ तालुक्यातील फळबागा, घरांचे नुकसानच्जिल्ह्यात तृतीय क्रमांकाचे १६ लाख ४४ हजार रुपयांचे नुकसान अंबरनाथ तालुक्यात झाले आहे. यात कोरडवाहू शेतीचे १४ हजार ७00 रुपये, बागायतीचे तीन लाख २२ हजारांचे आणि १६ हजारांच्या फळबागांचा समावेश आहे. याशिवाय, घरांचे सव्वाचार लाखांचे नुकसान झाले असून, शाळा आणि ग्रामपंचायतींचे सात लाख ६६ हजार आणि आरोग्य केंद्रांच्या अवघ्या एका लाखाच्या नुकसानीचा पंचनाम्यात समावेश आहे.च्भिवंडी तालुक्यात १0 लाख ४९ हजारांचे नुकसान झाल्याचे निश्चित करण्यात आले आहे. शाळा आणि ग्रामपंचायतींचे सात लाख २२ हजारांचे, आरोग्य केंद्रांचे सव्वादोन लाखांचे व घरांचे एक लाख रुपये किमतीचे नुकसान झाले आहे. शहापूरला सात लाखांच्या भरपाईचे पंचनामे निश्चित केले आहेत. यापैकी घरांचे चार लाख ३७ हजारांचे, तर ग्रामपंचायती, शाळासंबंधी दोन लाख ६३ हजारांच्या भरपाईचा समावेश आहे.च्कल्याण तालुक्यामधील सहा लाख ४७ हजारांच्या भरपाईवर शिक्कामोर्तब झाले आहे. यापैकी घरांचे एक लाख ६७ हजारांचे, शाळा, ग्रामपंचायतीशी संबंधित चार लाख ८० हजारांची भरपाई अपेक्षित आहे. उल्हासनगरला एक हजार लाख आठ हजारांच्या घरांच्या नुकसानीचा पंचनामा केला आहे.शासन निकषांनुसार नुकसान व भरपाईची रक्कमवीज यंत्रणा - १0,३७0,000/-शाळा / ग्रा.पं. - ४,४४,१000/-प्राथमिक आरोग्य केंद्र - ५,८0,000/-घरे - २४,१५,९00/-अंबरनाथमधील शेती - ३,५२,९00/-

टॅग्स :Farmerशेतकरीthaneठाणे