शहरं
Join us  
Trending Stories
1
Tejas Fighter Jet Crashed : भारताचे लढाऊ विमान तेजस कोसळले, दुबई एअर शो दरम्यान मोठी दुर्घटना; अपघात कॅमेऱ्यात कैद
2
मोठी बातमी! इस्रायलचे पंतप्रधान बेजामिन नेतान्याहून भारत दौऱ्यावर येणार, जुनी दोस्ती आणखी घट्ट होणार
3
ना थांबा, ना विश्रांती… गरुडाचा ६१०० किलोमीटर प्रवास थक्क करणारा; आशियातून आफ्रिकेत ६ दिवसांत पोहोचला
4
'माझ्याकडून हे SIR चे काम होणार नाही...' गुजरातमध्ये बीएलओ शिक्षकाने आयुष्य संपविले, देशातील आठवा...
5
BSNL ने किंमत न वाढवताही प्लॅन्स केले महाग; 'या' लोकप्रिय रिचार्ज प्लॅन्सची व्हॅलिडिटी घटवली!
6
टाटा-बजाजसह 'हे' शेअर्स आपटले; फक्त एकाच क्षेत्रात वाढ, गुंतवणूकदारांचे ₹४.३० लाख कोटी पाण्यात!
7
बर्फ, दलदल, वाळवंट अन् पाणी..; कुठेही चालण्यास सक्षम, भारतीय सैन्याला मिळणार BvS10 सिंधू आर्मर्ड व्हेईकल
8
Malegaon Dongrale: चिमुकलीवर अत्याचार, लोकांच्या संतापाचा कडेलोट; थेट न्यायालयात शिरण्याचा प्रयत्न, पोलिसांचा लाठीचार्ज
9
"तेव्हा कुणी आलं नाही, आता स्टंटबाजी करायला आले, पण मी मारहाण...", भाजपच्या माजी नगरसेवकांने सांगितलं काय घडलं?
10
सावधान! क्रोम युजर्सना मोठा धोका, गुगलने जारी केली सिक्योरिटी वार्निंग, वेळीच व्हा अलर्ट
11
VIDEO: क्रिकेटच्या पिचवर पडली विकेट! पलाशनं कायम 'स्मृती'त राहिल असं केलं हटके प्रपोज
12
कर्नाटक सरकारमध्ये बदल होणार! डीके शिवकुमार यांच्या समर्थकांच्या हालचाली वाढल्या, काही आमदार दिल्लीत तळ ठोकून
13
उपमुख्यमंत्रिपदाची मागणी का केली नाही? चिराग म्हणाले- मी लालची नाही; मिळाले त्यात समाधानी
14
करिश्मा कपूरनं मुंबईतील १ फ्लॅट भाड्याने दिला; दर महिन्याला किती होणार कमाई? वाचा
15
'नवीन भाडे करार २०२५' : अ‍ॅडव्हान्स म्हणून घेता येईल फक्त २ महिन्यांचे भाडे; घरमालक वाढवू शकणार नाही मनमानी पद्धतीनं भाडं
16
लुटेरी दुल्हन! वय २४ वर्षे अन् केली १५ लग्न; ५२ लाखांचा गंडा, नवऱ्याला सोडून जाते पळून अन्...
17
अरे बापरे सेम टू सेम! हुबेहुब आलिया भटसारखी दिसते ही मराठी अभिनेत्री, फोटो पाहून चक्रावून जाल
18
३ वर्षांचे प्रेमसंबंध आणि लग्न करायला नकार! रागाच्या भरात प्रियकर झाला मारेकरी; दोन वेळा गोळ्या झाडल्या पण... 
19
दिल्ली स्फोट प्रकरणी मोठा खुलासा! 'घरघंटी'च्या मदतीने बनवले होते बॉम्ब; साहित्य जप्त केले
20
IND vs SA 2nd Test: 'आमचं ठरलंय!' गिलच्या जागी कोण? कॅप्टन पंतनं उत्तर दिलं, पण...
Daily Top 2Weekly Top 5

भरपाईपोटी दोन कोटींची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 00:28 IST

चक्रीवादळामुळे ठाणे जिल्ह्यात नुकसान : पंचनामे पूर्ण, दीड ते दोनपट वाढ होण्याची शक्यता

सुरेश लोखंडे 

ठाणे : जनजीवन विस्कळीत करणाऱ्या निसर्ग चक्रीवादळामुळे गेल्या आठवड्यात जिल्ह्यातील घरांसह भाजीपाला, वीजपुरवठा, आरोग्य केंद्र, शाळा आदींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना, रहिवाशांना एक कोटी ८१ लाख ५९ हजार रुपयांच्या भरपाईसाठी शासनाच्या निकषांनुसार पंचनामे करण्यात आले. मात्र, त्यात दीड ते दोनपट वाढ होण्याचे संकेत असून, ही भरपाई दोन कोटी रुपयांपर्यंत मिळेल, अशी नागरिकांना आशा आहे.

चक्रीवादळाचा फटका अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत ठाणे जिल्ह्याला जास्त बसला. या वादळामुळे १६२ घरांचे अंशत: नुकसान, तर ३0७ झाडे, १५0 विजेचे खांब पडले. कल्याणला तीन बकºया विजेच्या धक्कयाने मृत्युमुखी पडल्याचा प्राथमिक अंदाज पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यावेळी व्यक्त केला होता. त्यावेळी त्यांनी भरपाई देण्याचे आदेशही जारी केले. १३ मे २0१५ रोजीच्या शासन आदेशानुसार जिल्ह्यातील नुकसानीचे पंचनामे करून तब्बल एक कोटी ८१ लाख ५९ हजार रुपयांचा भरपाईचा अहवाल जिल्हा प्रशासनाने सरकारकडे पाठवला आहे. मात्र, त्यात दीड ते दोनपट वाढ होण्याच्या चर्चेमुळे नुकसानग्रस्तांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.जिल्ह्यातील अन्य तालुक्यांच्या तुलनेत ठाणे परिसरातील सर्वाधिक एक कोटी चार लाख ३५ हजारांवरच्या नुकसानभरपाईचा अहवाल दिला आहे. यामध्ये सर्वाधिक एक कोटी तीन लाख ७0 हजार वीजपुरवठ्यासंबंधीच्या नुकसानीचा समावेश आहे. घरांचे नुकसान ६0 हजारांचे, तर शाळांच्या पाच हजारांच्या नुकसानीचा पंचनाम्यात समावेश आहे. या खालोखाल मुरबाड तालुक्यासाठी ३५ लाख ७५ हजार रुपयांच्या नुकसानभरपाईचा समावेश आहे.अंबरनाथ तालुक्यातील फळबागा, घरांचे नुकसानच्जिल्ह्यात तृतीय क्रमांकाचे १६ लाख ४४ हजार रुपयांचे नुकसान अंबरनाथ तालुक्यात झाले आहे. यात कोरडवाहू शेतीचे १४ हजार ७00 रुपये, बागायतीचे तीन लाख २२ हजारांचे आणि १६ हजारांच्या फळबागांचा समावेश आहे. याशिवाय, घरांचे सव्वाचार लाखांचे नुकसान झाले असून, शाळा आणि ग्रामपंचायतींचे सात लाख ६६ हजार आणि आरोग्य केंद्रांच्या अवघ्या एका लाखाच्या नुकसानीचा पंचनाम्यात समावेश आहे.च्भिवंडी तालुक्यात १0 लाख ४९ हजारांचे नुकसान झाल्याचे निश्चित करण्यात आले आहे. शाळा आणि ग्रामपंचायतींचे सात लाख २२ हजारांचे, आरोग्य केंद्रांचे सव्वादोन लाखांचे व घरांचे एक लाख रुपये किमतीचे नुकसान झाले आहे. शहापूरला सात लाखांच्या भरपाईचे पंचनामे निश्चित केले आहेत. यापैकी घरांचे चार लाख ३७ हजारांचे, तर ग्रामपंचायती, शाळासंबंधी दोन लाख ६३ हजारांच्या भरपाईचा समावेश आहे.च्कल्याण तालुक्यामधील सहा लाख ४७ हजारांच्या भरपाईवर शिक्कामोर्तब झाले आहे. यापैकी घरांचे एक लाख ६७ हजारांचे, शाळा, ग्रामपंचायतीशी संबंधित चार लाख ८० हजारांची भरपाई अपेक्षित आहे. उल्हासनगरला एक हजार लाख आठ हजारांच्या घरांच्या नुकसानीचा पंचनामा केला आहे.शासन निकषांनुसार नुकसान व भरपाईची रक्कमवीज यंत्रणा - १0,३७0,000/-शाळा / ग्रा.पं. - ४,४४,१000/-प्राथमिक आरोग्य केंद्र - ५,८0,000/-घरे - २४,१५,९00/-अंबरनाथमधील शेती - ३,५२,९00/-

टॅग्स :Farmerशेतकरीthaneठाणे