शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

भरपाईपोटी दोन कोटींची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 00:28 IST

चक्रीवादळामुळे ठाणे जिल्ह्यात नुकसान : पंचनामे पूर्ण, दीड ते दोनपट वाढ होण्याची शक्यता

सुरेश लोखंडे 

ठाणे : जनजीवन विस्कळीत करणाऱ्या निसर्ग चक्रीवादळामुळे गेल्या आठवड्यात जिल्ह्यातील घरांसह भाजीपाला, वीजपुरवठा, आरोग्य केंद्र, शाळा आदींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना, रहिवाशांना एक कोटी ८१ लाख ५९ हजार रुपयांच्या भरपाईसाठी शासनाच्या निकषांनुसार पंचनामे करण्यात आले. मात्र, त्यात दीड ते दोनपट वाढ होण्याचे संकेत असून, ही भरपाई दोन कोटी रुपयांपर्यंत मिळेल, अशी नागरिकांना आशा आहे.

चक्रीवादळाचा फटका अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत ठाणे जिल्ह्याला जास्त बसला. या वादळामुळे १६२ घरांचे अंशत: नुकसान, तर ३0७ झाडे, १५0 विजेचे खांब पडले. कल्याणला तीन बकºया विजेच्या धक्कयाने मृत्युमुखी पडल्याचा प्राथमिक अंदाज पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यावेळी व्यक्त केला होता. त्यावेळी त्यांनी भरपाई देण्याचे आदेशही जारी केले. १३ मे २0१५ रोजीच्या शासन आदेशानुसार जिल्ह्यातील नुकसानीचे पंचनामे करून तब्बल एक कोटी ८१ लाख ५९ हजार रुपयांचा भरपाईचा अहवाल जिल्हा प्रशासनाने सरकारकडे पाठवला आहे. मात्र, त्यात दीड ते दोनपट वाढ होण्याच्या चर्चेमुळे नुकसानग्रस्तांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.जिल्ह्यातील अन्य तालुक्यांच्या तुलनेत ठाणे परिसरातील सर्वाधिक एक कोटी चार लाख ३५ हजारांवरच्या नुकसानभरपाईचा अहवाल दिला आहे. यामध्ये सर्वाधिक एक कोटी तीन लाख ७0 हजार वीजपुरवठ्यासंबंधीच्या नुकसानीचा समावेश आहे. घरांचे नुकसान ६0 हजारांचे, तर शाळांच्या पाच हजारांच्या नुकसानीचा पंचनाम्यात समावेश आहे. या खालोखाल मुरबाड तालुक्यासाठी ३५ लाख ७५ हजार रुपयांच्या नुकसानभरपाईचा समावेश आहे.अंबरनाथ तालुक्यातील फळबागा, घरांचे नुकसानच्जिल्ह्यात तृतीय क्रमांकाचे १६ लाख ४४ हजार रुपयांचे नुकसान अंबरनाथ तालुक्यात झाले आहे. यात कोरडवाहू शेतीचे १४ हजार ७00 रुपये, बागायतीचे तीन लाख २२ हजारांचे आणि १६ हजारांच्या फळबागांचा समावेश आहे. याशिवाय, घरांचे सव्वाचार लाखांचे नुकसान झाले असून, शाळा आणि ग्रामपंचायतींचे सात लाख ६६ हजार आणि आरोग्य केंद्रांच्या अवघ्या एका लाखाच्या नुकसानीचा पंचनाम्यात समावेश आहे.च्भिवंडी तालुक्यात १0 लाख ४९ हजारांचे नुकसान झाल्याचे निश्चित करण्यात आले आहे. शाळा आणि ग्रामपंचायतींचे सात लाख २२ हजारांचे, आरोग्य केंद्रांचे सव्वादोन लाखांचे व घरांचे एक लाख रुपये किमतीचे नुकसान झाले आहे. शहापूरला सात लाखांच्या भरपाईचे पंचनामे निश्चित केले आहेत. यापैकी घरांचे चार लाख ३७ हजारांचे, तर ग्रामपंचायती, शाळासंबंधी दोन लाख ६३ हजारांच्या भरपाईचा समावेश आहे.च्कल्याण तालुक्यामधील सहा लाख ४७ हजारांच्या भरपाईवर शिक्कामोर्तब झाले आहे. यापैकी घरांचे एक लाख ६७ हजारांचे, शाळा, ग्रामपंचायतीशी संबंधित चार लाख ८० हजारांची भरपाई अपेक्षित आहे. उल्हासनगरला एक हजार लाख आठ हजारांच्या घरांच्या नुकसानीचा पंचनामा केला आहे.शासन निकषांनुसार नुकसान व भरपाईची रक्कमवीज यंत्रणा - १0,३७0,000/-शाळा / ग्रा.पं. - ४,४४,१000/-प्राथमिक आरोग्य केंद्र - ५,८0,000/-घरे - २४,१५,९00/-अंबरनाथमधील शेती - ३,५२,९00/-

टॅग्स :Farmerशेतकरीthaneठाणे