शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'
2
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
3
कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ होणार! पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी सरकारचा मास्टरप्लॅन
4
Axar Patel: विराट कोहली, ख्रिस गेलनंतर फक्त अक्षर पटेलच करू शकला 'अशी' कामगिरी!
5
Wife सोबत मिळून Post Office च्या या स्कीममध्ये ₹४ लाख जमा करा, पाहा महिन्याला किती मिळेल व्याज?
6
अजित पवारांचा घूमजाव, आधी म्हणाले कल्पना होती, आता म्हणतात, "पार्थच्या जमीन व्यवहाराची माहिती नाही"
7
‘तू बघत राहा, मी खोलीत गुदमरून मरेन’, पत्नीला  मेसेज पाठवून पतीने दरवाजा केला बंद, त्यानंतर...
8
महामार्गांवरून भटक्या कुत्र्यांना हटवा, त्यांचे लसीकरण आणि नसबंदी करून...; सर्वोच्च न्यायालयाचे तीन आदेश
9
Larissa Nery : "मी राहुल गांधींना ओळखत नाही, भारतात..."; ब्राझिलियन महिलेला वाटली भीती, केला मोठा खुलासा
10
दुकानातून हळूहळू कमी होत होता दारूचा स्टॉक; कपल करत होतं भरलेल्या बाटल्यांची चोरी! कसं पकडलं?
11
२५ लाख ते ६० लाख... गृहकर्जावर महिन्याचा खर्च किती? तुमचा EMI कमी करण्यासाठी 'हा' कालावधी निवडा
12
मारुतीने व्हिक्टोरिस लाँच केली अन् या कारवर बंपर सूट दिली; ऑक्टोबरपेक्षा आणखी ५४,००० रुपयांनी स्वस्त केली...
13
पहिल्याच दिवशी जमिनीवर आला 'हा' आयपीओ; गुंतवणूकदारांना मोठं नुकसान, GMP नं केला 'विश्वासघात'
14
Jasprit Bumrah Record : बुमराहचा मोठा पराक्रम! पाकिस्तानी गोलंदाजाला धोबीपछाड देत बनला 'नंबर वन'
15
Astro Tips: काही जातकांच्या पत्रिकेत विवाह योगच नसतो; त्यांनी कोणता उपाय करावा? पाहू 
16
२०२६ हे पाकिस्तानसाठी 'प्रलयाचे वर्ष'? ज्योतिषांचा धक्कादायक अंदाज; भारतासोबत मोठ्या युद्धाचे संकेत...
17
शनिवारी संकष्ट चतुर्थी, ३ राशींना साडेसाती; ‘हे’ ५ उपाय नक्की करा, शनिदोषातून मुक्तता मिळवा!
18
Video - बॅकबेंचर ते चार्टर्ड अकाउंटंट... लेक CA होताच बापाने मारली घट्ट मिठी, डोळ्यांत आनंदाश्रू
19
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
20
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल

धोकादायक इमारतींमधील रहिवासी धोरणाच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: January 23, 2017 05:29 IST

पूर्वी तलावांचे शहर म्हणून ओळख असलेल्या ठाणे शहराची ओळख ही आता अनधिकृत बांधकामांचे शहर म्हणून झालेली आहे. वागळे

अजित मांडके/ ठाणेपूर्वी तलावांचे शहर म्हणून ओळख असलेल्या ठाणे शहराची ओळख ही आता अनधिकृत बांधकामांचे शहर म्हणून झालेली आहे. वागळे, किसननगर, लोकमान्यनगर, मुंब्रा, दिवा अशा शहराच्या सर्व भागात अनधिकृत इमले उभे राहिले आहेत. प्रत्येक निवडणुकीवेळी या बांधकामांना दिलासा देण्याच्या घोषणा होतात, पण त्यांना हक्काचे घर आजतागायत मिळालेले नाही.बिल्डर, भूमाफिया, स्थानिक गुंडांसोबतच पालिका अधिकारी आणि राजकारण्यांच्या आशीर्वादानेच ही अनधिकृत बांधकामे उभी राहिली आहेत. त्यांना दिलासा देण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले होते. मात्र त्यावर पुढे काही झाले नाही. डिसेंबर २०१५ पूर्वी बांधलेली बांधकामे मुख्यमंत्र्यांनी उल्हासनगरच्या धर्तीवर काही अटी व शर्तींची पूर्तता करून नियमित करण्याचा निर्णय घेतला. परंतु, आधीच ठाण्यातील अधिकृत बांधकामांना सोयीसुविधा पुरवण्यात पालिका कमी पडत असताना या निर्णयामुळे पालिकेपुढील आव्हाने वाढली आहेत. अधिकृत धोकादायक इमारतींचा प्रश्नही असाच जटील बनला आहे. या इमारती रिकाम्या करण्यात येत असल्या, त्यातील रहिवाशांचे तात्पुरत्या स्वरूपात पालिका पुनर्वसन करीत असली, तरी त्याबाबत स्पष्ट धोरण नसल्याने त्यांना हक्काचे घर मिळण्यात अडचणी येत आहेत. अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचा विचार केल्यास ठाण्यात २५२ झोपडपट्ट्यांत ९ लाख ८३ हजार रहिवासी आहेत. अन्य अनधिकृत बांधकामांची संख्या एक लाख २३ हजारांच्या घरात आहे. ती नियमित केल्यास पालिकेपुढील आव्हाने वाढण्याची चिन्हे आहेत. त्यात शासनाच्या अटी आणि शर्ती या अद्याप निश्चित झालेल्या नाहीत. त्यामुळे कोणत्या भूखंडांचा यात समावेश होणार आणि कोणते वगळणार हेदेखील गुलदस्त्यात आहे. पालिकेसोबतच राज्य सरकार, सीआरझेड, वन विभाग आणि एमआयडीसी अशा विविध प्राधिकरणांचे भूखंड आहेत. त्यावरही अनधिकृत बांधकामे उभी आहेत. त्यांना सोयीसुविधा पुरवण्यासाठी पालिकेला तारेवरची कसरत करावी लागत आहे. पाण्याचे नियोजन नसल्याने शहरातील पाणीसंकट गडद होत असून पालिकेला अद्यापही हक्काचे डम्पिंग ग्राउंड मिळू शकलेले नाही. वाहनांची संख्या १५ लाखांच्या घरात असून दरवर्षी वाहनवाढीचा दर ८ ते १० टक्के आहे. परंतु रस्ते अपुरे असल्याने शहराच्या विविध भागात वाहतूककोंडी होते. त्यामुळे अनधिकृत इमारतींचा विचार करूनच पुढील सोयीसुविधांचे नियोजन करावे लागेल.युती सरकारने शिवशाही योजनेच्या नावाखाली मुंबईत झोपडीधारकांना मोफत घरे देण्याची योजना आणली. त्यानंतर, राज्यात झोपड्यांचे पेव फुटून प्रत्येक शहराला झोपड्यांनी वेढले.आधी १९९५ तर २००० सालापर्यंतच्या झोपड्या नियमित करण्याचे ठरले. ही सवलतीची मर्यादा वाढत असल्याने आणि अनधिकृत बांधकामे किंवा झोपड्या बांधणाऱ्यांवर कधीच कारवाई होत नसल्याने त्याचे प्रमाण सतत वाढते आहे.अनधिकृत बांधकामांना माणुसकीच्या भावनेतून सुविधा पुरवाव्याच लागतात. त्या अधिकृत झाल्यावर त्यांच्याकडून करही वसूल केला जाईल.