शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
2
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
3
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
4
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
5
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
6
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
7
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
8
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
9
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
10
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
11
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
12
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
13
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य
14
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
15
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
16
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
17
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
18
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
19
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
20
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?

वाघबीळ ग्रामस्थांनी राजन विचारेंना पिटाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 01:42 IST

पोलिसांसोबतही झाला वाद, शिवसेनेला टेन्शन, भूमिपुत्रांना संकटसमयी साथ न दिल्याचा आरोप

ठाणे : ठाणे लोकसभा मतदारक्षेत्रातून निवडून आलेले खासदार भूमिपुत्रांवर आलेल्या संकटांच्या वेळी गेली पाच वर्षे गावात फिरकलेसुद्धा नाहीत. त्यामुळे संतापलेल्या वाघबीळ ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचे ठरवले आहे. दरम्यान, मंगळवारी सायंकाळी वाघबीळ गावातून शिवसेनेचे उमेदवार राजन विचारे यांची रॅली गावकऱ्यांनी रोखून त्यांना पिटाळून लावले. यावेळी पोलिसांबरोबरसुद्धा बाचाबाची झाली. हे लोण आता ठाणे, नवी मुंबई, मीरा-भार्इंदर क्षेत्रातील गावागावांत पसरण्याची चिन्हे असल्याने शिवसेनेचे टेन्शन वाढले आहे.गेल्या दोनतीन वर्षांत भूमिपुत्रांच्या गावांवर क्लस्टर योजना, खाडीचे पाणी शुद्धीकरणाचे आरक्षण, वॉटर फ्रंट प्रकल्प, मेट्रो कारशेडचे आरक्षण, मेट्रो कास्टिंग यार्डचे आरक्षण, कांदळवनाची शेतीमध्ये लागवड, जबरदस्तीने होणारे जमीन अधिग्रहण, मोबदला न देताच सुरू असलेले अधिग्रहण, भूमिपुत्रांच्या घरांवर कारवाई आदी अनेक संकटे आली. परंतु, या समस्या सोडवण्यासाठी खासदारांसह कोणत्याही राजकीय मंडळींनी प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे येथील गावकऱ्यांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, मंगळवारी वाघबीळ भागात विचारे यांची रॅली गेली होती. यावेळेस गावकºयांनी ती थांबवण्याचा जोरदार प्रयत्न केला. यावेळी चोख पोलीस बंदोबस्तही होता. परंतु, त्यानंतरही गावकºयांची रॅली रोखून त्यांना पिटाळले. मागील पाच वर्षांत खासदार आमच्याकडे फिरकले नाहीत. आमच्या समस्या जाणून घेतल्या नाहीत. आता मात्र मते मागण्यासाठी आल्यानेच त्यांना आम्ही विरोध केल्याचे गावकºयांनी यावेळी स्पष्ट केले.ग्रामस्थांच्या नाराजीची ही आहेत प्रमुख कारणेमागील काही महिन्यांपासून स्थानिक भूमिपुत्रांकडून क्लस्टरला विरोध सुरूआहे. गावाचे सीमांकन निश्चित केल्यानंतरच क्लस्टर योजना राबवावी, असेही त्यांचे म्हणणे आहे. परंतु, असे असतानाही पालिकेच्या माध्यमातून सर्व्हेचे काम सुरू झाले आहे. शिवाय, वाघबीळ गावात इतर काही प्रकल्पांसाठीसुद्धा पालिकेने जमीन अधिग्रहण करण्यासाठी तयारी केली आहे.सत्तेत असलेल्या शिवसेनेने याला विरोध करण्याऐवजी यासंदर्भातील प्रस्ताव मंजूर केला आहे. त्यामुळे यासंदर्भातही ग्रामस्थांची नाराजी आहे. शिवाय, यापूर्वीसुद्धा विविध प्रकल्पांसाठी येथील रहिवाशांनी आपल्या जमिनी दिल्या आहेत. शिवाय, विविध विकास प्रकल्प राबवले जात असल्याने त्यामुळे येथील नुकसान झाले आहे. त्यामुळे हळूहळू गावपण हरपू लागले आहे.एकूणच याबाबतीत राजकीय मंडळींकडून, विशेषत: शिवसेनेकडून काहीच न झाल्याने त्याचा रोष आता सहन करण्याची वेळ अखेर उमेदवार राजन विचारे यांच्यावर आली आहे. केवळ वाघबीळच नव्हे, तर ठाण्यातील बाळकुम, कावेसर, मानपाडा, ढोकाळी, कासारवडवलीसह नवी मुंबईतील सर्व ग्रामस्थांच्या प्रॉपर्टीकार्डसह इतर प्रश्नांवर शिवसेनेने कागदी घोडे नाचवण्याव्यतिरिक्त काहीच केले नाही.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019thane-pcठाणेShiv Senaशिवसेना