शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

वाघबीळ ग्रामस्थांनी राजन विचारेंना पिटाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 01:42 IST

पोलिसांसोबतही झाला वाद, शिवसेनेला टेन्शन, भूमिपुत्रांना संकटसमयी साथ न दिल्याचा आरोप

ठाणे : ठाणे लोकसभा मतदारक्षेत्रातून निवडून आलेले खासदार भूमिपुत्रांवर आलेल्या संकटांच्या वेळी गेली पाच वर्षे गावात फिरकलेसुद्धा नाहीत. त्यामुळे संतापलेल्या वाघबीळ ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचे ठरवले आहे. दरम्यान, मंगळवारी सायंकाळी वाघबीळ गावातून शिवसेनेचे उमेदवार राजन विचारे यांची रॅली गावकऱ्यांनी रोखून त्यांना पिटाळून लावले. यावेळी पोलिसांबरोबरसुद्धा बाचाबाची झाली. हे लोण आता ठाणे, नवी मुंबई, मीरा-भार्इंदर क्षेत्रातील गावागावांत पसरण्याची चिन्हे असल्याने शिवसेनेचे टेन्शन वाढले आहे.गेल्या दोनतीन वर्षांत भूमिपुत्रांच्या गावांवर क्लस्टर योजना, खाडीचे पाणी शुद्धीकरणाचे आरक्षण, वॉटर फ्रंट प्रकल्प, मेट्रो कारशेडचे आरक्षण, मेट्रो कास्टिंग यार्डचे आरक्षण, कांदळवनाची शेतीमध्ये लागवड, जबरदस्तीने होणारे जमीन अधिग्रहण, मोबदला न देताच सुरू असलेले अधिग्रहण, भूमिपुत्रांच्या घरांवर कारवाई आदी अनेक संकटे आली. परंतु, या समस्या सोडवण्यासाठी खासदारांसह कोणत्याही राजकीय मंडळींनी प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे येथील गावकऱ्यांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, मंगळवारी वाघबीळ भागात विचारे यांची रॅली गेली होती. यावेळेस गावकºयांनी ती थांबवण्याचा जोरदार प्रयत्न केला. यावेळी चोख पोलीस बंदोबस्तही होता. परंतु, त्यानंतरही गावकºयांची रॅली रोखून त्यांना पिटाळले. मागील पाच वर्षांत खासदार आमच्याकडे फिरकले नाहीत. आमच्या समस्या जाणून घेतल्या नाहीत. आता मात्र मते मागण्यासाठी आल्यानेच त्यांना आम्ही विरोध केल्याचे गावकºयांनी यावेळी स्पष्ट केले.ग्रामस्थांच्या नाराजीची ही आहेत प्रमुख कारणेमागील काही महिन्यांपासून स्थानिक भूमिपुत्रांकडून क्लस्टरला विरोध सुरूआहे. गावाचे सीमांकन निश्चित केल्यानंतरच क्लस्टर योजना राबवावी, असेही त्यांचे म्हणणे आहे. परंतु, असे असतानाही पालिकेच्या माध्यमातून सर्व्हेचे काम सुरू झाले आहे. शिवाय, वाघबीळ गावात इतर काही प्रकल्पांसाठीसुद्धा पालिकेने जमीन अधिग्रहण करण्यासाठी तयारी केली आहे.सत्तेत असलेल्या शिवसेनेने याला विरोध करण्याऐवजी यासंदर्भातील प्रस्ताव मंजूर केला आहे. त्यामुळे यासंदर्भातही ग्रामस्थांची नाराजी आहे. शिवाय, यापूर्वीसुद्धा विविध प्रकल्पांसाठी येथील रहिवाशांनी आपल्या जमिनी दिल्या आहेत. शिवाय, विविध विकास प्रकल्प राबवले जात असल्याने त्यामुळे येथील नुकसान झाले आहे. त्यामुळे हळूहळू गावपण हरपू लागले आहे.एकूणच याबाबतीत राजकीय मंडळींकडून, विशेषत: शिवसेनेकडून काहीच न झाल्याने त्याचा रोष आता सहन करण्याची वेळ अखेर उमेदवार राजन विचारे यांच्यावर आली आहे. केवळ वाघबीळच नव्हे, तर ठाण्यातील बाळकुम, कावेसर, मानपाडा, ढोकाळी, कासारवडवलीसह नवी मुंबईतील सर्व ग्रामस्थांच्या प्रॉपर्टीकार्डसह इतर प्रश्नांवर शिवसेनेने कागदी घोडे नाचवण्याव्यतिरिक्त काहीच केले नाही.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019thane-pcठाणेShiv Senaशिवसेना