शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

वाघबीळ ग्रामस्थांनी राजन विचारेंना पिटाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 01:42 IST

पोलिसांसोबतही झाला वाद, शिवसेनेला टेन्शन, भूमिपुत्रांना संकटसमयी साथ न दिल्याचा आरोप

ठाणे : ठाणे लोकसभा मतदारक्षेत्रातून निवडून आलेले खासदार भूमिपुत्रांवर आलेल्या संकटांच्या वेळी गेली पाच वर्षे गावात फिरकलेसुद्धा नाहीत. त्यामुळे संतापलेल्या वाघबीळ ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचे ठरवले आहे. दरम्यान, मंगळवारी सायंकाळी वाघबीळ गावातून शिवसेनेचे उमेदवार राजन विचारे यांची रॅली गावकऱ्यांनी रोखून त्यांना पिटाळून लावले. यावेळी पोलिसांबरोबरसुद्धा बाचाबाची झाली. हे लोण आता ठाणे, नवी मुंबई, मीरा-भार्इंदर क्षेत्रातील गावागावांत पसरण्याची चिन्हे असल्याने शिवसेनेचे टेन्शन वाढले आहे.गेल्या दोनतीन वर्षांत भूमिपुत्रांच्या गावांवर क्लस्टर योजना, खाडीचे पाणी शुद्धीकरणाचे आरक्षण, वॉटर फ्रंट प्रकल्प, मेट्रो कारशेडचे आरक्षण, मेट्रो कास्टिंग यार्डचे आरक्षण, कांदळवनाची शेतीमध्ये लागवड, जबरदस्तीने होणारे जमीन अधिग्रहण, मोबदला न देताच सुरू असलेले अधिग्रहण, भूमिपुत्रांच्या घरांवर कारवाई आदी अनेक संकटे आली. परंतु, या समस्या सोडवण्यासाठी खासदारांसह कोणत्याही राजकीय मंडळींनी प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे येथील गावकऱ्यांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, मंगळवारी वाघबीळ भागात विचारे यांची रॅली गेली होती. यावेळेस गावकºयांनी ती थांबवण्याचा जोरदार प्रयत्न केला. यावेळी चोख पोलीस बंदोबस्तही होता. परंतु, त्यानंतरही गावकºयांची रॅली रोखून त्यांना पिटाळले. मागील पाच वर्षांत खासदार आमच्याकडे फिरकले नाहीत. आमच्या समस्या जाणून घेतल्या नाहीत. आता मात्र मते मागण्यासाठी आल्यानेच त्यांना आम्ही विरोध केल्याचे गावकºयांनी यावेळी स्पष्ट केले.ग्रामस्थांच्या नाराजीची ही आहेत प्रमुख कारणेमागील काही महिन्यांपासून स्थानिक भूमिपुत्रांकडून क्लस्टरला विरोध सुरूआहे. गावाचे सीमांकन निश्चित केल्यानंतरच क्लस्टर योजना राबवावी, असेही त्यांचे म्हणणे आहे. परंतु, असे असतानाही पालिकेच्या माध्यमातून सर्व्हेचे काम सुरू झाले आहे. शिवाय, वाघबीळ गावात इतर काही प्रकल्पांसाठीसुद्धा पालिकेने जमीन अधिग्रहण करण्यासाठी तयारी केली आहे.सत्तेत असलेल्या शिवसेनेने याला विरोध करण्याऐवजी यासंदर्भातील प्रस्ताव मंजूर केला आहे. त्यामुळे यासंदर्भातही ग्रामस्थांची नाराजी आहे. शिवाय, यापूर्वीसुद्धा विविध प्रकल्पांसाठी येथील रहिवाशांनी आपल्या जमिनी दिल्या आहेत. शिवाय, विविध विकास प्रकल्प राबवले जात असल्याने त्यामुळे येथील नुकसान झाले आहे. त्यामुळे हळूहळू गावपण हरपू लागले आहे.एकूणच याबाबतीत राजकीय मंडळींकडून, विशेषत: शिवसेनेकडून काहीच न झाल्याने त्याचा रोष आता सहन करण्याची वेळ अखेर उमेदवार राजन विचारे यांच्यावर आली आहे. केवळ वाघबीळच नव्हे, तर ठाण्यातील बाळकुम, कावेसर, मानपाडा, ढोकाळी, कासारवडवलीसह नवी मुंबईतील सर्व ग्रामस्थांच्या प्रॉपर्टीकार्डसह इतर प्रश्नांवर शिवसेनेने कागदी घोडे नाचवण्याव्यतिरिक्त काहीच केले नाही.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019thane-pcठाणेShiv Senaशिवसेना